नवी दिल्ली : नरेंद्र मोदी सरकारचा वेगाने निर्णय घेण्यावर विश्वास असल्याचे सांगून, सरकारचे काम अडथळे उभे करणो नसून उद्योजक व उद्योगाला चालना देण्याचे असल्याचे प्रतिपादन केंद्रीय सूचना व माहितीमंत्री प्रकाश जावडेकर यांनी येथे केले. ते प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसोबत बोलत होते. त्यांनी यावेळी ग्राहकांच्या हितासाठी सरकार व उद्योग जगताने मिळून काम केले पाहिजे असे मत व्यक्त केले.
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या मंत्र्यांना सांगितले आहे की, कार्य करताना विलंब हा शब्द काढून टाका आणि आता त्यानुसार कामे सुरू आहेत. उद्योग जगत व सरकार या दोघांनीही ग्राहकांचा विचार केला पाहिजे आणि त्या उद्दिष्टाला साध्य करण्यासाठी सरकार सोयी उपलब्ध करून देत असते असेही त्यांनी पुढे नमूद केले.
(लोकमत न्यूज नेटवर्क)