शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
4
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
5
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
6
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
7
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
8
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
9
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
10
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
11
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
12
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
13
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
14
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
15
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
16
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
17
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
18
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
19
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
20
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया

पंतप्रधानांचे जेटलींनी केले तोडभरून कौतुक

By admin | Updated: May 14, 2014 08:39 IST

भाजपाचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांनी मावळते पंतप्रधान म्हणून डॉ. मनमोहन सिंग यांची तोंडभरून स्तुती केली असून त्यांची व्यक्तिगत सचोटी नेहमीच वादातीत राहिली, असे आग्रहाने नमूद केले आहे.

नवी दिल्ली : गेल्या दहा वर्षांत विरोधी पक्षाचा नेता म्हणून वाद आणि मतभेदाचे अनेक प्रसंग आले असले व प्रसंगी सडकून टीका केली असली तरी भाजपाचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांनी मावळते पंतप्रधान म्हणून डॉ. मनमोहन सिंग यांची तोंडभरून स्तुती केली असून त्यांची व्यक्तिगत सचोटी नेहमीच वादातीत राहिली, असे आग्रहाने नमूद केले आहे. पंतप्रधान पदावरून पायउतार होण्यास काही दिवस राहिले असताना जेटली यांनी मंगळवारी डॉ. सिंग यांच्याविषयीचे आपले मत सविस्तर ब्लॉग लिहून नोंदविले. त्यात त्यांनी मनमोहन सिंग यांना ‘एक शहाणा माणूस’ असे संबोधून म्हटले की, मुळातच त्यांचे व्यक्तिमत्त्व विद्वत्तापूर्ण असल्याने कोणताही विषय हाताळताना पंतप्रधानांची नेहमीच पूर्ण तयारी झालेली असायची. डॉ. मनमोहन सिंग राज्यसभा सभागृहाचे नेते असून जेटली विरोधी पक्षनेते आहेत. गेली १० वर्षे सरकारचे नेतृत्त्व केल्यानंतर डॉ.सिंग प्रतिष्ठा व आब राखून पायउतार होत आहेत, असे गौरवोद््गार जेटली यांनी काढले. जेटली ब्लॉगमध्ये लिहितात, पदावर नसले तरी डॉ. सिंग यांचे एक ज्येष्ठ मुत्सद्दी राजकारणी व निष्ठावंत व्यक्ती म्हणून देशाला मार्गदर्शन मिळत राहील. मात्र डॉ. सिंग यांनी योग्य वेळी ताठपणाने उभे राहून असहमती नोंदविली असती तर त्यांचा सन्मान आणखी वाढला असता, असेही जेटली यांनी नमूद केले. आपल्याला मर्या दित अधिकार दिलेले आहेत व सर्व प्रमुख निर्णय पक्ष व पक्षाच्या प्रथम कुटुंबाच्या (गांधी कुटुंब) संमतीनेच घ्यावे लागणार आहेत, याची त्यांना कल्पना होती. जेटली म्हणतात की, मला पंतप्रधानांना गेली १० वर्षे अगदी जवळून पाहण्याची संधी मिळाली. त्यापैकी पहिल्या पाच वर्षांत संसदेत त्यांनी केलेले प्रत्यही प्रत्येक वक्तव्य विरोधी पक्षनेता म्हणून मी स्वत: ऐकले व प्रत्येक वेळी त्यांच्या कामगिरीचे विश्लेषण केले. जेटली म्हणतात, डॉ. सिंग एक फार उत्तम वित्तमंत्री होते हे निर्विवाद. १९९१ मध्ये आर्थिक सुधारणांची सुरुवात करताना त्यांना त्यांचे पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांच्याकडून खूप पाठबळ मिळाले. ज्या काँग्रेसने नेहमीच नियंत्रित अर्थव्यवस्थेची कांस धरली त्या पक्षाने सुधारणावादी दृष्टी स्वीकारणे कौतुकास्पद होते. पण त्यासाठी राव यांना जेवढे श्रेय मिळायला हवे होते तेवढे कधीच दिले गेले नाही. इतिहास त्यांचे पुनर्मुल्यांकन करेल याची मला खात्री आहे. पण त्या काळात वित्तमंत्री म्हणून डॉ. सिंग यांनी केलेली कामगिरी दीर्घकाळ स्मरणात राहील.