शहरं
Join us  
Trending Stories
1
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
2
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
3
Zubeen Garg : स्कूबा डायव्हिंगमुळे नाही तर.... कसा झाला सिंगर झुबीन गर्गचा मृत्यू? आता मोठा खुलासा
4
बिल्सेरी, किनले, अक्वाफिनाला आता टक्कर देणार मुकेश अंबानी; ₹३०००० कोटींच्या व्यवसायात एन्ट्रीच्या तयारीत 
5
रशियाने मोठा धोका दिला? भारताच्या विनंतीकडे दुर्लक्ष करत पाकिस्तानला फायटर जेटचं इंजिन देण्याचा निर्णय घेतला; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
6
Viral Video: अशा मित्रांपासून सावध राहिलेलं बरं; एकदा 'हा' व्हिडीओ बघाच!
7
"गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या
8
दसरा मेळाव्यात भाषण सुरू असतानाच पंकजा मुंडे कार्यकर्त्यांवर संतापल्या, म्हणाल्या पोरांनो तुम्ही...  
9
“भारत खरोखरच स्वतंत्र आहे का?”; गीतांजली वांगचूक यांचा सवाल, केंद्रीय गृहमंत्रालयावर टीका
10
Goldman Sachs चे 'हे' ४ शेअर्स बनले सुपरस्टार; एका वर्षात १५५ टक्क्यांपर्यंतची तेजी, तुम्ही घेतलाय का?
11
 ...मग पोलिसांची हत्या करावी लागली तरी हरकत नाही, समोर आला तौकीर रजाचा भयानक डाव
12
'आग तो लगी थी घर में...."; धनंजय मुंडेंनी शायरीतून भावना व्यक्त केली, मंत्रिपदाबाबत खंतही बोलून दाखवली
13
२ घास कमी खा पण स्वाभिमानाने राहा, कुणाचे तुकडे उचलू नका; पंकजा मुंडेंचं मेळाव्यात आवाहन
14
कराड आमचे दैवत...; पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात झळकले वाल्मिक कराडचे पोस्टर
15
Gold Silver Price: सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ; गुंतवणूकदारांनी मात्र टाळाव्यात 'या' ५ चुका
16
"खोटे धंदे करू नका, गुंड पाळू नका, काही गरज नाही", पंकजा मुंडे भगवान गडावर काय बोलल्या?
17
Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहचा मोठा पराक्रम, घरच्या मैदानावर 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
Gensol Engineering Ltd: ₹२४०० वरुन ₹४१ वर आला 'हा' शेअर, आता ट्रेडिंग झालं बंद; संकटात कंपनी, तुमच्याकडे आहे का शेअर?
19
७५ वर्षांचा नवरा अन् ३५ वर्षांची नवरी! लग्नाच्या रात्रीच पतीचा मृत्यू; गूढ उलगडलं, समोर आलं सत्य
20
१९ वर्षे शनि, १८ वर्षे राहु महादशा: शनि महादशेत राहु अंतर्दशा आली? भाग्योदय; अपार पैसा-लाभ!

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित नुकसानभरपाई द्या!

By admin | Updated: March 10, 2016 02:45 IST

देशाच्या दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना त्वरित नुकसानभरपाई देण्यासोबतच त्यांच्या कर्जाची पुनर्रचना करण्यात यावी, अशी मागणी खासदार विजय दर्डा यांनी केली आहे.

शीलेश शर्मा, नवी दिल्लीदेशाच्या दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना त्वरित नुकसानभरपाई देण्यासोबतच त्यांच्या कर्जाची पुनर्रचना करण्यात यावी, अशी मागणी खासदार विजय दर्डा यांनी केली आहे.मंगळवारी राज्यसभेत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा मुद्दा उपस्थित करताना त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रासह देशभरातील सर्व दुष्काळग्रस्त भागात शेतकऱ्यांची दयनीय परिस्थिती आहे. त्यांना रबीच्या हंगामापूर्वी नुकसानभरपाई देणे गरजेचे होते. जेणेकरून ते खरीपाचे पीक उद्ध्वस्त झाल्यानंतरही शेती करू शकले असते; परंतु काही भाग वगळता बहुतांश ठिकाणी शेतकऱ्यांना नुकसानभरपाईपोटी एक रुपयाही मिळाला नाही, ही अत्यंत दु:खदायी बाब आहे.लक्षवेधीद्वारे दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या दैन्यावस्थेचे वास्तव मांडताना दर्डा यांनी सांगितले की, देशाचा कणा बळकट केला नाही, तर प्रगती खुंटेल आणि ज्या प्रगतीचे स्वप्न आम्ही बघत आहोत त्याची पूर्तता करणे कठीणच नव्हे, तर अशक्य होईल. तेव्हा सरकारने शेतकऱ्यांवरील कर्जाचे ओझे कमी करावे.ते म्हणाले, दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी ३८,००० कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती; परंतु आतापर्यंत आठ राज्यांसाठी फक्त ९,४८२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून, हा चिंतेचा विषय आहे. हा विषय येथेच थांबत नाही. २७ जानेवारी २०१५ पर्यंत सरकारकडून निव्वळ २,३८६ कोटी रुपयेच जारी करण्यात आले आहेत; पण वस्तुस्थिती ही आहे की, शेतकऱ्यांवर अंदाजे सहा खर्व रुपयांचे कर्ज आहे आणि त्यापैकी केवळ ५०० कोटी रुपयांच्या कर्जाची पुनर्रचना करण्यात आली आहे. परिणामी, शेतकऱ्यांची स्थिती अधिकाधिक दयनीय होत चालली आहे. दुसरीकडे मोठमोठी औद्योगिक घराणी आणि उद्योगपतींच्या कोट्यवधी रुपयांच्या कर्जाची सहजपणे फेररचना केली जाते ही सर्वात मोठी विडंबना आहे.