शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
3
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
4
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
5
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
6
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
7
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
8
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
9
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
10
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
11
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
12
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
13
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
14
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
15
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
16
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
17
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
18
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
19
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
20
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महिनाभरापूर्वीच केलेल्या रस्त्याला पडले खड्डे

By admin | Updated: July 16, 2014 01:21 IST

महिनाभरापूर्वीच केलेल्या रस्त्याला पडले खड्डे

महिनाभरापूर्वीच केलेल्या रस्त्याला पडले खड्डेप्रवीण साळुंके ल्ल मालेगावयेथील महानगपालिकेने मोसमपूल ते सटाणा नाका रस्ता रुंदीकरणावर ९० लाख रुपये खर्च केला आहे. या रस्त्याची दुरुस्ती होऊन महिनाही उलटला नसताना या रस्त्याला खड्डे पडल्याने या कामावर खर्च करण्यात आलेला निधी वाया गेला आहे.अधिकाऱ्यांनी ठेकेदाराला हाताशी धरून निकृष्ट दर्जाचे काम करून निधीची वाटणी केल्याचा आरोप करण्यात येत आहे. दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. रस्त्याच्या कामाच्या निविदा मागविण्यासाठी देण्यात आलेल्या जाहिरातीनुसार ९० लाख रुपये खर्च दाखविण्यात आला आहे. एक किलोमीटरपेक्षा कमी अंतर असलेल्या त्यातच निम्यापेक्षा जास्त अंतराचे एका बाजूकडील रुंदीकरण झालेले असताना त्यावर दुरुस्तीसाठी ९० लाख रुपये खर्च हा संशोधनाचा विषय आहे. यापूर्वी महापालिकेने या रस्त्यावर दोनवेळा कोट्यवधी रुपये खर्च करूनही रस्त्याचे रुंदीकरण न केल्याने त्या निधीचा अपहार केल्याचा नागरिकांचा आरोप आहे. महिनाभरातच या रस्त्याला खड्डे पडल्याने ९० दिवस हा रस्ता अस्तित्वात राहील का?असा प्रश्न विचारला जात आहे. सुरुवातीपासूनच वादग्रस्त असलेले हे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात येत असल्याची नागरिकांची ओरड आहे. अधिकाऱ्यांनी त्याकडे ‘हत्ती बाजारात चालला....’ या म्हणीप्रमाणे काणाडोळा केला होता. मालेगाव महापालिकेच्या ९० लाख रुपये खर्च केलेल्या मोसमपूल ते सटाणा नाका या रस्त्यावर महिनाभरातच पडलेले खड्डे. त्यानंतर आमदारांसह अनेक राजकीय नेत्यांनी या रस्त्याच्या कामाविषयी शंका उपस्थित केल्या होत्या. मात्र अधिकाऱ्यांनी हे काम गुणवत्तापूर्ण होत असल्याचे वेळोवेळी सांगून ठेकेदाराची पाठराखण केली व त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत ठेकेदाराला निकृष्ट काम करण्यास मदत केल्याचा आरोप करण्यात येत आहे. हे काम सुरू असताना एकही अधिकारी कामावर फिरकला नाही. या कामावर नव्वद लाख रुपये खर्च करण्यात आलेला असून, काम पूर्ण झाल्या झाल्याच संबंधित ठेकेदाराला पूर्ण बिल अदा करण्यात आल्याची चर्चा आहे. अधिकाऱ्यांना या रस्त्याच्या गुणवत्तेची तपासणी करण्यात आली नसल्याची माहिती आहे. येथील महापालिकेने केलेले कोणतेही काम महिने ते दोन महिनेच टिकत असल्याचे अनेकवेळा उघड झालेले आहे. त्यावर कोणतीही चौकशी करण्यात येत नसल्याने याला आळा कधी बसणार? असा नागरिकांना प्रश्न पडला आहे. या कामाची चौकशी करण्यात यावी तसेच दोषी अधिकाऱ्यांवर कधीतरी कारवाई करावी, अशी अपेक्षा करण्यात येत आहे.