शहरं
Join us  
Trending Stories
1
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
2
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
3
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
4
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
5
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
6
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
7
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
8
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
9
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
10
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
11
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
12
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन
13
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
14
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
15
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
16
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
17
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा
18
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
19
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
20
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!

स्मृती इराणींच्या कारने अपघात झाल्यानंतर चुकीचा वाहन क्रमांक देण्यासाठी दबाव

By admin | Updated: March 10, 2016 08:12 IST

पोलीस ठाण्यातील प्रमुखाने हा दबाव टाकल्याचा आरोप अपघातात मृत्यू झालेल्या डॉक्टर रमेश नागर यांच्या मुलाने हा आरोप केला आहे

ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. १० - केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांच्या गाडीने अपघात झाल्यानंतर पोलीस तक्रारीत गाडीचा चुकीचा क्रमांक देण्यासाठी आमच्यावर दबाव टाकला जात होता असा आरोप करण्यात आला आहे. पोलीस ठाण्यातील प्रमुखाने हा दबाव टाकल्याचा आरोप अपघातात मृत्यू झालेल्या डॉक्टर रमेश नागर यांच्या मुलाने केला आहे. 
 
अभिषेक नागरने याप्रकरणी राष्ट्रपती प्रणब मुखर्जींना पत्र लिहिलं आहे. अभिषेक नागरने राष्ट्रपतींना पत्र लिहून न्याय देण्याची मागणी केली आहे. स्मृती इराणींविरोधात कारवाई करण्यात नाही आली तर कुटुंबासोबत उपोषणाला बसण्याचा इशारादेखील अभिषेक नागरने दिला आहे. 
 
अपघातात माझ्या वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर ड्रायव्हरने तेथून पळ काढला आणि स्मृती इराणी दिल्लीच्या दिशेने रवाना झाल्या. माझ्या वडिलांचा मृतदेह तसाच ठेवून ते निघून गेले. त्यानंतर माझ्यावर पोलीस तक्रारीत DL 3C BA 5315 हा वाहन क्रमांक देण्यासाठी दबाव टाकण्यात आला. पण मी या क्रमांकाची कोणतीच गाडी पाहिलेली नव्हती. आणि या क्रमांकाची गाडी जर असेल तर मला ती पाहायची आहे. पोलीस स्टेशनच्या प्रमुखाने हा नंबर पोलीस तक्रारीत दिला नाही तर गुन्हा नोंद न करण्याची धमकी दिली. पोलिसांनी कार जप्त केल्याचा दावा केला मात्र दाखवण्यास नकार दिला असं या पत्रात लिहिलं गेलं आहे. 
 
पोलिसांनी मात्र अशाप्रकारे कोणताही दबाव टाकला गेल्याच्या आरोपाचं खंडन केलं आहे. कोणीही डॉक्टरच्या मुलावर दबाव टाकला नव्हता. त्यानेच दिल्लीत नोंद असलेल्या कारचा क्रमांक दिला असल्याची माहिती पोलिसांनी दिला आहे. 
याअगोदरही रमेश नागर यांची मुलगी संदिलीने स्मृती इराणींवर मदत न करताच गाडीतून निघून गेल्याचा आरोप केला आहे. कोणतीही वैद्यकीय मदत न मिळाल्याने माझ्या वडिलांचा मृत्यू झाला असल्याचं तिच म्हणणं आहे. आम्ही स्मृती इराणींकडे मदत मागितली मात्र त्यांनी दुर्लक्ष केलं. मी आणि माझा चुलत भाऊ रस्त्यावर मदतीची प्रतिक्षा करत उभे होतो. स्मृती इराणींच्या गाडीने आमच्या दुचाकीला ठोकर दिली. आमची दुचाकी खाली पडल्यावर आम्ही मदत मागितली. मात्र त्यांनी नकार दिला, त्यांनी सांगितल तुम्हा नंतर मदत मिळेल. जर त्यांनी मदत केली असती तर आज माझे वडील जिवंत असते असं संदिलीने सांगितलं आहे.