शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
3
कृषिमंत्री कोकाटे किती मिनिटे रमी खेळत होते?, विधिमंडळ चौकशी अहवालात उघड, रोहित पवारांचा दावा
4
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
5
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
6
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
7
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
8
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
9
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
10
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
11
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
12
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
13
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
14
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
15
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...
16
"दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं?
17
Reliance Jio ची आपल्या ग्राहकांना मोठी भेट; फक्त ₹५९९ मध्ये घरच्या TV ला बनवा कॉम्प्यूटर
18
PM किसान योजनेचा २० वा हप्ता जाहीर! २००० रुपये थेट बँक खात्यात, लगेच 'असं' तपासा तुमचं नाव!
19
UPI मध्ये १ ऑगस्टपासून होणार बदल; बॅलन्स चेक ते ऑटो-पे पर्यंत सर्वकाही बदलणार, पाहा तुमच्यासाठी काय नवं?
20
भीक मागणाऱ्या व्यक्तीच्या दोन बायका, आता त्याची तक्रार तर ऐका; कलेक्टरकडे पोहोचला अन् म्हणाला...

पिंपळगाव टोलनाका पुन्हा चर्चेत सोमवारपासून टोलवाढ : आंदोलनाचा इशारा

By admin | Updated: May 8, 2014 19:45 IST

नाशिक : गेल्या वर्षभरात दोन वेळा चर्चेचा ठरलेला राष्ट्रीय महामार्गावरील पिंपळगाव बसवंत येथील टोलनाका पुन्हा एकदा टोल दरवाढीने वादात सापडला असून, लोकसभेची रणधुमाळी संपताच टोल वसूल कंपनीने सोमवारपासून चौपटीने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. महामार्गावर अद्यापही कामे अपूर्ण असताना आकारल्या जाणार्‍या टोलला विरोध करण्याचा इशारा आमदार अनिल कदम यांनी दिला आहे.

नाशिक : गेल्या वर्षभरात दोन वेळा चर्चेचा ठरलेला राष्ट्रीय महामार्गावरील पिंपळगाव बसवंत येथील टोलनाका पुन्हा एकदा टोल दरवाढीने वादात सापडला असून, लोकसभेची रणधुमाळी संपताच टोल वसूल कंपनीने सोमवारपासून चौपटीने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. महामार्गावर अद्यापही कामे अपूर्ण असताना आकारल्या जाणार्‍या टोलला विरोध करण्याचा इशारा आमदार अनिल कदम यांनी दिला आहे.
निफाडचे आमदार अनिल कदम यांच्याशी झालेल्या वादानंतर पिंपळगाव बसवंत येथील टोलनाका राज्यात चर्चेत आला होता. त्यानंतर मार्च महिन्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होताच टोल वसूल करणार्‍या पी.एन.जी. या कंपनीने टोलदरात वाढ करण्यासाठी वर्तमानपत्रांतून जाहिरात दिली होती. टोलवाढीमुळे निवडणुकीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करतानाच, स्थानिक आमदार व जनतेने टोलवाढीविरुद्ध उठाव केला असता जिल्हाधिकार्‍यांनी मध्यस्थी करून स्थगिती देण्यात आली होती. आता पुन्हा कंपनीने सोमवारपासून टोलदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी वाहनांवर आकारण्यात येणार्‍या टोलच्या चौपट हा दर असून, त्यामुळे वाहनधारकांचे कंबरडेच मोडणार आहे. लहान वाहनांसाठी १४० रुपये, हलके व व्यावसायिक वाहनांसाठी २२० रुपये, बस व ट्रकसाठी ४४५ व अवजड वाहनांसाठी ६७५ रुपये एकेरी टोल आकारण्यात येणार आहे.
चौकट===
उड्डाणपुलामुळे टोलवाढ
ओझर-पिंपळगाव बसवंत येथील कामे अपूर्ण असली तरी, गेल्या वर्षी जूनमध्ये खुला करण्यात आलेला नाशिकमधील सर्वात लांबीच्या उड्डाणपुलामुळे पिंपळगाव बसवंत येथील टोलमध्ये वाढ करण्यात आली आहे. शासनाने तसा करारच केला असल्यामुळे टोल वसुलीशिवाय पर्यायच नाही. सध्या वाढविला जाणारा टोल हा फक्त कंपनीने जितके काम केले त्यावरच आकारला आहे.
- खोडस्कर, कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण
चौकट====
...तर जनआंदोलन
पी.एन.जी. टोलवे कंपनीने अनेक कायद्यांचा भंग केला असल्यामुळे पंतप्रधान कार्यालयाकडून या कंपनीची चौकशी सुरू आहे. अनेक ठिकाणची कामे कंपनीने पूर्ण केलेली नाहीत. ओझर व पिंपळगाव येथे उड्डाणपुलाचा प्रस्ताव असून, त्याची पूर्तता कंपनी करीत नाही. जोपर्यंत या ठिकाणी उड्डाणपूल होत नाही तोपर्यंत टोल आकारणी करू नये असे ठरले आहे. लोकभावना व लोकप्रतिनिधींच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून जर टोल आकारणी होणार असेल तर जनआंदोलन करण्यात येईल व त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कंपनीच जबाबदार राहील.
- अनिल कदम, आमदार