शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

NSG वरुन चीनला रोखण्यासाठी मोदींचा पुतीन यांना फोन

By admin | Updated: June 13, 2016 12:48 IST

आण्विक पुरवठादार समूहाच्या सदस्यत्वाला चीन करत असलेल्या विरोधाला मोडून काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी चर्चा केली आहे

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. 13 -  भारताच्या आण्विक पुरवठादार समूहाच्या (NSG) सदस्यत्वाला चीन करत असलेल्या विरोधाला मोडून काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रयत्न सुरु केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चीनला रोखण्यासाठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी चर्चा केली आहे. मोदींनी व्लादिमीर पुतीन यांना फोन करुन त्यांच्याशी चर्चा केली. 
 
 
रशियन सरकारने याबाबत निवेदन प्रसिद्ध केलं आहे. मोदी आणि पुतीन यांच्यात द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्याबाबत चर्चा झाल्याचं या निवेदनात सांगण्यात आलं आहे. जागतिक राजकारणात रशियाने नेहमीच भारताला पाठिंबा दिला आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत कायम सदस्यत्वासाठीही रशियाचा भारताला पाठिंबा आहे. भारत - अमेरिकेचे संबंध गेल्या काही दिवसांत सुधारले आहेत मात्र याचा रशियाच्या भुमिकेवर फारसा परिणाम झालेला नाही. 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पुतीन येत्या काही दिवसात भेटण्याची शक्यता आहे. दोन्ही देशातील महत्वाच्या तसंच सहकार्याच्या मुद्यांवर या भेटीत चर्चा होऊ शकते. येत्या काही दिवसांत एनएसजीच्या मुद्यावर पंतप्रधान मोदी उच्चस्तरीय बैठका घेऊ शकतात.
 
(NSG म्हणजे काय?)
 
दरम्यान पाकिस्‍तानचे परराष्‍ट्र विभाग सल्‍लागार सरताज अजीज यांनी एनएसजी सदस्यत्वासाठी भारताच्या तुलनेत पाकिस्तानची दावेदारी प्रबळ असल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे भारताला या गटाचे सदसत्व मिळू नये यासाठी आवश्यक ते प्रयत्न केले जात असून त्यात आम्हाला यश मिळेल, असा दावा पाकिस्तानच्या सरताज अजीज यांनी केला होता. 
 
नुकतच मेक्सिकोने अण्वस्त्र पुरवठादार गट अर्थात न्यूक्लियर सप्लायर्स ग्रुप (NSG) राष्ट्र समूहाच्या सदस्यत्वासाठी भारताला पाठिंबा दिला आहे. स्वित्झर्लंडनंतर मेक्सिकोनेही भारताला पाठिंबा दिल्याने भारताचा दावा बळकट झाला आहे. याअगोदर अमेरिकेनेही भारताला पाठिंबा दिला आहे. याचा परिणाम भारताला विरोध करणा-या चीनवर झाला असून तो एकाकी पडला आहे. 
 
एनएसजी सदस्यत्वासाठी भारताचा अर्ज
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ४ जूनपासून प्रारंभ होणाऱ्या अमेरिका दौऱ्याच्या पूर्वी भारताने अणू पुरवठा गटाचे (एनएसजी) सदस्यत्व मिळण्यासाठी औपचारिक अर्ज दाखल केला होता. पाकिस्तानने आपला अर्ज पाठविण्याच्या आठवडाआधी म्हणजे १२ मे रोजीच भारत सरकारने आपला अर्ज दाखल केला होता. भारताला एनएसजीचे सदस्यत्व मिळावे यासाठी पंतप्रधान मोदी हे स्वत: या ४८ सदस्यीय जागतिक संस्थेचे सदस्य असलेल्या जगभरातील राष्ट्रप्रमुखांना वारंवार फोन करून भारताची बाजू मांडत आले आहेत.