शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

महिनाभरापूर्वीच केलेल्या रस्त्याला पडले खड्डे

By admin | Updated: July 16, 2014 01:21 IST

महिनाभरापूर्वीच केलेल्या रस्त्याला पडले खड्डे

महिनाभरापूर्वीच केलेल्या रस्त्याला पडले खड्डेप्रवीण साळुंके ल्ल मालेगावयेथील महानगपालिकेने मोसमपूल ते सटाणा नाका रस्ता रुंदीकरणावर ९० लाख रुपये खर्च केला आहे. या रस्त्याची दुरुस्ती होऊन महिनाही उलटला नसताना या रस्त्याला खड्डे पडल्याने या कामावर खर्च करण्यात आलेला निधी वाया गेला आहे.अधिकाऱ्यांनी ठेकेदाराला हाताशी धरून निकृष्ट दर्जाचे काम करून निधीची वाटणी केल्याचा आरोप करण्यात येत आहे. दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. रस्त्याच्या कामाच्या निविदा मागविण्यासाठी देण्यात आलेल्या जाहिरातीनुसार ९० लाख रुपये खर्च दाखविण्यात आला आहे. एक किलोमीटरपेक्षा कमी अंतर असलेल्या त्यातच निम्यापेक्षा जास्त अंतराचे एका बाजूकडील रुंदीकरण झालेले असताना त्यावर दुरुस्तीसाठी ९० लाख रुपये खर्च हा संशोधनाचा विषय आहे. यापूर्वी महापालिकेने या रस्त्यावर दोनवेळा कोट्यवधी रुपये खर्च करूनही रस्त्याचे रुंदीकरण न केल्याने त्या निधीचा अपहार केल्याचा नागरिकांचा आरोप आहे. महिनाभरातच या रस्त्याला खड्डे पडल्याने ९० दिवस हा रस्ता अस्तित्वात राहील का?असा प्रश्न विचारला जात आहे. सुरुवातीपासूनच वादग्रस्त असलेले हे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात येत असल्याची नागरिकांची ओरड आहे. अधिकाऱ्यांनी त्याकडे ‘हत्ती बाजारात चालला....’ या म्हणीप्रमाणे काणाडोळा केला होता. मालेगाव महापालिकेच्या ९० लाख रुपये खर्च केलेल्या मोसमपूल ते सटाणा नाका या रस्त्यावर महिनाभरातच पडलेले खड्डे. त्यानंतर आमदारांसह अनेक राजकीय नेत्यांनी या रस्त्याच्या कामाविषयी शंका उपस्थित केल्या होत्या. मात्र अधिकाऱ्यांनी हे काम गुणवत्तापूर्ण होत असल्याचे वेळोवेळी सांगून ठेकेदाराची पाठराखण केली व त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत ठेकेदाराला निकृष्ट काम करण्यास मदत केल्याचा आरोप करण्यात येत आहे. हे काम सुरू असताना एकही अधिकारी कामावर फिरकला नाही. या कामावर नव्वद लाख रुपये खर्च करण्यात आलेला असून, काम पूर्ण झाल्या झाल्याच संबंधित ठेकेदाराला पूर्ण बिल अदा करण्यात आल्याची चर्चा आहे. अधिकाऱ्यांना या रस्त्याच्या गुणवत्तेची तपासणी करण्यात आली नसल्याची माहिती आहे. येथील महापालिकेने केलेले कोणतेही काम महिने ते दोन महिनेच टिकत असल्याचे अनेकवेळा उघड झालेले आहे. त्यावर कोणतीही चौकशी करण्यात येत नसल्याने याला आळा कधी बसणार? असा नागरिकांना प्रश्न पडला आहे. या कामाची चौकशी करण्यात यावी तसेच दोषी अधिकाऱ्यांवर कधीतरी कारवाई करावी, अशी अपेक्षा करण्यात येत आहे.