शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

सात एप्रिलपर्यंत टळली शक्तिपरीक्षा

By admin | Updated: March 31, 2016 03:31 IST

उत्तराखंडमध्ये हरीश रावत यांच्या सरकारची गुरुवारी होणारी शक्तिपरीक्षा ७ एप्रिलपर्यंत टळली आहे. एकल पीठाने यापूर्वी दिलेल्या आदेशाला नैनीताल उच्च न्यायालयाच्या

नवी दिल्ली/ डेहराडून : उत्तराखंडमध्ये हरीश रावत यांच्या सरकारची गुरुवारी होणारी शक्तिपरीक्षा ७ एप्रिलपर्यंत टळली आहे. एकल पीठाने यापूर्वी दिलेल्या आदेशाला नैनीताल उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने बुधवारी स्थगिती दिल्यामुळे राजकीय नाट्याला नवे वळण मिळाले आहे.न्या. यू.सी. ध्यानी यांनी रावत सरकारला ३१ मार्च रोजी विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचा आदेश मंगळवारी दिला होता. त्याला केंद्र सरकारने आव्हान दिले असता मुख्य न्यायाधीश के.एम. जोसेफ आणि न्या. व्ही. के. बिश्त यांच्या खंडपीठाने त्याला स्थगिती दिली. राष्ट्रपती राजवटीबाबत न्यायालये हस्तक्षेप करू शकत नाही, असा युक्तिवाद अ‍ॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी केंद्राच्या वतीने केला. खंडपीठाने याआधीच्या आदेशाला ७ एप्रिलपर्यंत स्थगिती दिली असल्याचे केंद्राचे वकील नलीन कोहली यांनी सांगितले. पुढील सुनावणी ६ एप्रिल रोजी होणार आहे. याआधी २८ मार्च रोजी रावत सरकार विश्वास प्रस्ताव सादर करणार होते, मात्र आधीच्या दिवशीच केंद्राने घटनात्मक यंत्रणा कोलमडल्याचा दावा करीत राष्ट्रपती राजवट लागू केली. उद्या सुनावणी... दरम्यान, न्या. ध्यानी यांनी काँग्रेसच्या नऊ बंडखोर आमदारांच्या याचिकेवर १ एप्रिल रोजी सुनावणी ठेवली आहे. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर विधानसभाध्यक्ष गोविंदसिंग कुंजवाल यांनी अपात्र ठरविल्याबद्दल या आमदारांनी आव्हान दिले. आमदारांना अपात्र ठरविले असतानाही मतदानात सहभागी होण्याची मुभा देत यापूर्वीच न्यायालयाने दिलासा दिला आहे, असे न्या. ध्यानी यांनी स्पष्ट केले.(लोकमत न्यूज नेटवर्क)केंद्राला राष्ट्रपती राजवटीची एवढी घाई का?केंद्र सरकारला या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची एवढी घाई का झाली, याचे स्पष्टीकरण द्यावेच लागेल, असे उच्च न्यायालयाने बुधवारी ठामपणे बजावले. केंद्राने उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करीत देशाला चुकीचा संदेश दिला आहे, असेही खंडपीठाने म्हटले.काँग्रेसशासित राज्यात राष्ट्रपती राजवट का लागू करण्यात आली? याबाबत स्पष्टीकरणाची संधी केंद्राला दिली जावी, असा युक्तिवाद रोहतगी यांनी केला होता. सरकारची परीक्षा विधानसभेत घेणे हा चांगलाच पर्याय आहे. राजकीय कारणांमुळे कलम ३५६ चा वापर करीत राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ नये हे बघणे आपले काम आहे, असे न्यायालयाने नमूद केले.काँग्रेसने आत्मपरीक्षण करावे- नायडूकेंद्र सरकारला दोष देण्याऐवजी आपले आमदार पक्षाला का सोडून जात आहेत? याबाबत काँग्रेसने आत्मपरीक्षण करावे, असे केंद्रीय मंत्री एम. वेंकय्या नायडू यांनी बुधवारी स्पष्ट केले. दिल्लीतील आपचे सरकार मोदींना पाडायचे आहे, असे विधान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केल्याबद्दल नायडूंनी त्यांच्यावरही शरसंधान साधले.