शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
3
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
4
"देशाला दिशा देण्याऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
5
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
6
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
7
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
8
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
9
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
10
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
11
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
12
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
13
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
14
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
15
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
16
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
17
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
18
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
19
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
20
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...

बागेत बहरला बारमाही आंबा ! आंबे लगडले : नागरिकांतून कुतूहल अन् आश्चर्यही

By admin | Updated: December 15, 2014 00:43 IST

लातूर : अगोदरच शहरात जागेची कमतरता. त्यातही सोन्याचा भाव जागेला असल्याने अनेकदा घरासमोर इंचभरही जागा व्यर्थ जाणार नाही, याची काळजी बांधकाम सुरू असतानाच घेतली जाते. काही तुरळक ठिकाणीच घराला लागून बगिचे केले जातात. लातुरातील बोधे नगर भागात एका प्राध्यापकाच्या घरी बारमाही आंबा बहरला आहे. सध्या या आंब्याच्या झाडाला मोहोरही बहरला असून, आंबेही लगडली आहेत. त्यामुळे रस्त्याने येणार्‍या-जाणार्‍या नागरिकांतून कुतूहल व्यक्त होत आहे.

लातूर : अगोदरच शहरात जागेची कमतरता. त्यातही सोन्याचा भाव जागेला असल्याने अनेकदा घरासमोर इंचभरही जागा व्यर्थ जाणार नाही, याची काळजी बांधकाम सुरू असतानाच घेतली जाते. काही तुरळक ठिकाणीच घराला लागून बगिचे केले जातात. लातुरातील बोधे नगर भागात एका प्राध्यापकाच्या घरी बारमाही आंबा बहरला आहे. सध्या या आंब्याच्या झाडाला मोहोरही बहरला असून, आंबेही लगडली आहेत. त्यामुळे रस्त्याने येणार्‍या-जाणार्‍या नागरिकांतून कुतूहल व्यक्त होत आहे. लातूर शहरातील बोधे नगर हा भाग नेहमीच गर्दीने फुललेला. परिसरात मोठ मोठ्या इमारतीही आहेत. रहिवाशांची संख्या अधिक असल्याने फारशी मोकळी जागा दिसून येत नाही. या ठिकाणी बोरी येथील कमला नेहरू उच्च माध्यमिक विद्यालयाचे उपप्राचार्य बस्वराज करकेली यांचे निवासस्थान आहे. त्यांनी घरासमोरच जवळपास १५ बाय २० च्या जागेत विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड केली आहे. त्यात पाच वर्षांपूर्वी एक आंब्याचे कलम त्यांनी लावले. सध्या आंब्याचे झाड मोठे झाले आहे. या आंब्याच्या झाडाला बारमाही मोहोर लागत आहे. त्याचबरोबर आंबेही लगडून गेली आहेत. जसजसे आंबे मोठे होतात, तसतसा झाडाला मोहोरही त्याच्या पटीत लागतो. हिवाळ्यात आंब्याचे उत्पादन सहसा कोठेही आढळून येत नाही. क्वचित ठिकाणी किरकोळ प्रमाणात आंबे लगडलेले असतात. इथे मात्र प्रा. करकेली यांच्या दारात बारा महिने आलेल्या पाहुण्यांना आंब्याचे दर्शन होते. कुतूहलाने अनेकजण झाडाच्या लागवडीपासून ते फळ लागेपर्यंतच्या मशागतीची चौकशीही करतात. कोठून तरी आणून लावलेले हे कलमाचे रोपटे आता वृक्ष झाले आहे. कलमी (तोतापुरी) आंब्याप्रमाणे ३०० ग्रॅमपेक्षा अधिक वजन असलेले आंबे सध्या झाडाला लगडले आहेत. दारासमोरच झाड असल्याने रस्त्याने येणारे-जाणारे लोक कुतूहलाने झाडाची पाहणी करतात. आंब्यामुळे वाढली मैत्री... दारातच आंब्याचे मोठे वृक्ष आहे. रस्त्याने येणार्‍या-जाणार्‍या नागरिकांच्या नजरेस आंबे पडतात. मोहोरही बहरल्याचे ठळकपणे दिसते. त्यामुळे काहीजण जाणीवपूर्वक दारात उभे राहून चौकशी करतात. घरात कोणी नसेल तर लहान मुले कुतूहलाने आंबे तोडून घेऊन जातात. अनोळखी लोकांकडून विचारपूस होत असल्याने नव्याने ओळखी वाढल्या आहेत. विचारपूस वाढल्याने नवे मित्रही जोडले गेले असल्याचे प्रा. बस्वराज करकेली यांनी सांगितले.