शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

दीपनगर प्रशासनाला प्रदूषण विभागाची नोटीस

By admin | Updated: November 25, 2015 00:02 IST

शेतकर्‍यांची तक्रार : नासिक प्रादेशिक अधिकारी कार्यालयाकडे अहवाल सादर

शेतकर्‍यांची तक्रार : नासिक प्रादेशिक अधिकारी कार्यालयाकडे अहवाल सादर
जळगाव : दीपनगर प्रकल्पातून बाहेर पडणार्‍या राखेमुळे परिसरातील पिकांचे नुकसान होत असल्याच्या तक्रारीवरून प्रदूषण विभागातर्फे प्रकल्पाला नुकतीच नोटीस बजावण्यात आली होती याबाबतचा अहवाल उपप्रादेशिक कार्यालयाने नाशिक प्रादेशिक अधिकारी कार्यालयात २४ रोजी सादर करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दीपनगर प्रकल्पातून निघाणार्‍या राखेमुळे कठोरा बुद्रुक, कठोरा खुर्द, फुलगाव, पिंपरीसेकम व जाडगाव परिसरातील शेती परिसरातील पिकांवर विपरित परिणाम होत असल्याची तक्रार १५ आक्टोबर रोजी जिप सदस्य राजेंद्र साहेबराव चौधरी व शेतकर्‍यांनी उपप्रादेशिक प्रदूषण मंडळाकडे केली होती. त्या अनुषंगाने प्रदूषण क्षेत्र अधिकारी नितीन सोनवणे यांनी शेतकरी, दीपनगर प्रकल्पाचे चीफ केमीस्ट सोनवणे, कनिष्ठ अभियंता मेश्राम यांच्या उपस्थितीत पहाणी केली असता जमीन व पिकांवर राख आढळून आली होती. यावेळी प्रकल्पात केलेल्या पहाणी मध्ये. प्रकल्पाच्या हवा प्रदूषण रोखणारी यंत्रणा ई.एस.पी (इलेक्ट्रो स्टॅटीक प्रेसीपीटेटर) च्या २० पैकी ३ उपकरण बंद आढळून आले होते. राज्यातील सर्वच थर्मल पावर स्टेशन मध्ये ही. ईएसपी यंत्रणा कार्यान्वित आहे.ती सद्याची हवा प्रदूषण रोखणारी प्रभावी यंत्रणा आहे. प्रकल्पात कोरडी राख बाहेर काढण्यासाठीच्या पाईपात सुद्धा लिकेज आढळून आला होता. याबबत उपप्रदेशिक प्रदूषण अधिकारी ए.एम.करे यांनी तत्काळ १६ ऑक्टोबर रोजी दीपनगर प्रशासनाला या बद्दल कारणे दाखवा नोटीस बाजावली होती.
जुन्या संचातून प्रदूषण
प्रकल्पाच्या कार्यान्वित चार संचांपैकी संच क्र २ व ३ मधून प्रदूषण अधिक होत असते. हे संच २५ वर्षांपेक्षा अधिक जुने आहेत. मंडळातर्फे १९मार्च,२८ मे,२७ जुलै, २१ ऑगस्ट या वेगवेगळ्या दिवसात संच २ व ३ परिसरात केलेल्या परीक्षणात राखेचे प्रदूषणाची नोंद करण्यात आली होती त्यात १९ मार्च व २१ ऑगस्ट रोजी मोठ्या प्रमाणात आढळून आले होते.
प्रादेशिक कार्यालयात अहवाल
उपप्रादेशिक प्रदूषण विभागाचे क्षेत्र अधिकारी चौधरी यांनी याबाबत सखोल अहवाल तयार करून पुढील कारवाईसाठी नाशिकच्या प्रदेशिक अधिकारी कार्यालयात २४ रोजी अहवाल सादर केला.