शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

भ्रष्ट न्यायाधीशांना राजकीय पक्षांचा वरदहस्त - मार्कंडेय काटजू

By admin | Updated: July 21, 2014 14:08 IST

भ्रष्ट न्यायाधीशाला राजकीय पक्षाने पाठिंबा दिल्याचा खुलासा करत न्यायव्यवस्थेतही भ्रष्टाचार होत असल्याचा खळबळजनक दावा प्रेस काऊन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष व सर्वोच्च न्यायलयाचे माजी न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांनी केला आहे.

ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. २१ - भ्रष्ट न्यायाधीशाला राजकीय पक्षाने वरदहस्त दिला असून भ्रष्टाचाराचे असंख्य आरोप असलेल्या एका न्यायाधीशाला बढती देण्यात आली आहे असा गौप्यस्फोट प्रेस काऊन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष व सर्वोच्च न्यायलयाचे माजी न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांनी केला आहे. काटजू यांच्या दाव्यामुळे न्यायव्यवस्थेतील भ्रष्टाचाराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.  
मार्कंडेय काटजू यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये न्यायव्यवस्थेतील भ्रष्टाचाराचा मुद्दा मांडला आहे. 'संबंधित न्यायाधीशाच्या कार्यकाळात मद्रास उच्च न्यायालयातील अनेक न्यायाधीशांनी त्याच्याविरोधात अनेक तक्रारी नोंदवल्या होत्या. मात्र मद्रास उच्च न्यायालयाच्या एका चीफ जस्टिसने अधिकार वापरत ही सर्व प्रकरणे रद्द ठरवत त्या न्यायाधीशाला अ‍ॅडिशनल जज बनवल्याचे काटजू यांनी सांगितले. २००४ साली आपण मद्रास उच्च न्यायालयाचे चीफ जस्टिस बनेपर्यंत तो न्यायाधीश पदावर कायम होता, असेही ते म्हणाले.' 
त्या संबंधित न्यायाधीशाने तामिळनाडूतील एका महत्वाच्या राजकीय नेत्याला एका प्रकरणात जामीन दिल्याने त्याचा त्याला भक्कम पाठिंबा होता, असे आपल्याला समजल्याचेही काटजूंनी नमूद केले आहे. 
या संबंधित न्यायाधीशाविरोधात भ्रष्टाचाराचे अनेक रिपोर्ट्स मिळाल्यानंतर आपण चीफ जस्टिस ऑफ इंडिया, जस्टिस आर.सी.लहोटी यांच्याकडे या प्रकरणी गुप्तपणे आयबी चौकशी करण्याची मागणी केली होती. काही दिवसांनंतर मला लाहोटी यांचा फोन आला व त्या न्यायाधीशाविरोधात मी केलेली तक्रार योग्य असल्याचे व तो भ्रष्टाचारात सामिल असल्याचे पुरावे मिळाल्याचे त्यांनी मला सांगितले.
त्या न्यायाधीशाचा अ‍ॅडिशनल जज म्हणून दोन वर्षांचा कालावधी लवकरच संपणार होता. त्यामुळे आयबी रिपोर्टच्या आधारावर त्या न्यायाधीशाला उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून काम करण्यास मनाई करण्यात येईल असे मला वाटले होते. मात्र घडले उलटेच. त्या न्यायाधीशाचा अ‍ॅडिशनल जज म्हणून काम करण्याचा कालावधी एका वर्षाने वाढवण्यात आला', असेही काटजूंनी सांगितले. 
हे नेमके कसे झाले याचा उलगडा मला काही काळाने झाला. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नेमणुकीसाठी एक कॉलेजियम प्रणाली असते ज्यात सर्वोच्च न्यायालयातील सर्वात वरिष्ठ अशा पाच न्यायाधीशांचा समावेश असतो तर उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या सेमणुकीसाठी कॉलेजियममध्ये तीन वरिष्ठ न्यायाधीशांचा समावेश असतो. त्यावेळी चीफ जस्टिस ऑफ इंडिया जस्टिस आर.सी.लहोटी, जस्टिस वाय. के. सबरवाल आणि जस्टिस रुमा पाल हे सर्वोच्च न्यायालयाचे सर्वात वरिष्ठ असे तीन न्यायाधीश होते. सर्वोच्च न्यायालयाच्या या कॉलेजियमने 'आयबीच्या प्रतिकूल रिपोर्टच्या आधारावर' त्या न्यायाधीशाचा दोन वर्षांचा कालावधी संपल्यानंतर त्याला जज म्हणून बढती मिळू नये अशी शिफारस केंद्र सरकारकडे  केली होती. त्यावेळी केंद्रात युपीएचे सरकार होते. काँग्रेस त्यातील सर्वात मोठा पक्ष असला तरीही त्यांच्याकडे लोकसभेत बहुमत नसल्याने ते इतर पक्षांच्या पाठिंब्यावर उभे होते. काँग्रेसला समर्थन देणा-यांमध्ये तामिळनाडूतील त्या पक्षाचाही समावेश होता, जो या न्यायाधीशाला पाठिंबा देत होता. त्यामुळे त्या पक्षाने त्या तीन न्यायाधीशांच्या कॉलेजियमने घेतलेल्या निर्णयाचा जोरदार विरोध केला. 
मला मिळालेल्या माहितीनुसार, 'त्यावेळी पंतप्रधान मनमोहन सिंग हे संयुक्त राष्ट्रांच्या सभेसाठी न्यू यॉर्क येथे जाणार होते. तामिळनाडूतील त्या राजकीय पक्षाच्या मंत्र्यांनी दिल्ली विमानतळावर पंतप्रधानांची भेट घेतली व त्या न्यायाधीशाविरोधात कारवाई झाल्यास, तुम्ही परत येईपर्यंत तुमचे सरकार पडलेले असेल,' असा इशारा दिला. यामुळे मनमोहन सिंग हे चिंतित झाले, मात्र काँग्रेसच्या एका वरिष्ठ मंत्र्याने त्यांना चिंता न करण्याचा सल्ला देत आपण सर्व सांभाळून घेऊ असे आश्वासन दिले. त्यानंतर त्या मंत्र्याने चीफ जस्टिस लहोटी यांची भेट घेतली व त्या न्यायाधीशाचा कार्यकाळ न वाढवल्यास केंद्र सरकार संकटात सापडेल, असे सांगितले. यानंतर जस्टिस लहोटी यांनी त्या न्यायाधीशाचा कार्यकाळ एका वर्षाने वाढवण्यासंबधी  भारत सरकारला पत्र लिहिले. अशा प्रकारे त्या भ्रष्ट न्यायाधीशावर कोणतीही कारवाई न होता एका वर्षाचा अधिक कालावधी मिळाला. त्यानंतर पुढील चीफ जस्टिस ऑफ इंडिया के. जी. बालकृष्णन यांनी त्या न्यायाधीशाची दुस-या उच्च न्यायालयात कायमस्वरुपी न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली.