शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
3
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
4
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
5
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
6
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
7
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
8
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
9
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
10
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
11
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
12
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
13
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
14
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
15
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
16
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
17
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
18
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
19
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
20
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप

जनताच या गद्दाराला गाडेल - दिलीप लांडे

By admin | Updated: October 7, 2014 06:40 IST

विकासकामे, सर्वसामान्य-गोरगरिबांना भेडसावणारे प्रश्न सोडविण्याऐवजी कीर्तनात रमलेल्यांना जनताच गाडून टाकेल,

मुंबई : विकासकामे, सर्वसामान्य-गोरगरिबांना भेडसावणारे प्रश्न सोडविण्याऐवजी कीर्तनात रमलेल्यांना जनताच गाडून टाकेल, असा विश्वास घाटकोपर पश्चिम मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार दिलीप लांडे यांनी व्यक्त केला.काल श्रेयस सिग्लनजवळ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा झाली. या सभेतील भाषणात राज यांनी निवडणुकीच्या तोंडावर मनसेतून भाजपामध्ये उडी घेणाऱ्या राम कदम यांना गद्दार असे संबोधले. तो (राम कदम) आमच्यासाठी मेला, असे सांगत गद्दारांना थारा देऊ नका, असे वक्तव्य केले. कदम विधानसभेत कधी गेलेच नाहीत. त्यांनी आमदार निधीचा वापर मतदारसंघातील गोरगरिबांसाठी करण्याऐवजी फस्त केला. कशाला हवेत असे आमदार, अशी टीका राज यांनी केली.त्याआधी उमेदवार लांडे यांचे भाषण झाले. त्या वेळी कदम यांनी आमदार म्हणून निवडून येताच पक्ष संघटना खिळखिळी केली. त्यामुळे पक्षाने मला पक्षबांधणीची जबाबदारी दिली. जेव्हा मी या मतदारसंघात फिरलो तेव्हा येथे रस्ते, शौचालयांसह प्रत्येक मूलभूत सुविधांची बोंब आढळली. शौचालयांना साधे दरवाजेही नव्हते. ही अशी गाऱ्हाणी घेऊन येथील जनता मनसेच्या शाखेत येऊ लागली. त्यांच्या अडचणी मी ४८ तासांच्या आत सोडविल्या, असा दावा लांडे यांनी आपल्या भाषणात केला.या वेळी लांडे यांनी कदमांवर जोरदार टीका केली. या घरेलू कामगार महिलांच्या मुलांना ताज हॉटेलमध्ये जेवू घातल्याचा दावा कदम करतात. प्रत्यक्षात मात्र या मुलांना हॉटेलच्या बेसमेंटमध्ये बसविण्यात आले. घाटकोपरमधल्याच एका चायनिज सेंटरमध्ये बनलेले फ्राइड राइस, सूप कागदी थाळ्यांमध्ये वाढले गेले, असा दावा लांडे यांनी केला. (प्रतिनिधी)