शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
मीरा भाईंदर महापालिकेच्या बनावट जन्म दाखल्याप्रकरणी गुन्हा दाखल, संबंधित महिला बांगलादेशी असल्याचा संशय
3
कहानी में कुछ तो गडबड हैं! काँग्रेसचे राज ठाकरेंना ‘नो ऑब्जेक्शन’; उद्धवसेनेचा मार्ग मोकळा?
4
'लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही आणि दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न', RSS चा ट्रम्प यांच्यावर निशाणा
5
Arjun Tendulkar Engagement: अर्जुन तेंडुुलकरची होणारी बायको सानिया चांडोक काय करते? तिचा व्यवसाय कोणता? जाणून घ्या
6
Himachal Pradesh Cloudburst : हिमाचलमध्ये पावसाचा कहर, किन्नौरमध्ये ढगफुटी; घरे आणि गाड्या गेल्या वाहून, ३२५ रस्ते बंद
7
त्रिशतकी खेळी करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूने अचानक जाहीर केली निवृत्ती, आता केले अनेक गौप्यस्फोट
8
Bitcoin नं तोडले सर्व विक्रम; सोनं-चांदी सोडून क्रिप्टोकडे पळाले गुंतवणुकदार
9
मुंबई ते लंडन... लवकरच बोहल्यावर चढणाऱ्या अर्जुन तेंडुलकरची संपत्ती किती? तुमचाही विश्वास नाही बसणार
10
"पुतिन यांनी युक्रेन युद्ध थांबवलं नाही तर...!"; महत्वाच्या बैठकीपूर्वीच ट्रम्प यांची रशियाला खुली धमकी!
11
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
12
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
13
इन्फोसिसचा ऑस्ट्रेलियात मोठा व्यवहार! १३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केली 'ही' कंपनी
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताची मिसाईल ताकद पाहून घाबरला पाकिस्तान; आता उचललं 'हे' मोठं पाऊल!
15
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
16
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
17
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
18
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
19
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
20
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित नुकसानभरपाई द्या!

By admin | Updated: March 10, 2016 02:45 IST

देशाच्या दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना त्वरित नुकसानभरपाई देण्यासोबतच त्यांच्या कर्जाची पुनर्रचना करण्यात यावी, अशी मागणी खासदार विजय दर्डा यांनी केली आहे.

शीलेश शर्मा, नवी दिल्लीदेशाच्या दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना त्वरित नुकसानभरपाई देण्यासोबतच त्यांच्या कर्जाची पुनर्रचना करण्यात यावी, अशी मागणी खासदार विजय दर्डा यांनी केली आहे.मंगळवारी राज्यसभेत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा मुद्दा उपस्थित करताना त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रासह देशभरातील सर्व दुष्काळग्रस्त भागात शेतकऱ्यांची दयनीय परिस्थिती आहे. त्यांना रबीच्या हंगामापूर्वी नुकसानभरपाई देणे गरजेचे होते. जेणेकरून ते खरीपाचे पीक उद्ध्वस्त झाल्यानंतरही शेती करू शकले असते; परंतु काही भाग वगळता बहुतांश ठिकाणी शेतकऱ्यांना नुकसानभरपाईपोटी एक रुपयाही मिळाला नाही, ही अत्यंत दु:खदायी बाब आहे.लक्षवेधीद्वारे दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या दैन्यावस्थेचे वास्तव मांडताना दर्डा यांनी सांगितले की, देशाचा कणा बळकट केला नाही, तर प्रगती खुंटेल आणि ज्या प्रगतीचे स्वप्न आम्ही बघत आहोत त्याची पूर्तता करणे कठीणच नव्हे, तर अशक्य होईल. तेव्हा सरकारने शेतकऱ्यांवरील कर्जाचे ओझे कमी करावे.ते म्हणाले, दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी ३८,००० कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती; परंतु आतापर्यंत आठ राज्यांसाठी फक्त ९,४८२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून, हा चिंतेचा विषय आहे. हा विषय येथेच थांबत नाही. २७ जानेवारी २०१५ पर्यंत सरकारकडून निव्वळ २,३८६ कोटी रुपयेच जारी करण्यात आले आहेत; पण वस्तुस्थिती ही आहे की, शेतकऱ्यांवर अंदाजे सहा खर्व रुपयांचे कर्ज आहे आणि त्यापैकी केवळ ५०० कोटी रुपयांच्या कर्जाची पुनर्रचना करण्यात आली आहे. परिणामी, शेतकऱ्यांची स्थिती अधिकाधिक दयनीय होत चालली आहे. दुसरीकडे मोठमोठी औद्योगिक घराणी आणि उद्योगपतींच्या कोट्यवधी रुपयांच्या कर्जाची सहजपणे फेररचना केली जाते ही सर्वात मोठी विडंबना आहे.