शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधानांचे जेटलींनी केले तोडभरून कौतुक

By admin | Updated: May 14, 2014 08:39 IST

भाजपाचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांनी मावळते पंतप्रधान म्हणून डॉ. मनमोहन सिंग यांची तोंडभरून स्तुती केली असून त्यांची व्यक्तिगत सचोटी नेहमीच वादातीत राहिली, असे आग्रहाने नमूद केले आहे.

नवी दिल्ली : गेल्या दहा वर्षांत विरोधी पक्षाचा नेता म्हणून वाद आणि मतभेदाचे अनेक प्रसंग आले असले व प्रसंगी सडकून टीका केली असली तरी भाजपाचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांनी मावळते पंतप्रधान म्हणून डॉ. मनमोहन सिंग यांची तोंडभरून स्तुती केली असून त्यांची व्यक्तिगत सचोटी नेहमीच वादातीत राहिली, असे आग्रहाने नमूद केले आहे. पंतप्रधान पदावरून पायउतार होण्यास काही दिवस राहिले असताना जेटली यांनी मंगळवारी डॉ. सिंग यांच्याविषयीचे आपले मत सविस्तर ब्लॉग लिहून नोंदविले. त्यात त्यांनी मनमोहन सिंग यांना ‘एक शहाणा माणूस’ असे संबोधून म्हटले की, मुळातच त्यांचे व्यक्तिमत्त्व विद्वत्तापूर्ण असल्याने कोणताही विषय हाताळताना पंतप्रधानांची नेहमीच पूर्ण तयारी झालेली असायची. डॉ. मनमोहन सिंग राज्यसभा सभागृहाचे नेते असून जेटली विरोधी पक्षनेते आहेत. गेली १० वर्षे सरकारचे नेतृत्त्व केल्यानंतर डॉ.सिंग प्रतिष्ठा व आब राखून पायउतार होत आहेत, असे गौरवोद््गार जेटली यांनी काढले. जेटली ब्लॉगमध्ये लिहितात, पदावर नसले तरी डॉ. सिंग यांचे एक ज्येष्ठ मुत्सद्दी राजकारणी व निष्ठावंत व्यक्ती म्हणून देशाला मार्गदर्शन मिळत राहील. मात्र डॉ. सिंग यांनी योग्य वेळी ताठपणाने उभे राहून असहमती नोंदविली असती तर त्यांचा सन्मान आणखी वाढला असता, असेही जेटली यांनी नमूद केले. आपल्याला मर्या दित अधिकार दिलेले आहेत व सर्व प्रमुख निर्णय पक्ष व पक्षाच्या प्रथम कुटुंबाच्या (गांधी कुटुंब) संमतीनेच घ्यावे लागणार आहेत, याची त्यांना कल्पना होती. जेटली म्हणतात की, मला पंतप्रधानांना गेली १० वर्षे अगदी जवळून पाहण्याची संधी मिळाली. त्यापैकी पहिल्या पाच वर्षांत संसदेत त्यांनी केलेले प्रत्यही प्रत्येक वक्तव्य विरोधी पक्षनेता म्हणून मी स्वत: ऐकले व प्रत्येक वेळी त्यांच्या कामगिरीचे विश्लेषण केले. जेटली म्हणतात, डॉ. सिंग एक फार उत्तम वित्तमंत्री होते हे निर्विवाद. १९९१ मध्ये आर्थिक सुधारणांची सुरुवात करताना त्यांना त्यांचे पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांच्याकडून खूप पाठबळ मिळाले. ज्या काँग्रेसने नेहमीच नियंत्रित अर्थव्यवस्थेची कांस धरली त्या पक्षाने सुधारणावादी दृष्टी स्वीकारणे कौतुकास्पद होते. पण त्यासाठी राव यांना जेवढे श्रेय मिळायला हवे होते तेवढे कधीच दिले गेले नाही. इतिहास त्यांचे पुनर्मुल्यांकन करेल याची मला खात्री आहे. पण त्या काळात वित्तमंत्री म्हणून डॉ. सिंग यांनी केलेली कामगिरी दीर्घकाळ स्मरणात राहील.