शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
3
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
4
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
5
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
6
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
7
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
8
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
9
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
10
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
11
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
12
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
13
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
14
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
15
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
16
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
17
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
18
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
19
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
20
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग

पर्रीकर, अँथनी यांचे एकमेकांना आव्हान

By admin | Updated: April 28, 2016 04:10 IST

संपुआ सरकारच्या कार्यकाळात अगुस्ता वेस्टलँड कंपनीला ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात आले

नवी दिल्ली : संपुआ सरकारच्या कार्यकाळात अगुस्ता वेस्टलँड कंपनीला ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात आले होते, या काँग्रेसच्या दाव्याला संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आव्हान दिले आहे. इटलीच्या न्यायालयाने दिलेल्या निकालाचा अभ्यास करून सात-आठ दिवसानंतर याबाबत प्रतिक्रिया देऊ, असे ते म्हणाले. माजी संरक्षणमंत्री व काँग्रेसचे नेते ए. के. अँथनी यांनी मात्र पर्रीकर आणि मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवत सरकारला १0 प्रश्न विचारले.ब्लॅक लिस्टमध्ये टाकलेल्या कंपनीला मेक इन इंडियामध्ये सहभागी करून घेण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आणि त्यासाठी त्या कंपनीला काळ्या यादीतून काढण्यात आले, असा आरोप त्यांनी केला. स्वत:ची कृती जनतेसमोर येऊ नये, यासाठीच काँग्रेसवर भाजप नेते खोटे आरोप करीत असल्याची टीकाही अँथनी यांनी केली. बंदी घातलेल्या कंपनीवरील प्रतिबंध का उठवण्यात आला? सीबीआय व सक्तवसुली संचालनालयाने या कंपनीविषयी प्रतिकुल मत व्यक्त केले असतानाही कंपनीला मेक इन इंडियामध्ये सहभागी करून घेण्यासाठी अ‍ॅटर्नी जनरलचे मत का मागवले? नौदलासाठी २0१५ साली अगुस्ता वेस्टलँडची हेलिकॉप्टर्स का वापरण्यात आली? ही कंपनी आणि टाटा समूह यांच्या संयुक्त गुंतवणुकीला एफआयपीबीने २0१४ साली मंजुरी का दिली? आपली सीबीआयने चौकशी करावी, असा प्रस्ताव जेम्स खिस्तियनने केला, तेव्हा तो का अमान्य करण्यात आला? केरळमधील मच्छिमारांच्या मृत्यूस जबाबदार इटलीच्या खलाशांच्या सुटकेच्या बदल्यात काँग्रेस नेत्यांना अडकवण्याबाबत समझोता झाला, हे खरे आहे का? राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंग यांनी या कंपनीशी व्यवहार केल्याने झालेल्या नुकसानीबाबत कॅगने ठपका ठेवला असताना त्याबाबत कारवाई का करण्यात आली नाही? असे ते १0 प्रश्न आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)