शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
2
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
3
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
4
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर
5
रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
6
अग्रलेख: युद्ध थांबेल की अधिक पेटेल? परिणाम लवकरच जाणवू शकतात 
7
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
8
विशेष लेख: शेतकऱ्याला AI चार जास्तीचे पैसे मिळवून देईल?
9
स्पर्धा परीक्षेप्रमाणे सरळसेवा भरती परीक्षेसाठीही 'पर्सेटाइल' पद्धत; 'क' गट नोकर भरतीसाठी एमपीएससीचा निर्णय
10
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
11
लेख: गोव्यात चालणाऱ्या पार्ट्यांची 'धुंदी' वाढतेच आहे, कारण...
12
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
13
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
14
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
15
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
16
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
17
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
18
Iran strikes US air base: इराणचे प्रत्युत्तर; कतारमधील अमेरिकन लष्करी तळांवर जोरदार मिसाईल हल्ला
19
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
20
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित नुकसानभरपाई द्या!

By admin | Updated: March 10, 2016 02:45 IST

देशाच्या दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना त्वरित नुकसानभरपाई देण्यासोबतच त्यांच्या कर्जाची पुनर्रचना करण्यात यावी, अशी मागणी खासदार विजय दर्डा यांनी केली आहे.

शीलेश शर्मा, नवी दिल्लीदेशाच्या दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना त्वरित नुकसानभरपाई देण्यासोबतच त्यांच्या कर्जाची पुनर्रचना करण्यात यावी, अशी मागणी खासदार विजय दर्डा यांनी केली आहे.मंगळवारी राज्यसभेत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा मुद्दा उपस्थित करताना त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रासह देशभरातील सर्व दुष्काळग्रस्त भागात शेतकऱ्यांची दयनीय परिस्थिती आहे. त्यांना रबीच्या हंगामापूर्वी नुकसानभरपाई देणे गरजेचे होते. जेणेकरून ते खरीपाचे पीक उद्ध्वस्त झाल्यानंतरही शेती करू शकले असते; परंतु काही भाग वगळता बहुतांश ठिकाणी शेतकऱ्यांना नुकसानभरपाईपोटी एक रुपयाही मिळाला नाही, ही अत्यंत दु:खदायी बाब आहे.लक्षवेधीद्वारे दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या दैन्यावस्थेचे वास्तव मांडताना दर्डा यांनी सांगितले की, देशाचा कणा बळकट केला नाही, तर प्रगती खुंटेल आणि ज्या प्रगतीचे स्वप्न आम्ही बघत आहोत त्याची पूर्तता करणे कठीणच नव्हे, तर अशक्य होईल. तेव्हा सरकारने शेतकऱ्यांवरील कर्जाचे ओझे कमी करावे.ते म्हणाले, दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी ३८,००० कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती; परंतु आतापर्यंत आठ राज्यांसाठी फक्त ९,४८२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून, हा चिंतेचा विषय आहे. हा विषय येथेच थांबत नाही. २७ जानेवारी २०१५ पर्यंत सरकारकडून निव्वळ २,३८६ कोटी रुपयेच जारी करण्यात आले आहेत; पण वस्तुस्थिती ही आहे की, शेतकऱ्यांवर अंदाजे सहा खर्व रुपयांचे कर्ज आहे आणि त्यापैकी केवळ ५०० कोटी रुपयांच्या कर्जाची पुनर्रचना करण्यात आली आहे. परिणामी, शेतकऱ्यांची स्थिती अधिकाधिक दयनीय होत चालली आहे. दुसरीकडे मोठमोठी औद्योगिक घराणी आणि उद्योगपतींच्या कोट्यवधी रुपयांच्या कर्जाची सहजपणे फेररचना केली जाते ही सर्वात मोठी विडंबना आहे.