शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
9
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
10
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
11
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
12
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
13
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

दिल्लीत गाडयांच्या सम-विषम योजनेला सकारात्मक प्रतिसाद

By admin | Updated: January 1, 2016 14:28 IST

एक दिवसाआड सम आणि विषम क्रमांकाच्या गाडयांना परवानगी देण्याच्या योजनेची राजधानी दिल्लीमध्ये आजपासून अंमलबजावणी सुरु झाली आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १ - सम आणि विषम तारखेनुसार दिल्लीच्या रस्त्यावर एक दिवसाआड सम आणि विषम क्रमांकाच्या गाडयांना परवानगी देण्याच्या योजनेची राजधानी दिल्लीमध्ये आजपासून अंमलबजावणी सुरु झाली आहे. मागच्या महिन्याभरापासून या सम आणि विषम फॉर्म्युला देशभरामध्ये चर्चा सुरु होती. 
पहिल्यादिवशी या योजनेला दिल्लीकरांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे दिसून येत आहे. १ ते १५ जानेवारी दरम्यान सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत सम-विषम फॉर्म्युल्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. प्रायोगिक तत्वावर या योजनेचे यश-अपयश पाहून पुढील निर्णय घेण्यात येईल. 
दिल्लीतील प्रदूषणाची पातळी धोकादायक स्तरापर्यंत पोहोचल्याने प्रदूषण कमी करण्यासाठी दिल्ली सरकार गाडयांसाठी सम-विषम फॉर्म्युला राबवत आहे. दिल्लीमध्ये मोठया संख्येने असलेल्या खासगी गाडया कमी झाल्या तर, प्रदूषण नियंत्रणात येईल असे दिल्ली सरकारचे मत आहे. 
 दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ही योजना यशस्वी ठरल्याचा दावा केला असला तरी, विरोधकांनी मात्र त्यांना श्रेय देण्यास नकार दिला. नाताळची सुट्टी संपून शाळा सुरु होतील त्यावेळी खरे यश-अपयश समोर येईल असे विरोधकांनी सांगितले. 
आज विषम तारीख असल्याने विषम क्रमांकाच्या गाडया रस्त्यावर आहेत. नियम मोडणा-या वाहनचालकाकडून दोन हजार रुपये दंड वसूल करण्यात येईल.