शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

प. बंगालमधील मतदानाला हिंसाचाराचे गालबोट

By admin | Updated: April 22, 2016 03:11 IST

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या ६२ जागांसाठीच्या गुरुवारी झालेल्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला मार्क्सवादी पक्षाचा पाठीराखा ठार झाल्यामुळे गालबोट लागले

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या ६२ जागांसाठीच्या गुरुवारी झालेल्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला मार्क्सवादी पक्षाचा पाठीराखा ठार झाल्यामुळे गालबोट लागले. याच पक्षाचे चार कार्यकर्ते जखमीही झाले. या टप्प्यातील मतदान मोठ्या उत्साहात झाले. दरम्यान राज्यात ७९.२२ टक्के मतदानाची नोंद झाली.बर्दवानमधील १६ मतदारसंघांमध्ये सर्वाधिक तर कोलकात्यात सर्वांत कमी मतदान नोंदले गेले. नाडिया आणि मुर्शिदाबादमध्येही बऱ्यापैकी मतदान झाले.बर्दवानमध्ये केंद्रप्रमुख मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करीत असल्याची तक्रार पोलिंग एजंटस्ने केल्यानंतर त्याला तेथून हटविण्यात आले. केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियो यांना कोलकात्यातील जोरासँको मतदारसंघात मतदान केंद्रावर ते आईसह मतदानासाठी गेले असताना त्यांना अनेक प्रश्न विचारून त्रासून सोडण्यात आले, असा आरोप होता. निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी तेथे सुरक्षा दले पाठवून परिस्थिती नियंत्रणात आणली, असे सांगितले.माकपचा (एम) पाठीराखा तहिदूर इस्लाम (३५) याचा मृतदेह दोमकल विधानसभा (जि. मुर्शिदाबाद) मतदारसंघाच्या शिबापाडा मतदान केंद्रापासून ५०० मीटरवर आढळला. कोलकात्यात तृणमूल काँग्रेसचे नेते अन्वर खान यांना मुख्य निवडणूक अधिकारी सुनील गुप्ता यांच्या सूचनेवरून अटक करण्यात आली. दूरचित्रवाणी वाहिनीवर खान पक्ष कार्यकर्त्यांशी फोनवर बोलत असताना निवडणूक आयोगाबद्दल अपशब्द वापरताना आढळले होते. केतुग्राम मतदारसंघात स्वतंत्र घटनेत चार कायकर्ते जखमी झाले. मतदान क्रमांक ७८ वर झालेल्या झटापटीत माकपच्या (एम) कार्यकर्त्याचा कान कापला गेला, तर दुसऱ्याचा पाय मोडला. मतदान केंद्र क्रमांक ४८ वर माकपचे दोन कार्यकर्ते त्यांच्यावर बॉम्ब फेकण्यात आल्यानंतर जखमी झाले. माकपचे (एम) उमेदवार व माजी मंत्री अनिसूर रहमान यांनी दावा केला की, आमचा कार्यकर्ता तहिदूर इस्लाम हा मतदान केंद्राबाहेर फेकल्या गेलेल्या बॉम्बमध्ये ठार झाला. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सी. सुधाकर यांनी हा खून निवडणुकीशी संबंधित नसल्याचे सांगितले. डाव्या पक्षांनी तहिदूर इस्लामच्या हत्येबद्दल तृणमूल काँग्रेसवर ठपका ठेवला असून, तो पक्ष मतदारांना भीती घालण्यासाठी दहशत निर्माण करीत असल्याचे म्हटले. (वृत्तसंस्था)