शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

जनताच या गद्दाराला गाडेल - दिलीप लांडे

By admin | Updated: October 7, 2014 06:40 IST

विकासकामे, सर्वसामान्य-गोरगरिबांना भेडसावणारे प्रश्न सोडविण्याऐवजी कीर्तनात रमलेल्यांना जनताच गाडून टाकेल,

मुंबई : विकासकामे, सर्वसामान्य-गोरगरिबांना भेडसावणारे प्रश्न सोडविण्याऐवजी कीर्तनात रमलेल्यांना जनताच गाडून टाकेल, असा विश्वास घाटकोपर पश्चिम मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार दिलीप लांडे यांनी व्यक्त केला.काल श्रेयस सिग्लनजवळ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा झाली. या सभेतील भाषणात राज यांनी निवडणुकीच्या तोंडावर मनसेतून भाजपामध्ये उडी घेणाऱ्या राम कदम यांना गद्दार असे संबोधले. तो (राम कदम) आमच्यासाठी मेला, असे सांगत गद्दारांना थारा देऊ नका, असे वक्तव्य केले. कदम विधानसभेत कधी गेलेच नाहीत. त्यांनी आमदार निधीचा वापर मतदारसंघातील गोरगरिबांसाठी करण्याऐवजी फस्त केला. कशाला हवेत असे आमदार, अशी टीका राज यांनी केली.त्याआधी उमेदवार लांडे यांचे भाषण झाले. त्या वेळी कदम यांनी आमदार म्हणून निवडून येताच पक्ष संघटना खिळखिळी केली. त्यामुळे पक्षाने मला पक्षबांधणीची जबाबदारी दिली. जेव्हा मी या मतदारसंघात फिरलो तेव्हा येथे रस्ते, शौचालयांसह प्रत्येक मूलभूत सुविधांची बोंब आढळली. शौचालयांना साधे दरवाजेही नव्हते. ही अशी गाऱ्हाणी घेऊन येथील जनता मनसेच्या शाखेत येऊ लागली. त्यांच्या अडचणी मी ४८ तासांच्या आत सोडविल्या, असा दावा लांडे यांनी आपल्या भाषणात केला.या वेळी लांडे यांनी कदमांवर जोरदार टीका केली. या घरेलू कामगार महिलांच्या मुलांना ताज हॉटेलमध्ये जेवू घातल्याचा दावा कदम करतात. प्रत्यक्षात मात्र या मुलांना हॉटेलच्या बेसमेंटमध्ये बसविण्यात आले. घाटकोपरमधल्याच एका चायनिज सेंटरमध्ये बनलेले फ्राइड राइस, सूप कागदी थाळ्यांमध्ये वाढले गेले, असा दावा लांडे यांनी केला. (प्रतिनिधी)