शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तान दहशतवादाची कर्मभूमी - भारताने सुनावले खडेबोल

By admin | Updated: October 25, 2016 12:24 IST

सोमवारी जिनेव्हा येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय संसदीय संघटनेच्या (आयपीयू) बैठकीत भारताने पाकिस्तान दहशतवादीची कर्मभूमी बनली असल्याचा टोला लगावला.

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, 25 -  दहशतवादाच्या मुद्यावरून भारताने पाकिस्तानला पुन्हा एकदा फटकारले आहे. सोमवारी जिनेव्हा येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय संसदीय संघटनेच्या (आयपीयू) बैठकीत भारताने पाकिस्तानचे थेट नाव घेत हा देश आता दहशतवादीची कर्मभूमी बनली असल्याचा टोला लगावला.
या बैठकीत पाकिस्तानने नेहमीप्रमाणे काश्मीर प्रश्नाचे रडगाणे सुरू केल्यावर भारतानेही त्याला चोख प्रत्युत्तर दिले.  "दहशतवादामुळे मानवाधिकाराचे मोठ्या प्रमाणावर हनन होत आहे आणि पाकिस्तान ही अशा दहशतवादासाठी कर्मभूमी ठरली आहे," असे टीकास्त्र भारताने सोडले. 
गेल्या महिन्यात उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवादाच्या मुद्यावरून भारत आंतरराष्ट्रीय पातळीवर  पाकिस्तानला सातत्याने लक्ष्य करत आहे. गेल्याच आठवड्यात झालेल्या ब्रिक्स परिषदेतही भारताने पाकिस्तानचा दहशतवादाची जननी असा उल्लेख केला होता.
(पाकिस्तान दहशतवादी राष्ट्र, त्यांना वाळीत टाका - राजनाथ सिंग)
दरम्यान, विविध राष्ट्रांच्या संसदांची संघटना असलेल्या आंतरराष्ट्रीय संसदीय संघटनेच्या 135व्या परिषदेतही भारताने पाकिस्तानचा दशतवादी राष्ट्र म्हणून उल्लेख करायची संधी सोडली नाही. या परिषदेत पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रांनी केलेल्या ठरावाचा हवाला देत काश्मीर प्रश्न उपस्थित केल्यावर भारतानेही त्याला चोख प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानने या ठरावातील उल्लेखानुसार सर्वप्रथम पाकव्याप्त काश्मीरवरील ताबा सोडावा. त्याबरोबरच पाकिस्तानी तसेच पाकव्याप्त काश्मीर, बलुचिस्तान आणि खैबर पख्तुनख्वा येथील जनता दहशतवादाची शिकार होत आहेत, असा आरोप भारताने केला.