शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

सीमा न ओलांडताही शत्रूवर हल्ला शक्य

By admin | Updated: September 23, 2016 11:12 IST

भारतावर नुकताच पाकिस्तानने केलेला हल्ला हे पाकिस्तानने पुकारलेले अघोषित युद्ध प्रकारात मोडते. या हल्ल्याच्या संदर्भात भारतीय लष्कराकडून कोणतीही चूक झाली असे म्हणता येणार नाही.

- लेफ्टनंट जनरल (निवृत्त ) डी.बी. शेकटकर 
भारतावर नुकताच पाकिस्तानने केलेला हल्ला हे पाकिस्तानने पुकारलेले अघोषित युद्ध प्रकारात मोडते. त्यामुळे या हल्ल्याच्या संदर्भात भारतीय लष्कराकडून कोणतीही चूक झाली असे म्हणता येणार नाही. काश्मिरच्या ज्या भागात आता युद्ध झाले येथील उरीचे भौगोलिक क्षेत्रही भारतासाठी अतिशय जोखमीचे आहे. याठिकाणी असणा-या डोंगराळ भागावर पाकिस्तानचे सैन्य असते तर या डोंगरांच्या मधल्या भागात भारताचे सैन्य असते. त्यामुळे त्यांची कोणतीही चाल ही भारतासाठी कायमच धोक्याची असते. तसेच हा सर्व प्रदेश जंगलभाग असल्याने या भागातील परिस्थिती आणखी जोखमीची असते. 
 
आता झालेला हल्ला हा अतिशय नियोजनपूर्व करण्यात आला असून अशाप्रकारचे भ्याड हल्ले करण्यात पाकिस्तान कायमच आघाडीवर राहीलेले आहे. आता घडलेल्या घटनेमध्ये भारताची चूक आहे असे म्हणता येणार नसले तरीही अशाप्रकारचे हल्ले घडू नयेत यासाठी आपण काळजी घ्यायला हवी. अशाप्रकारे शत्रूकडून झालेल्या हल्ल्यात भारताचे इतके जवान शहीद होणे ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. पहाटेच्या झोपेच्या वेळेत आपले सैन्य आगीच्या भक्षस्थानी सापडणे ही अतिशय वाईट घटना आहे. 
 
आणखी वाचा 
 
मात्र येत्या काळात पाकिस्तान ज्याप्रमाणे अघोषित युद्ध पुकारते त्याचप्रमाणे भारतालाही काही पाऊले उचलावी लागतील. त्यामुळे फाईट अ टेररीस्ट लाईक अ टेररीस्ट या तत्वानूसार भारताला येत्या काळात आपले धोरण बनवावे लागेल. त्यामुळे त्यांच्याच पद्धतीने आपल्याला आपल्याही नितीमध्ये येत्या काळात बदल करावा लागेल. ते ज्याप्रमाणे आपल्या भागात आक्रमण करतात त्याप्रमाणे आपण त्यांच्या भागात का आक्रमण करु शकत नाही या प्रश्नाचा विचार करण्याची वेळ आता आली आहे. यामध्ये सीमा न ओलांडताही सैन्याच्या वस्त्यांवर हल्ले करता येणे शक्य आहे. 
 
याशिवाय भारतातील स्थानिकांना पैसे देऊन त्यांच्याकडून सैन्य आपल्या फायद्याची अनेक कामे करुन घेते. अशाप्रकारचा प्रयत्न शत्रूला लक्ष्य करण्यासाठी भारतही करु शकतो, मात्र आपल्याकडून त्यादृष्टीने कोणताही प्रयत्न केला जात नाही. आपल्याकडील प्रगत तंत्रज्ञान आणि उपलब्ध शस्त्रसाठा हा अतिशय उच्च दर्जाचा असून त्याचा तितक्या चाणाक्ष पद्धतीने वापर केला जात नाही. त्यामुळे या सर्व बाबतीत भारतानेही पाकिस्तानप्रमाणे काही धोरणे निश्चित करायला हवीत. 
पाकिस्तानचे भारताबरोबर घोषित युद्ध पुकारण्याचे धाडस नसल्याने ते अशाप्रकारचे हल्ले करत आहेत. मात्र येत्या काळात शत्रूच्या शक्तीबरोबरच त्याच्या कमतरता ओळखून चाल करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे सैन्याकडे असलेल्या क्षमतांबरोबरच येत्या काळात अतिशय चाणाक्ष पद्धतीने पुढील पाऊले उचलणे हे भारतीय सैन्यापुढील आव्हान असेल. 
 
शब्दांकन - सायली जोशी पटवर्धन