शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

मतदान गुप्ततेसाठी नवी यंत्रणा आणणार

By admin | Updated: January 22, 2016 02:52 IST

कोणत्या भागात कोणत्या पक्षाला किती मते पडली (व्होटिंग पॅटर्न) याबाबत गुप्तता राखणारी नवी यंत्रणा आणण्यासाठी निवडणूक नियमांत बदल करण्याचा प्रस्ताव निवडणूक आयोगाने सरकारकडे ठेवला आहे.

नवी दिल्ली : कोणत्या भागात कोणत्या पक्षाला किती मते पडली (व्होटिंग पॅटर्न) याबाबत गुप्तता राखणारी नवी यंत्रणा आणण्यासाठी निवडणूक नियमांत बदल करण्याचा प्रस्ताव निवडणूक आयोगाने सरकारकडे ठेवला आहे.सध्या इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनवरील(इव्हीएम) मते मतदानकेंद्र निहाय मोजली जात असल्यामुळे विविध वस्त्या आणि पट्ट्यात किती मतदान झाले ते प्रत्येकाला कळून चुकते. एखादा लोकप्रतिनिधी संबंधित वस्तीतून मते न मिळाल्यामुळे त्या भागाशी भेदभाव करू शकतो. या सर्वांची परिणती तेथील मतदारांमध्ये दहशत निर्माण करणे किंवा तेथील लोकांना बळी ठरविण्यातही होऊ शकते, असा सूर व्यक्त झाला आहे. यावर मात करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन आॅफ इंडिया लिमिटेड आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या दोन मशीन निर्मात्या कंपन्यांनी ‘टोटलायझर’ ही नवी यंत्रणा विकसित केली आहे. प्रत्येक मशीनमधील मते उघड न करता १४ ईव्हीएमचा गट तयार करून गठ्ठा मते जाहीर करण्याची पद्धत अवलंबली जाऊ शकते. (लोकमत न्यूज नेटवर्क)नवी यंत्रणा आणून जवळपास दशक होत आहे, मात्र अद्यापही प्रस्ताव सरकारकडे प्रलंबित आहे. मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी आणि कायदा मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ५ जानेवारी रोजी झालेल्या बैठकीत निवडणूक घेण्यासंबंधी नियम १९६१ मध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्याची विनंती आयोगाने सरकारला केली आहे.टोटलायझर यंत्रणेचा वापर केल्यामुळे मतांबाबत गोपनीयता राखण्यासह मतमोजणीच्यावेळी सर्व मते मिसळण्याची प्रक्रिया पार पाडता येते. निवडणूक मंडळात कायदा मंत्रालयाकडे प्रशासकीय जबाबदारी असते.विधि आयोगाकडूनही समर्थन...गेल्यावर्षी मार्चमध्ये विधी आयोगानेही निवडणूक सुधारणांसंबंधी अहवाल सादर करताना नव्या मशीनच्या वापराचे समर्थन केले होते. निवडणूक नियमांत सुधारणा केल्यास निवडणूक आयोगाला टोटलायझरचा वापर करीत मते मिसळणे शक्य होणार आहे. एखाद्या मतदारसंघातील विशिष्ट वस्ती किंवा भागाशी भेदभाव करण्याचे प्रकार टाळता येतील, अशी शिफारस या आयोगाने अहवालात केली आहे.