शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
5
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
6
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
7
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
8
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
9
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
10
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
11
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
12
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
13
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
14
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
15
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
16
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
17
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
18
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
19
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
20
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
Daily Top 2Weekly Top 5

यूपीतील नरेंद्र मोदींच्या महाविजयाचा पाकिस्तानलाही धसका

By admin | Updated: March 12, 2017 15:02 IST

उत्तर प्रदेशमध्ये भाजपानं मिळवलेल्या अभूतपूर्व यशानंतर मोदी सरकारच्या पाकिस्तान धोरणावरही फरक पडणार आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 12 - उत्तर प्रदेशमध्ये भाजपानं मिळवलेल्या अभूतपूर्व यशानंतर मोदी सरकारच्या पाकिस्तान धोरणावरही फरक पडणार आहे. उत्तर प्रदेश निवडणुकीच्या निकालापर्यंत भाजपानं पाकिस्तानशी बोलणी करणं थांबवल्याची चर्चा होती. उरी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानच्या संबंधांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला आहे. पाकिस्तानच्या द्विपक्षीय संबंध आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर निर्णय घेण्याआधी मोदी सरकार उत्तर प्रदेशच्या जनादेशाची वाट पाहत होते. त्यामुळेच उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूक केंद्र सरकारसाठी खूप महत्त्वाची मानली जात होती. या निवडणुकीत भाजपानं मिळवलेल्या घवघवीत यशानंतर मोदी सरकार आणखी शक्तिशाली झालं आहे. मोदींच्या तुलनेत दुसरा एवढा लोकप्रिय नेता आजमितीत भारतात नाही. या निकालांचा केंद्र सरकारच्या परराष्ट्र धोरणांवरही प्रभाव पडणार आहे. या मे महिन्यात मोदी सरकारला सत्तेत येऊन 3 वर्षं पूर्ण होतील. मोदी सरकारचा 5 वर्षांमधील अर्धा अधिक कार्यकाळ लोटल्यानंतरही मोदींना मिळालेलं हे यश राजकीयदृष्ट्या फार महत्वाचं मानलं जात आहे. या विजयामुळे फक्त भाजपाच नव्हे, तर मोदींही ताकद वाढली आहे. मोदींच्या या ताकदीचा प्रभाव जागतिक प्रतिमा संवर्धनासाठी होणार आहे. 2017पर्यंतचा रेकॉर्ड पाहिल्यास जगभरातल्या अनेक लोकशाही देशांतल्या नेत्यांच्या पायाखालची जमीन सरकताना दिसत असतानाच भारतात मोदी असे एकमेव नेते आहेत की ज्यांच्यावर जनतेनं पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. भारताच्या शेजारील देशांमध्येही मोदींच्या या विजयाचे पडसाद उमटणार आहेत. मोदींची राजकीय ताकद इतर देशांशी द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी सकारात्मक भूमिका निभावण्याची शक्यता आहे. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना पुढच्या महिन्यात भारताच्या दौ-यावर येणार आहेत. बांगलादेशसोबत सुरक्षा संबंध वाढवण्यासाठी त्या प्रयत्नशील असतील. मात्र या संबंधात अडसर ठरणा-या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनाही आता सहजगत्या मोदी बाजूला सारू शकतात. नेपाळसोबत संबंध वाढवण्यासाठी भारताला अधिक सवलती मिळतील. नेपाळ सध्या तरी राजकीय अस्थिरतेच्या कठीण काळातून जातोय. या परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वाढलेलं महत्त्व भारत आणि नेपाळमध्ये संबंध सुधारण्यासाठी उपयोगी पडेल.उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानशी दोन हात करण्यासाठी आता भारत आणखी कडक पावलं उचलण्याची शक्यता आहे. सप्टेंबर 2016मध्ये मोदी सरकारच्या पाकव्याप्त काश्मीरमधल्या सर्जिकल स्टाइकलाही जनतेचं चांगलं समर्थन मिळालं होतं. तसेच सिंधू करारावर पुनर्विचार करण्याचा भारतानं इशारा दिला होता. दोन्ही देशांमध्ये अधिकृत बोलणीही थांबली आहेत. पाकिस्तान जोपर्यंत दहशतवादावर ठोस कारवाई तोपर्यंत पाकिस्तानशी कोणतेही संबंध न ठेवण्याचा भारतानं निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, पंजाब आणि मणिपूरमध्ये विधानसभा निवडणुकीतील प्रचारादरम्यानही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सर्जिकल स्ट्राइकला मुद्द्याला जनतेचं फार समर्थन दिलं आहे. त्यामुळे पाकिस्तानवर आणखी एकदा सर्जिकल स्ट्राइक झाल्यास आश्चर्य वाटायला नको.