शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

राज्यघटनेचे पावित्र्य राखा : राष्ट्रपती

By admin | Updated: February 10, 2016 02:14 IST

राज्यघटनेचे पावित्र्य राखा, असे आवाहन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मंगळवारी राज्यपालांच्या दोनदिवसीय परिषदेचे उद्घाटन करताना केले. अरुणाचलमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यावरून

नवी दिल्ली : राज्यघटनेचे पावित्र्य राखा, असे आवाहन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मंगळवारी राज्यपालांच्या दोनदिवसीय परिषदेचे उद्घाटन करताना केले. अरुणाचलमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यावरून राज्यपालांच्या भूमिकेचा मुद्दा वादाच्या केंद्रस्थानी आला असताना मुखर्जी यांच्या आवाहनाला महत्त्व प्राप्त झाले आहे.घटनात्मक पदांवरील व्यक्तींनी राज्यघटनेने घालून दिलेल्या तत्त्वांना बांधील राहणे आवश्यक आहे. राज्यघटनेत लोकांच्या आकांक्षा प्रतिबिंबित होत असून त्याची पूर्तता करण्यासाठी सर्वसमावेशक असे मार्गही दाखविले आहेत. घटनात्मक पदांवर असलेल्या सर्वांना राज्यघटनेचे प्रावित्र्य राखणे अपरिहार्य ठरते, असे ते राष्ट्रपती भवनात आयोजित राज्यपालांच्या परिषदेला संबोधित करताना म्हणाले. राज्यपाल जे.पी. राजखोवा यांनी अरुणाचलमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केल्यानंतर हा वाद सर्वोच्च न्यायालयात गेल्याच्या पार्श्वभूमीकडे त्यांनी अप्रत्यक्षरीत्या अंगुलीनिर्देश केल्याचे मानले जाते. आंतरराष्ट्रीय मुद्दे चर्चेतून सोडविण्याचे प्रयत्न कायम ठेवावे लागतील, असेही ते म्हणाले. या परिषदेला २३ राज्यपाल आणि नायब राज्यपाल उपस्थित होते.दुष्काळाकडे वेधले लक्ष...लागोपाठ दोन वर्षे अपुऱ्या पावसामुळे देशाला दुष्काळाचा फटका बसला आहे. कोरड्या दुष्काळाचा परिणाम कृषी उत्पादन घटण्यात होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी युद्धस्तरावर प्रयत्न करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना पिकांची जोखीम उचलता यावी यासाठी नुकतीच प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू करण्यात आली आहे. अशा प्रयत्नांतून शेतकऱ्यांना दिलासा देण्याला सर्वोच्च प्राधान्य द्यायला हवे. वातावरणाच्या लहरीपणावर मात करण्यासाठी कृषी संशोधन संस्थांनी धान्य आणि अन्य पिकांचे दुष्काळात तग धरू शकणारे वाण विकसित करायला हवे, असेही राष्ट्रपती म्हणाले.