शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
3
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
4
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
5
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
6
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
7
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
8
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
9
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
10
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
11
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
12
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
13
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
14
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
15
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
16
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
17
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
18
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
19
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
20
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?

भरपूर धान्यसाठा, घाबरण्याचे कारण नाही -जेटली

By admin | Updated: June 4, 2015 23:18 IST

अपुऱ्या मान्सूनमुळे दुष्काळाची स्थिती निर्माण होईल किंवा महागाई वाढेल असा निष्कर्ष काढून अतिशयोक्तीपूर्ण चित्र उभे करणे अयोग्य आहे.

नवी दिल्ली : अपुऱ्या मान्सूनमुळे दुष्काळाची स्थिती निर्माण होईल किंवा महागाई वाढेल असा निष्कर्ष काढून अतिशयोक्तीपूर्ण चित्र उभे करणे अयोग्य आहे. देशात कोणत्याही आकस्मिक परिस्थितीला तोंड देण्याजोगा धान्याचा मुबलक साठा असल्यामुळे घाबरण्याजोगी कुठलीही परिस्थिती नाही, असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गुरुवारी स्पष्ट केले.हवामान विभागाने यंदा अपुऱ्या पावसाचा अंदाज वर्तवल्यानंतर गेल्या ४८ तासांत अतिशय निराशाजनक स्थिती निर्माण होईल असे चित्र उभे केले जात असल्यामुळे या मुद्यावर अर्थमंत्रालयाचे मत व्यक्त करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. गेल्या तीन दिवसांत शेअर बाजार कोसळला पण तो काही कल (ट्रेंड) म्हणता येणार नाही. विशेषत: अप्रत्यक्ष कर हा मुख्य निर्देशक असून या करवसुलीत मोठी वाढ झाली आहे. देशाच्या अन्य भागात मान्सून सर्वसामान्य राहणार असून वायव्य भागात सामान्यापेक्षा कमी राहणार असल्याने फटका बसणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे, मात्र प्रत्यक्षात धान्य उत्पादनावर फार मोठा परिणाम होणार नाही, कारण या भागात चांगल्याप्रकारे सिंचनाची सुविधा आहे, असेही ते म्हणाले.जेटली म्हणाले, विपर्यस्तपणे अंदाज वर्तवला जात असल्याचे आढळून येते. मान्सूनची भौगोलिक विभागणी आणि पावसाचा कालवधी ही बाबही महत्त्वपूर्ण ठरते. हवामान विभागाने मंगळवारी दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत ८८ टक्के पाऊस होण्याचा अंदाज वर्तवल्यानंतर रिझर्व्ह बँकेने महागाईवर अंकुश ठेवण्यासाठी आकस्मिक योजना तयार ठेवण्याचा सल्ला दिला होता. सेन्सेक्स १०३५.५७ अंकांनी कोसळल्याची बाबही याच अंदाजाशी जोडली गेली.