शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

माझं काय चुकलं, ते पंतप्रधान मोदींनी सांगावं - किर्ती आझाद

By admin | Updated: December 24, 2015 12:24 IST

डीडीसीए गैरप्रकारावरून अरूण जेटली यांच्यावर टीका केल्याबद्दल भाजपातून निलंबित करण्यात आलेले किर्ती आझाद यांनी 'पंतप्रधान मोदींनी याप्रकरणात लक्ष घालून माझं काय चुकलं हे सांगावं' अशी मागणी केली

ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. २४ - डीडीसीए गैरप्रकारावरून केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्यावर टीका केल्याबद्दल भाजपातून निलंबित करण्यात आलेले किर्ती आझाद यांनी ' पंतप्रधान मोदींनी याप्रकरणात लक्ष घालून माझं काय चुकलं हे सांगावं' अशी मागणी केली आहे. 'पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे मला निलंबित करण्यात आले आहे, असे पक्षाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, पण माझ्यावर कोणताही ठोस आरोप करण्यात आलेला नाही. मी भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवला म्हणून मला पक्षातून काढण्यात आले का? मला याचे उत्तर हवे आहे' असे आझाद म्हटले.
अहमदाबाद येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांबद्दल उत्तर दिले. पक्षाने मला पाठवलेल्या नोटीशीला मी आज संध्याकाळापर्यंत उत्तर देईन, भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी मला त्यासाठी मदत करणार आहेत, असे आझाद यांनी सांगितले. डीडीसीएच्या प्रकरणाचा पक्षाशी काहीच संबंध नाही आणि माझी लढाईसुद्धा पक्षाबाहेर होती. मग तरीही मला निलंबित का करण्यात आले? पंतप्रधान मोदी आणि मार्गदर्शक मंडळाने याप्रकरणात लक्ष घालावे, अशी मागणी आझाद यांनी केली. 
डीडीसीए प्रकरणी अरूण जेटलींविरोधात बोलणारे आझाद यांना काल पक्षातून निलंबित करण्यात आले. पक्षविरोधी कारवाया केल्याच्या आरोपात तत्काळ पक्षातून निलंबित करण्यात येत आहे, असे भाजपातर्फे जारी करण्यात आलेल्या एका निवेदनात म्हटले होते. आझाद यांना कारणे दाखवा नोटीस जारी करून त्यांना त्यांच्या ‘पक्षविरोधी वर्तणुकी’मागचे कारण देण्यास सांगण्यात आले आहे. त्यांच्या उत्तरावरच पुढची कारवाई निर्भर राहील, असे या निवेदनात स्पष्ट करण्यात आले होते. 
दरम्यान किर्ती आझाद यांच्या निलंबनावरून काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. ' ना खाऊंगा, ना खाने दूंगा, असे मोदीजी म्हणत होते, मग आता त्यांच्याच पक्षातील एका नेत्याने भ्रष्टाचार निदर्शनास आणून दिल्यानंतरही त्याला निलंबित का करण्यात आले?' असा सवाल राहुल गांधी यांनी विचारला.