शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
नक्षलवाद्यांनी पेरलेल्या IED चा भीषण स्फोट; ASP आकाश राव शहीद, अनेक जवान जखमी
3
"सोनम धाब्यावर आली, घाबरलेली, रडत म्हणाली..."; साहिलने सांगितलं रात्री १ वाजता काय घडलं?
4
हनिमूनसाठी कौशलेंद्र-अंकिता सिक्कीमला गेले अन् नको ते घडलं; दोन आठवड्यांपासून थांगपत्ता नाही
5
Sonam Raghuvanshi : "सोनमला फाशी झालीच पाहिजे"; राजाच्या हत्येनंतर आईचा आक्रोश, घरात कशी वागायची सून?
6
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
7
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
8
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
9
"आम्ही कधीच चांगले मित्र नव्हतो, पण...", सोनाली बेंद्रेचा सलमान खानविषयी खुलासा, म्हणाली...
10
Vat Purnima 2025: आयुष्यात एकदा तरी 'या' पाच पुरातन वटवृक्षाला आवर्जून फेऱ्या मारा; मिळेल सिद्धी-संपत्ती!
11
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
12
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
13
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
14
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
15
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
16
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
17
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
18
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
19
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
20
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!

दहशतवादाचे दुसरे नाव पाकिस्तान: काँग्रेस

By admin | Updated: September 23, 2016 01:35 IST

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी संयुक्त राष्ट्र संघात ज्या प्रकारे अतिरेक्यांचे उदात्तीकरण केले, त्यावरून स्पष्ट होते की, दहशतवादाला मदत करणे, हे पाकिस्तान सरकारचे धोरण आहे.

शीलेश शर्मा,नवी दिल्लीपाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी संयुक्त राष्ट्र संघात ज्या प्रकारे अतिरेक्यांचे उदात्तीकरण केले, त्यावरून स्पष्ट होते की, दहशतवादाला मदत करणे, हे पाकिस्तान सरकारचे धोरण आहे. त्यामुळे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी संयुक्त राष्ट्रात वस्तुस्थिती मांडावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. काँग्रेसने जगातील देशांना आवाहन केले आहे की, त्यांनी पाकिस्तानचा खरा चेहरा ओळखावा. कारण पाकिस्तान हा फ्रान्स, बांगलादेश, अमेरिका, ब्रिटन, बेल्जियमसह जगभरातील अतिरेक्यांना आश्रय देत आहे. दरम्यान, या मुद्द्यावर आपण सरकारसोबत असल्याचे दाखवून देत, काँग्रेसने स्पष्ट केले की, राष्ट्रहिताच्या प्रत्येक निर्णयाबाबत आपण सरकारसोबत आहोत. सर्वपक्षीय बैठक बोलविण्याची मागणीही काँग्रेसने केली, जेणेकरून संपूर्ण देश एका सुरात उभा असल्याचे दिसून येईल. पाकिस्तानबाबत काँग्रेसची भूमिका सरकारपेक्षाही अधिक आक्रमक आहे, असे या वक्तव्यांवरून दिसून येते. पाकिस्तान हा देश पूर्णपणे आयएसआय आणि सैन्याच्या इशाऱ्यावर चालत असल्याचेही काँगे्रसने म्हटले आहे. त्यामुळेच पाकिस्तान आंतरराष्ट्रीय दहशतवादाचे केंद्र बनला आहे. येथे अतिरेक्यांचे पोषण केले जात आहे. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आता संयुक्त राष्ट्र संघात बोलताना पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर द्यावे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय समुदायासमोर भारत मजबूतपणे आपली बाजू मांडू शकेल. तर जगालाही कळून चुकेल की, कशा प्रकारे पाकिस्तान हे दहशतवादाचे दुसरे नाव आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले की, नवाज शरीफ यांना हे माहीत नाही काय की, मौलाना मसूद अजहर, दाउद, हाफिज सईद यांच्यासारखे कुख्यात अतिरेकी हे पाकिस्तानातील आयएसआयच्या इशाऱ्यावरून जगभरात दहशतवाद पसरवित आहेत. लादेन पाकिस्तानात अबोटाबादमध्ये सैन्याच्या मुख्यालयाजवळच सापडला होता, हे जग विसरू शकत नाही, असेही ते म्हणाले. बुऱ्हान वाणी याचे शरीफ यांनी ज्या प्रकारे उदात्तीकरण केले, त्यावरून पाकिस्तान आणि दहशतवाद यांच्यात काय नाते आहे, हे सांगण्याची गरजच नाही.