शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

योजनांचा गावनिहाय आराखडा करणार

By admin | Updated: September 26, 2014 23:15 IST

सीईओ काकाणी: सर्व अधिकार्‍यांनी सोमवार आणि शुक्रवारी मुख्यालयात रहावे

मयत, दुबार आणि स्थलांतरित मतदारांची नावे वगळल्याचा दावा
नाशिक : जिल्‘ात निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार विशेष मोहिमेअंतर्गत दोन लाख ४३ हजार ६२० मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी विलास पाटील यांनी दिली. विशेष म्हणजे, वगळलेल्या मतदारांमध्ये सर्वाधिक दोन लाख एक हजार ४६१ मतदार स्थलांतरित झाल्याने त्यांची नावे वगळल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातील तिसर्‍या टप्प्यातील प्रचार आटोेपला. त्यासंदर्भात विलास पाटील यांनी २४ एप्रिलच्या मतदानाची सर्व तयारी पूर्ण झाल्याचे सांगत, कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना राबविण्यात आल्याचे सांगितले. निवडणूक कर्मचारी व अधिकार्‍यांना दहा हजारांचे आगाऊ मानधन देण्यात आले असून, त्यात त्यांना जेवण, प्रवास व अन्य आवश्यक त्या बाबींसाठी खर्च करण्यास मुभा देण्यात आली आहे. गेल्या दीड वर्षापासून निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदार यादी स्वच्छ करण्यासाठी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत जिल्‘ातील दोन लाख ४३ हजार ६२० मतदारांची नावे वगळण्यात आल्याचा दावा पाटील यांनी केला आहे. त्यात २३ हजार १४ मतदार मयत, दोन लाख एक हजार ४६१ स्थलांतरित तसेच १८ हजार ५९३ मतदारांची नावे दुबार असल्याने ही सर्व नावे वगळण्यात आली आहेत. मात्र मूळ यादीत नाव असेल आणि सुधारित मतदार यादीत नाव नसल्यास अशा मतदारांची नावे प्रिंटर एरर (छपाई चूक) म्हणून पुन्हा सहभागी करण्यात येतील. मात्र नव्याने कोणत्याही मतदारांचा समावेश मतदार यादीत करण्यात येणार नाही, असे पाटील यांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे ५५२ मतदार अक्षरश: मतदार यादीतून गायब झाले आहेत. त्यांची नावे असूनही हे मतदार सापडत नाहीत. मागील वर्षी फोटो असलेली ८० टक्के मतदारसंख्या आता ९५ टक्क्यांच्या आसपास आहे. २४ तारखेला मतदानाच्या दिवशी व एक दिवस अगोदर एक विशेष पथक मतदारांच्या मदतीसाठी व त्यांची नावे मतदार यादीत शोधून देण्यासाठी कार्यरत राहणार आहे. यावेळी पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल, उपआयुक्त संदीप दिवाण, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गीतांजली बाविस्कर, जिल्हा माहिती अधिकारी प्रभाकर मुराळकर आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)