शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तान दहशतवादाची कर्मभूमी - भारताने सुनावले खडेबोल

By admin | Updated: October 25, 2016 12:24 IST

सोमवारी जिनेव्हा येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय संसदीय संघटनेच्या (आयपीयू) बैठकीत भारताने पाकिस्तान दहशतवादीची कर्मभूमी बनली असल्याचा टोला लगावला.

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, 25 -  दहशतवादाच्या मुद्यावरून भारताने पाकिस्तानला पुन्हा एकदा फटकारले आहे. सोमवारी जिनेव्हा येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय संसदीय संघटनेच्या (आयपीयू) बैठकीत भारताने पाकिस्तानचे थेट नाव घेत हा देश आता दहशतवादीची कर्मभूमी बनली असल्याचा टोला लगावला.
या बैठकीत पाकिस्तानने नेहमीप्रमाणे काश्मीर प्रश्नाचे रडगाणे सुरू केल्यावर भारतानेही त्याला चोख प्रत्युत्तर दिले.  "दहशतवादामुळे मानवाधिकाराचे मोठ्या प्रमाणावर हनन होत आहे आणि पाकिस्तान ही अशा दहशतवादासाठी कर्मभूमी ठरली आहे," असे टीकास्त्र भारताने सोडले. 
गेल्या महिन्यात उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवादाच्या मुद्यावरून भारत आंतरराष्ट्रीय पातळीवर  पाकिस्तानला सातत्याने लक्ष्य करत आहे. गेल्याच आठवड्यात झालेल्या ब्रिक्स परिषदेतही भारताने पाकिस्तानचा दहशतवादाची जननी असा उल्लेख केला होता.
(पाकिस्तान दहशतवादी राष्ट्र, त्यांना वाळीत टाका - राजनाथ सिंग)
दरम्यान, विविध राष्ट्रांच्या संसदांची संघटना असलेल्या आंतरराष्ट्रीय संसदीय संघटनेच्या 135व्या परिषदेतही भारताने पाकिस्तानचा दशतवादी राष्ट्र म्हणून उल्लेख करायची संधी सोडली नाही. या परिषदेत पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रांनी केलेल्या ठरावाचा हवाला देत काश्मीर प्रश्न उपस्थित केल्यावर भारतानेही त्याला चोख प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानने या ठरावातील उल्लेखानुसार सर्वप्रथम पाकव्याप्त काश्मीरवरील ताबा सोडावा. त्याबरोबरच पाकिस्तानी तसेच पाकव्याप्त काश्मीर, बलुचिस्तान आणि खैबर पख्तुनख्वा येथील जनता दहशतवादाची शिकार होत आहेत, असा आरोप भारताने केला.