शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
ट्रम्प यांनी दंड थोपटले! अमेरिकेच्या तीन युद्ध नौका व्हेनेझुएलाच्या दिशेने रवाना; ४००० सैन्यही सज्ज
3
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
4
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
5
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
6
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
7
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
8
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
9
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
10
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
11
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
12
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
13
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
14
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
15
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
16
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
17
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
18
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
19
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
20
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा

बागेत बहरला बारमाही आंबा ! आंबे लगडले : नागरिकांतून कुतूहल अन् आश्चर्यही

By admin | Updated: December 15, 2014 00:43 IST

लातूर : अगोदरच शहरात जागेची कमतरता. त्यातही सोन्याचा भाव जागेला असल्याने अनेकदा घरासमोर इंचभरही जागा व्यर्थ जाणार नाही, याची काळजी बांधकाम सुरू असतानाच घेतली जाते. काही तुरळक ठिकाणीच घराला लागून बगिचे केले जातात. लातुरातील बोधे नगर भागात एका प्राध्यापकाच्या घरी बारमाही आंबा बहरला आहे. सध्या या आंब्याच्या झाडाला मोहोरही बहरला असून, आंबेही लगडली आहेत. त्यामुळे रस्त्याने येणार्‍या-जाणार्‍या नागरिकांतून कुतूहल व्यक्त होत आहे.

लातूर : अगोदरच शहरात जागेची कमतरता. त्यातही सोन्याचा भाव जागेला असल्याने अनेकदा घरासमोर इंचभरही जागा व्यर्थ जाणार नाही, याची काळजी बांधकाम सुरू असतानाच घेतली जाते. काही तुरळक ठिकाणीच घराला लागून बगिचे केले जातात. लातुरातील बोधे नगर भागात एका प्राध्यापकाच्या घरी बारमाही आंबा बहरला आहे. सध्या या आंब्याच्या झाडाला मोहोरही बहरला असून, आंबेही लगडली आहेत. त्यामुळे रस्त्याने येणार्‍या-जाणार्‍या नागरिकांतून कुतूहल व्यक्त होत आहे. लातूर शहरातील बोधे नगर हा भाग नेहमीच गर्दीने फुललेला. परिसरात मोठ मोठ्या इमारतीही आहेत. रहिवाशांची संख्या अधिक असल्याने फारशी मोकळी जागा दिसून येत नाही. या ठिकाणी बोरी येथील कमला नेहरू उच्च माध्यमिक विद्यालयाचे उपप्राचार्य बस्वराज करकेली यांचे निवासस्थान आहे. त्यांनी घरासमोरच जवळपास १५ बाय २० च्या जागेत विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड केली आहे. त्यात पाच वर्षांपूर्वी एक आंब्याचे कलम त्यांनी लावले. सध्या आंब्याचे झाड मोठे झाले आहे. या आंब्याच्या झाडाला बारमाही मोहोर लागत आहे. त्याचबरोबर आंबेही लगडून गेली आहेत. जसजसे आंबे मोठे होतात, तसतसा झाडाला मोहोरही त्याच्या पटीत लागतो. हिवाळ्यात आंब्याचे उत्पादन सहसा कोठेही आढळून येत नाही. क्वचित ठिकाणी किरकोळ प्रमाणात आंबे लगडलेले असतात. इथे मात्र प्रा. करकेली यांच्या दारात बारा महिने आलेल्या पाहुण्यांना आंब्याचे दर्शन होते. कुतूहलाने अनेकजण झाडाच्या लागवडीपासून ते फळ लागेपर्यंतच्या मशागतीची चौकशीही करतात. कोठून तरी आणून लावलेले हे कलमाचे रोपटे आता वृक्ष झाले आहे. कलमी (तोतापुरी) आंब्याप्रमाणे ३०० ग्रॅमपेक्षा अधिक वजन असलेले आंबे सध्या झाडाला लगडले आहेत. दारासमोरच झाड असल्याने रस्त्याने येणारे-जाणारे लोक कुतूहलाने झाडाची पाहणी करतात. आंब्यामुळे वाढली मैत्री... दारातच आंब्याचे मोठे वृक्ष आहे. रस्त्याने येणार्‍या-जाणार्‍या नागरिकांच्या नजरेस आंबे पडतात. मोहोरही बहरल्याचे ठळकपणे दिसते. त्यामुळे काहीजण जाणीवपूर्वक दारात उभे राहून चौकशी करतात. घरात कोणी नसेल तर लहान मुले कुतूहलाने आंबे तोडून घेऊन जातात. अनोळखी लोकांकडून विचारपूस होत असल्याने नव्याने ओळखी वाढल्या आहेत. विचारपूस वाढल्याने नवे मित्रही जोडले गेले असल्याचे प्रा. बस्वराज करकेली यांनी सांगितले.