शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा.…’’, प्रसिद्ध व्यावसायिकाने राज ठाकरेंना डिवचले  
2
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
3
ऑपरेशन सिंदूर: पाकिस्तान सीमेवर भारत एकाचवेळी तीन देशांशी लढत होता; उप लष्करप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट  
4
PM मोदींना त्रिनिदादमध्ये सोहरीच्या पानावर वाढलं गेलं जेवण; भारताशी कनेक्शन अन् फायदे काय?
5
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
6
IND vs ENG: बॅटने कहर केल्यानंतर आता बॉलने इतिहास रचण्याची संधी, जाडेजाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष!
7
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक
8
चीनच्या डावपेचात अडकला भारत? EV तयार करणाऱ्या कंपन्यांनी हात वर केले, आता पुढे काय?
9
विराट-रोहितच्या संदर्भात आली मोठी अपडेट; टीम इंडियाच्या चाहत्यांचा पुन्हा होणार 'मूड ऑफ'
10
श्रेया, भाऊ कोहिनूर हिरे पण 'तो' भंगारवाला? शरद उपाध्येंची ६ वर्षांपूर्वीची 'ती' पोस्ट व्हायरल
11
Ashadhi Ekadashi Vrat 2025: आषाढी एकादशीला 'अशी' करा विधिवत पूजा; जाणून घ्या नियम आणि शुभ मुहूर्त!
12
पाकिस्तानचा पाय आणखी खोलात! मायक्रोसॉफ्टने २५ वर्षांनी सोडला देश, कारण ऐकून बसेल धक्का!
13
पुणे बलात्कार प्रकरण: आरोपी तरुणीला आधीपासूनच ओळखत होता; पोलिसांकडून दोघांची चौकशी
14
राजकीय शेरेबाजी करणाऱ्यांना तालिका सभाध्यक्षपदी बसण्याचा अधिकार आहे का?; विरोधकांचा सवाल
15
"किती सुंदर व्यक्त झालायेस डॉक्टर, तू एक...", निलेश साबळेंच्या पोस्टवर प्रवीण तरडे काय म्हणाले?
16
रणबीरच्या 'रामा'ची RRRमधल्या रामचरणशी तुलना, 'रामायण'च्या टीझरनंतर चाहते म्हणतात- "प्रभू श्री रामांच्या भूमिकेसाठी..."
17
होम लोन घेण्याचा विचार करताय? ३ सरकारी बँकांनी कमी केले व्याजदर; पाहा कोणत्या बँकेत मिळतंय स्वस्त कर्ज
18
लेखः 'हिंदी सक्ती' टळली, पण त्याने मराठी भाषेवर आलेलं संकट टळेल? नेमकं कोण चुकतंय?
19
Ashadhi Ekadashi 2025: धर्मशास्त्रानुसार कसा करावा आषाढी एकादशीचा उपास? व्रतनियम वाचा!
20
केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर

प. वर्‍हाडातील पशुधन विम्याच्या संरक्षणाविना

By admin | Updated: December 21, 2014 23:49 IST

- १८ जिल्ह्यांत योजनेच्या ८०९ प्रकरणांचा निपटारा

- १८ जिल्ह्यांत योजनेच्या ८०९ प्रकरणांचा निपटारा
संतोष वानखडे
वाशिम : पशुधन विमा योजनेअंतर्गत राज्यात १८ जिल्ह्यांमधील पशुविम्याची ८०९ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. शेतकरी आत्महत्याग्रस्त म्हणून ओळखल्या जाणार्‍या अकोला, वाशिम व बुलडाणा या जिल्ह्यांचा समावेश या योजनेत नसल्याने पशुपालकांमधून संताप व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र पशुधन विकास महामंडळामार्फत राज्यात २००६-०७पासून केंद्रपुरस्कृत पशुधन विमा योजना राबविण्यात येते. सुरूवातीला सहा जिल्ह्यांत असलेली ही योजना २०११ पासून १८ जिल्ह्यांत लागू करण्यात आली. यामध्ये पुणे विभागातील पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, नाशिक विभागातील नाशिक, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद विभागातील, औरंगाबाद, बीड, लातूर, नांदेड, जालना, नागपूर विभागातील भंडारा, वर्धा, गोंदिया, नागपूर आणि अमरावती विभागातील केवळ यवतमाळ या एकमेव जिल्ह्यांचा समावेश आहे.
२०१२-१३ या वर्षात १८ हजार ७७४ जनावरांचा विमा उतरविण्यात आला होता. विम्याबाबतची १०५४ प्रकरणं निकाली काढून नुकसानभरपाईपोटी दोन कोटी ७२ लाख रुपये लाभार्थींना वितरित केले होते. २०१३-१४ या वर्षात जवळपास १० हजार जनावरांचा विमा उतरविण्यात आला. ८०९ दावे निकाली काढून दोन कोटी २१ लाख रुपये लाभार्थींना वितरित करण्यात आल्याची नोंद राज्य शासनाच्या पशुसंवर्धन आयुक्त कार्यालयाच्या दप्तरी आहे.
मात्र, दुसरीकडे या योजनेत पश्चिम वर्‍हाडातील अकोला, वाशिम व बुलडाणा या तीन जिल्ह्यांचा समावेशच नसल्याने तेथे पशुपालकांना नुकसानभरपाई कशी मिळणार? हा प्रश्न अनुत्तरीत आहे.