शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
2
जगदीप धनखड यांना किती मते मिळाली होती?; उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांची मते यंदा दुपटीनं वाढली
3
एकीकडे मोदींना 'मित्र' म्हणायचं तर दुसरीकडे 'हे' पाऊल उचलायचं; ट्रम्पचा नेमका 'प्लॅन' काय?
4
बायकोने नवऱ्याला ट्रॅक करून पकडलेले आठवतेय...; Jio ने तस्सेच डिव्हाईस आणले, एकदा चार्ज केले की...
5
आधी चर्चेला बोलावलं अन् नंतर हाकलून लावलं; नेपाळमध्ये Gen-Zसोबत चर्चेचा खेळ गडबडला?
6
ITR भरण्याची अंतिम तारीख जवळ; आता मोबाईल ॲपवरूनही सहज करता येणार रिटर्न फाइल
7
Gold Silver Price 10 September: मोठ्या तेजीनंतर सोन्या-चांदीचे दर आज घसरले; पाहा १४ ते २४ कॅरेटसाठी आता किती खर्च करावा लागणार
8
Video - परिस्थिती भीषण! जे दिसलं, ते सर्वच लुटलं... नेपाळमध्ये Gen-Z आंदोलनकर्त्यांचा धुडगूस
9
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
10
iPhone 17: भारत, दुबई, अमेरिका की इतर कुठे; कोणत्या देशात आयफोन १७ मिळतोय स्वस्त? वाचा
11
जीएसटी कपातीच्या तोंडावर TVS NTORQ 150 लाँच; नव्या रुपात आली हायपर स्पोर्ट्स स्कूटर
12
सगळ्यात स्वस्त ७ सीटर असणाऱ्या 'या' कारची किंमत ९६ हजारांनी झाली कमी! आता कितीला मिळणार?
13
'मुंबईत घर घेणं आम्हाला परवडत नाही'; ८१ टक्के लोकांचं स्पष्ट मत, सर्वेक्षणात काय म्हटलंय? 
14
'हॉटेल जाळले, लोक पर्यटकांनाही सोडत नाहीत'; नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय महिलेने सांगितली आपबिती
15
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
16
आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड
17
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
18
पोलिसांना पाहताच उठून उभा राहिला पाण्यात पडलेला मृतदेह, व्हिडीओ काढणारे झाले अवाक्
19
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
20
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?

पाकच दहशतवाद्यांचा आश्रयदाता

By admin | Updated: September 27, 2016 05:43 IST

भारतात मानवी हक्कांचे उल्लंघन केले जात असल्याचा आरोप करणाऱ्या पाकिस्तानने आत्मपरीक्षण करावे, असे बजावताना, पाकिस्तान बलुचिस्तानात अत्यंत क्रूर अशी

संयुक्त राष्ट्रे : भारतात मानवी हक्कांचे उल्लंघन केले जात असल्याचा आरोप करणाऱ्या पाकिस्तानने आत्मपरीक्षण करावे, असे बजावताना, पाकिस्तान बलुचिस्तानात अत्यंत क्रूर अशी सरकारी दडपशाही करीत असल्याचा हल्ला भारताने केला. जम्मू आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असून, तो मिळविण्याचे स्वप्न बघणे पाकिस्तानने सोडून द्यावे, असे त्यांनी स्पष्ट केले.संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी भाषणात नुकत्याच केलेल्या भारतावरील हल्ल्याला चोख प्रतिउत्तर दिले. संयुक्त राष्ट्रांनी ज्यांना दहशतवादी जाहीर केले आहे ते उघडपणे फिरतात आणि द्वेषपूर्ण भाषणे करीत असतात, असा अप्रत्यक्ष उल्लेख स्वराज यांनी मुंबई हल्ल्याचा मुख्य सूत्रधार जमात उद दावाचा प्रमुख हाफीज सईद याचा केला. अतिरेक्यांना आश्रय देणे हा काही देशांचा व्यवसाय झाल्याचे त्या म्हणाल्या. काही देश असे आहेत की जे दहशतवादाची भाषा बोलतात, त्याला पोसतात, तो विकतात व निर्यातही करतात. असे देश आम्ही ओळखले पाहिजेत आणि त्यांना जबाबदार धरले पाहिजे, असे स्वराज म्हणाल्या. नवाज शरीफ यांच्या आरोपाला सडेतोड उत्तर देताना सुषमा स्वराज म्हणाल्या, जे काचेच्या घरात राहतात, त्यांनी दुसऱ्यांच्या घरांवर दगड फेकू नये. आमच्यावर आरोप करणाऱ्यांनी बलुचिस्तानसह होणारे अत्याचार आधी पाहावेत. बलोच लोकांना क्रौर्याला तोंड द्यावे लागत आहे आणि ती दडपशाही सरकारच करीत आहे. दहशतवादामुळेच सर्वाम मोठे मानवी हक्क उल्लंघन होते आणि दहशतवाद सगळ््यात मोठा मानवतेविरुद्धचा गुन्हा आहे हे समजून घ्यावे. दहशतवाद निष्पापांना लक्ष्य करतो व अविचाराने हत्या करतो, असे स्वराज यांनी सांगितले. दहशतवाद्यांच्या मालकीच्या बँका नसतात की शस्त्रेही. त्यामुळे आम्ही खरा प्रश्न विचारला पाहिजे की दहशतवादाला कोण पैसा पुरवतो, कोण त्याला शस्त्रे देऊन आश्रयही देतो. (वृत्तसंस्था)आमचा मैत्रीचा हात; त्यांच्याकडून मात्र हल्लेचर्चेसाठी भारत अटी घालतो हा पाकचा दावा त्यांनी फेटाळला. आम्ही प्रश्न सोडविण्यासाठी अटींवर नव्हे, तर मैत्रीतून पुढाकार घेतला. पण त्यांनी पठाणकोट आणि उरी येथे हल्ले घडवून आणले. असल्या हल्ल्यांच्या माध्यमातून भूभाग मिळवता येईल, असे त्यांना वाटत असल्यास ते कधीही यशस्वी होणार नाहीत.