शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

पाकिस्तान दहशतवादाची कर्मभूमी - भारताने सुनावले खडेबोल

By admin | Updated: October 25, 2016 12:24 IST

सोमवारी जिनेव्हा येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय संसदीय संघटनेच्या (आयपीयू) बैठकीत भारताने पाकिस्तान दहशतवादीची कर्मभूमी बनली असल्याचा टोला लगावला.

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, 25 -  दहशतवादाच्या मुद्यावरून भारताने पाकिस्तानला पुन्हा एकदा फटकारले आहे. सोमवारी जिनेव्हा येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय संसदीय संघटनेच्या (आयपीयू) बैठकीत भारताने पाकिस्तानचे थेट नाव घेत हा देश आता दहशतवादीची कर्मभूमी बनली असल्याचा टोला लगावला.
या बैठकीत पाकिस्तानने नेहमीप्रमाणे काश्मीर प्रश्नाचे रडगाणे सुरू केल्यावर भारतानेही त्याला चोख प्रत्युत्तर दिले.  "दहशतवादामुळे मानवाधिकाराचे मोठ्या प्रमाणावर हनन होत आहे आणि पाकिस्तान ही अशा दहशतवादासाठी कर्मभूमी ठरली आहे," असे टीकास्त्र भारताने सोडले. 
गेल्या महिन्यात उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवादाच्या मुद्यावरून भारत आंतरराष्ट्रीय पातळीवर  पाकिस्तानला सातत्याने लक्ष्य करत आहे. गेल्याच आठवड्यात झालेल्या ब्रिक्स परिषदेतही भारताने पाकिस्तानचा दहशतवादाची जननी असा उल्लेख केला होता.
(पाकिस्तान दहशतवादी राष्ट्र, त्यांना वाळीत टाका - राजनाथ सिंग)
दरम्यान, विविध राष्ट्रांच्या संसदांची संघटना असलेल्या आंतरराष्ट्रीय संसदीय संघटनेच्या 135व्या परिषदेतही भारताने पाकिस्तानचा दशतवादी राष्ट्र म्हणून उल्लेख करायची संधी सोडली नाही. या परिषदेत पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रांनी केलेल्या ठरावाचा हवाला देत काश्मीर प्रश्न उपस्थित केल्यावर भारतानेही त्याला चोख प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानने या ठरावातील उल्लेखानुसार सर्वप्रथम पाकव्याप्त काश्मीरवरील ताबा सोडावा. त्याबरोबरच पाकिस्तानी तसेच पाकव्याप्त काश्मीर, बलुचिस्तान आणि खैबर पख्तुनख्वा येथील जनता दहशतवादाची शिकार होत आहेत, असा आरोप भारताने केला.