शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा निकाल लागताच राज ठाकरे वर्षा निवासस्थानी; CM देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
4
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
5
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
7
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
8
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
9
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
10
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
11
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
12
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
13
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
14
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
15
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
16
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
17
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
18
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
19
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
20
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...

योजनांचा गावनिहाय आराखडा करणार

By admin | Updated: September 26, 2014 23:15 IST

सीईओ काकाणी: सर्व अधिकार्‍यांनी सोमवार आणि शुक्रवारी मुख्यालयात रहावे

मयत, दुबार आणि स्थलांतरित मतदारांची नावे वगळल्याचा दावा
नाशिक : जिल्‘ात निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार विशेष मोहिमेअंतर्गत दोन लाख ४३ हजार ६२० मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी विलास पाटील यांनी दिली. विशेष म्हणजे, वगळलेल्या मतदारांमध्ये सर्वाधिक दोन लाख एक हजार ४६१ मतदार स्थलांतरित झाल्याने त्यांची नावे वगळल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातील तिसर्‍या टप्प्यातील प्रचार आटोेपला. त्यासंदर्भात विलास पाटील यांनी २४ एप्रिलच्या मतदानाची सर्व तयारी पूर्ण झाल्याचे सांगत, कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना राबविण्यात आल्याचे सांगितले. निवडणूक कर्मचारी व अधिकार्‍यांना दहा हजारांचे आगाऊ मानधन देण्यात आले असून, त्यात त्यांना जेवण, प्रवास व अन्य आवश्यक त्या बाबींसाठी खर्च करण्यास मुभा देण्यात आली आहे. गेल्या दीड वर्षापासून निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदार यादी स्वच्छ करण्यासाठी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत जिल्‘ातील दोन लाख ४३ हजार ६२० मतदारांची नावे वगळण्यात आल्याचा दावा पाटील यांनी केला आहे. त्यात २३ हजार १४ मतदार मयत, दोन लाख एक हजार ४६१ स्थलांतरित तसेच १८ हजार ५९३ मतदारांची नावे दुबार असल्याने ही सर्व नावे वगळण्यात आली आहेत. मात्र मूळ यादीत नाव असेल आणि सुधारित मतदार यादीत नाव नसल्यास अशा मतदारांची नावे प्रिंटर एरर (छपाई चूक) म्हणून पुन्हा सहभागी करण्यात येतील. मात्र नव्याने कोणत्याही मतदारांचा समावेश मतदार यादीत करण्यात येणार नाही, असे पाटील यांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे ५५२ मतदार अक्षरश: मतदार यादीतून गायब झाले आहेत. त्यांची नावे असूनही हे मतदार सापडत नाहीत. मागील वर्षी फोटो असलेली ८० टक्के मतदारसंख्या आता ९५ टक्क्यांच्या आसपास आहे. २४ तारखेला मतदानाच्या दिवशी व एक दिवस अगोदर एक विशेष पथक मतदारांच्या मदतीसाठी व त्यांची नावे मतदार यादीत शोधून देण्यासाठी कार्यरत राहणार आहे. यावेळी पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल, उपआयुक्त संदीप दिवाण, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गीतांजली बाविस्कर, जिल्हा माहिती अधिकारी प्रभाकर मुराळकर आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)