शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
3
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
4
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
5
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
6
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
7
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
8
काँग्रेस 'मविआ'त नाही; आता मनसे, उद्धवसेनेची आघाडी, मुंबई महापालिकेचे गणित बदलले
9
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
10
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
11
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
12
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
13
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
14
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
15
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
16
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
17
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
18
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
19
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
20
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
Daily Top 2Weekly Top 5

मुत्सद्दीपणामुळे १९७१ युद्धात पाकची हार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 07:21 IST

मुत्सद्दीपणा, दूरदृष्टी, निर्णयक्षमता व कूटनीती या बाबी परराष्ट्र धोरण राबविताना महत्त्वाच्या असतात. त्यांचा मेळ घालून १९७१च्या भारत-पाकिस्तान युद्धात दक्षिण आशिया खंडाचा नकाशा इंदिरा गांधी यांनी बदलला.

- दत्तात्रय शेकटकर(निवृत्त लेफ्टनंट जनरल)मुत्सद्दीपणा, दूरदृष्टी, निर्णयक्षमता व कूटनीती या बाबी परराष्ट्र धोरण राबविताना महत्त्वाच्या असतात. त्यांचा मेळ घालून १९७१च्या भारत-पाकिस्तान युद्धात दक्षिण आशिया खंडाचा नकाशा इंदिरा गांधी यांनी बदलला. बांगलादेशाची निर्मिती केली. आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर त्यांनी आखलेल्या मुत्सद्दी धोरणामुळेच १४ दिवसांत भारताने पाकिस्तानला नमवले.मी १९६३मध्ये लष्करी सेवेत रुजू झालो. त्या वेळी नेहरू पंतप्रधान होते. स्वातंत्र्यलढ्यातील कठीण प्रसंग इंदिराजींनी पाहिले होते; त्यांना स्वातंत्र्याची जाणीव होती. नेहरूंचे संस्कार असल्याने त्यांचे व्यक्तिमत्त्व कणखर बनले. त्या अनुभवाचा वापर त्यांनी भारताचे संरक्षण, प्रगती व विकासासाठी केला.पश्चिम पाकिस्तान पूर्वेकडील बंगाली जनतेवर अन्याय करीत होता. तेथील नागरिकांना हक्क मिळावेत, याचा निर्धार इंदिरा गांधी यांनी केला. देश चालवायचा असेल, तर राष्ट्रनीती व आंतरराष्ट्रीय राजकारणाचाही अभ्यास करावा लागतो. इंदिरा गांधींमध्ये हे गुण होते. त्यांनी पाकिस्तानची कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू केले. मुक्ती वाहिनीच्या आंदोलकांना प्रशिक्षित करण्याचे काम भारतीय गुप्तचर संस्थांनी सुरू केले. त्यात माझाही सहभाग होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी पाकविरोधी आघाडी सुरू केली. अमेरिका, सोव्हिएत रशिया, फ्रान्स, ब्रिटन या राष्ट्रप्रमुखांच्या भेटी त्यांनी घेतल्या व पाकिस्तानचे पितळ उघडे पाडले.भारताशी पाकिस्तान युद्ध करेल, याचे संकेत मिळाले होते. मे-जूनच्या सुमारास युद्ध होईल, अशी शक्यता होती. ते भारताच्या हिताचे नव्हते. भौगोलिक व आंतरराष्ट्रीय स्तराबरोबरच हवामान योग्य नव्हते. युद्ध झाले असते, तर आज बांगलादेश अस्तित्वात नसता. त्यांनी लष्करप्रमुख जनरल माणेकशा यांना बोलावले. परिस्थितीचा आढावा घेतला. माणेकशा यांनीही तो इंदिराजींसमोर मांडला. येथे इंदिराजींच्या मुत्सद्दी धोरणाचा व दूरदृष्टीचा प्रत्यय आला. इंदिराजींना युद्ध लवकर संपवायचे होते. कारण, आंतरराष्ट्रीय दबाव वाढत होता. माणेकशा यांनी माहिती दिली. काही अवधी मागितला. इंदिराजींनी माणेकशा यांना अवधी व स्वातंत्र दिले. माणेकशा यांनी लष्करी तयारी, तर इंदिराजींनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची बाजू सांभाळली. अमेरिका पाकला युद्धात मदत करणार, हे उघड होते. याला शह देण्यासाठी त्यांनी सोव्हिएत रशियाशी करार केला. याचा उपयोग झाला. इंदिराजीच्या धोरणामुळे हे युद्ध भारतीय लष्कर १४ दिवसांत जिंकू शकले.पंतप्रधानांना दोन आघाड्यांवर हे युद्ध लढावे लागले. कमी दिवसांत युद्धाचा निकाल लावायचा होता. पूर्व पाकिस्तानला स्वतंत्र करायचे होते. पश्चिम भागात पाकिस्तान भारतावर आक्रमण करेल, हे त्यांना माहीत होते. मात्र, भारतीय लष्कराने पाकिस्तानचे डाव हाणून पाडले. युद्धाच्या १२ दिवसांत पाकिस्तान शरणागती पत्करेल, हे समजले, तेव्हा त्यांनी बांगलादेशचे भारतात विलीनीकरण केले नाही. मोठेपणा दाखवून पूर्व पाकिस्तानला स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा दिला आणि मुजिबुर रेहमान यांच्याकडे त्या देशाची सूत्रे सोपवली. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा उंचावली.पाकिस्तानच्या भूमीवर लढून ९८ हजार पाक सैनिकांना भारताने युद्धकैदी बनवले. पण त्यांना वाºयावर सोडले नाही. त्यांना बांगलादेशात ठेवले असते, तर तेथील नागरिकांनी त्यांना ठार केले असते. हे माहीत असल्याने इंदिराजींनी सर्व युद्धकैद्यांना भारतात आणले. दोन वर्षे त्यांना सांभाळले. या युद्धात पाकिस्तानची हानी भारताने केली. पश्चिम पाकमधील मोठा भूभाग भारताने जिंकला. सुपीक प्रांतातील ३५० गावे भारताच्या ताब्यात होती. पुढे सिमला करार झाला. युद्धकैद्यांना परत पाठविताना भारतीय भूभाग व काश्मीरमधील ताबा देण्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान झुल्फिकार भुट्टो यांनी मान्य केले. मात्र, त्यांनी शब्द पाळले नाहीत. इंदिराजींचे व्यक्तिमत्त्व एवढे मोठे होते, की त्यांनी शत्रूवरही विश्वास दाखविला. १९७१च्या युद्धातील यश हे केवळ इंदिराजींचे नेतृत्व आणि त्यांची दूरदृष्टी यामुळेच मिळाले.

(शब्दांकन : निनाद देशमुख)

टॅग्स :Indira Gandhi Birth Centenary Yearइंदिरा गांधी जन्मशताब्दी वर्ष