शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
2
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
3
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
4
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
5
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
6
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
7
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
8
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
9
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
10
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
11
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
12
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
13
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
14
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
15
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
16
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
17
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
18
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
19
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
20
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे

अपेक्षापूर्ती केल्यास जनता डोक्यावर घेईल

By admin | Updated: June 2, 2014 06:05 IST

ही निवडणूक जनतेच्या अपेक्षांची निवडणूक होती. अपेक्षापूर्ती केल्यास जनता डोक्यावर घेईल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले

नवी दिल्ली : ही निवडणूक जनतेच्या अपेक्षांची निवडणूक होती. अपेक्षापूर्ती केल्यास जनता डोक्यावर घेईल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर मोदी पहिल्यांदाच भाजपाच्या मुख्यालयात आले. यावेळी ते कार्यकर्त्यांशी बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडे भारतात पार पडलेली लोकसभा निवडणूक देशासाठीच नव्हेतर संपूर्ण जगासाठी २१ व्या शतकातील निर्णायक घटना असल्याचे सांगून भाजपा सरकारने सामान्य नागरिकांच्या हितासाठी निष्ठेने काम केल्यास देशातील जनता त्यांच्याशी कधीही नाते तोडणार नाही. देशातील जनता १९६७ मध्येच काँग्रेसमुक्त झाली होती. परंतु त्यानंतर झालेल्या प्रयोगाने निराश होऊन परत काँग्रेसकडे वळली, असेही मोदी म्हणाले. जनता आपल्यापेक्षा दहा पावले पुढे आहे. त्यांच्या बरोबरीने कसे चालावे, आपली वागणूक कशी असावी हे बघणे आपले कर्तव्य आहे. त्यामुळे त्यांचा आपल्याप्रती विश्वास वाढीस लागेल. यापूर्वीच्या निवडणुकीत राजकारणापेक्षा जातीय समीकरणाची चर्चा होत असे, परंतु ही पहिली निवडणूक आहे. ज्यामध्ये जातीय समीकरण, भौगौलिक समीकरण आणि इतर परंपरागत समीकरणांना दूर सारून जनतेने जनादेश दिला, असे ते म्हणाले. ही निवडणूक जनतेच्या अपेक्षेची होती. हीच प्रेरणा आणि अपेक्षा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंतच्या जनतेला जोडत होती. त्यामुळे जनतेच्या अक्षेपांची पूर्ती करण्याची सरकार आणि भाजपाचे जबाबदारी आहे, असेही ते म्हणाले. (वृत्तसंस्था)