शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
2
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
3
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
4
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
5
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन
6
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
7
७० वर्षांच्या आजारी आजीला पाठीवरुन घेऊन जाणारा नातू सोशल मीडियावर बनला हिरो
8
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
9
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
10
पीएम मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ तात्काळ हटवा; पाटणा उच्च न्यायालयाचा आदेश
11
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
12
Ind Vs. Pak Asia Cup: आशिया कपमधून बाहेर गेल्यास पाकिस्तानचं कंबरडं मोडणार, होणार 'इतक्या' कोटींचं नुकसान
13
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
14
अकोला हादरले! शासकीय रुग्णालयातच एकाची दगडाने ठेचून हत्या, शाब्दिक वादातून मित्रानेच घेतला जीव
15
NEET च्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या आरोपीचा पोलिसांकडून एन्काऊंटर
16
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
17
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
18
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
19
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
20
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान

मुत्सद्दीपणामुळे १९७१ युद्धात पाकची हार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 07:21 IST

मुत्सद्दीपणा, दूरदृष्टी, निर्णयक्षमता व कूटनीती या बाबी परराष्ट्र धोरण राबविताना महत्त्वाच्या असतात. त्यांचा मेळ घालून १९७१च्या भारत-पाकिस्तान युद्धात दक्षिण आशिया खंडाचा नकाशा इंदिरा गांधी यांनी बदलला.

- दत्तात्रय शेकटकर(निवृत्त लेफ्टनंट जनरल)मुत्सद्दीपणा, दूरदृष्टी, निर्णयक्षमता व कूटनीती या बाबी परराष्ट्र धोरण राबविताना महत्त्वाच्या असतात. त्यांचा मेळ घालून १९७१च्या भारत-पाकिस्तान युद्धात दक्षिण आशिया खंडाचा नकाशा इंदिरा गांधी यांनी बदलला. बांगलादेशाची निर्मिती केली. आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर त्यांनी आखलेल्या मुत्सद्दी धोरणामुळेच १४ दिवसांत भारताने पाकिस्तानला नमवले.मी १९६३मध्ये लष्करी सेवेत रुजू झालो. त्या वेळी नेहरू पंतप्रधान होते. स्वातंत्र्यलढ्यातील कठीण प्रसंग इंदिराजींनी पाहिले होते; त्यांना स्वातंत्र्याची जाणीव होती. नेहरूंचे संस्कार असल्याने त्यांचे व्यक्तिमत्त्व कणखर बनले. त्या अनुभवाचा वापर त्यांनी भारताचे संरक्षण, प्रगती व विकासासाठी केला.पश्चिम पाकिस्तान पूर्वेकडील बंगाली जनतेवर अन्याय करीत होता. तेथील नागरिकांना हक्क मिळावेत, याचा निर्धार इंदिरा गांधी यांनी केला. देश चालवायचा असेल, तर राष्ट्रनीती व आंतरराष्ट्रीय राजकारणाचाही अभ्यास करावा लागतो. इंदिरा गांधींमध्ये हे गुण होते. त्यांनी पाकिस्तानची कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू केले. मुक्ती वाहिनीच्या आंदोलकांना प्रशिक्षित करण्याचे काम भारतीय गुप्तचर संस्थांनी सुरू केले. त्यात माझाही सहभाग होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी पाकविरोधी आघाडी सुरू केली. अमेरिका, सोव्हिएत रशिया, फ्रान्स, ब्रिटन या राष्ट्रप्रमुखांच्या भेटी त्यांनी घेतल्या व पाकिस्तानचे पितळ उघडे पाडले.भारताशी पाकिस्तान युद्ध करेल, याचे संकेत मिळाले होते. मे-जूनच्या सुमारास युद्ध होईल, अशी शक्यता होती. ते भारताच्या हिताचे नव्हते. भौगोलिक व आंतरराष्ट्रीय स्तराबरोबरच हवामान योग्य नव्हते. युद्ध झाले असते, तर आज बांगलादेश अस्तित्वात नसता. त्यांनी लष्करप्रमुख जनरल माणेकशा यांना बोलावले. परिस्थितीचा आढावा घेतला. माणेकशा यांनीही तो इंदिराजींसमोर मांडला. येथे इंदिराजींच्या मुत्सद्दी धोरणाचा व दूरदृष्टीचा प्रत्यय आला. इंदिराजींना युद्ध लवकर संपवायचे होते. कारण, आंतरराष्ट्रीय दबाव वाढत होता. माणेकशा यांनी माहिती दिली. काही अवधी मागितला. इंदिराजींनी माणेकशा यांना अवधी व स्वातंत्र दिले. माणेकशा यांनी लष्करी तयारी, तर इंदिराजींनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची बाजू सांभाळली. अमेरिका पाकला युद्धात मदत करणार, हे उघड होते. याला शह देण्यासाठी त्यांनी सोव्हिएत रशियाशी करार केला. याचा उपयोग झाला. इंदिराजीच्या धोरणामुळे हे युद्ध भारतीय लष्कर १४ दिवसांत जिंकू शकले.पंतप्रधानांना दोन आघाड्यांवर हे युद्ध लढावे लागले. कमी दिवसांत युद्धाचा निकाल लावायचा होता. पूर्व पाकिस्तानला स्वतंत्र करायचे होते. पश्चिम भागात पाकिस्तान भारतावर आक्रमण करेल, हे त्यांना माहीत होते. मात्र, भारतीय लष्कराने पाकिस्तानचे डाव हाणून पाडले. युद्धाच्या १२ दिवसांत पाकिस्तान शरणागती पत्करेल, हे समजले, तेव्हा त्यांनी बांगलादेशचे भारतात विलीनीकरण केले नाही. मोठेपणा दाखवून पूर्व पाकिस्तानला स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा दिला आणि मुजिबुर रेहमान यांच्याकडे त्या देशाची सूत्रे सोपवली. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा उंचावली.पाकिस्तानच्या भूमीवर लढून ९८ हजार पाक सैनिकांना भारताने युद्धकैदी बनवले. पण त्यांना वाºयावर सोडले नाही. त्यांना बांगलादेशात ठेवले असते, तर तेथील नागरिकांनी त्यांना ठार केले असते. हे माहीत असल्याने इंदिराजींनी सर्व युद्धकैद्यांना भारतात आणले. दोन वर्षे त्यांना सांभाळले. या युद्धात पाकिस्तानची हानी भारताने केली. पश्चिम पाकमधील मोठा भूभाग भारताने जिंकला. सुपीक प्रांतातील ३५० गावे भारताच्या ताब्यात होती. पुढे सिमला करार झाला. युद्धकैद्यांना परत पाठविताना भारतीय भूभाग व काश्मीरमधील ताबा देण्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान झुल्फिकार भुट्टो यांनी मान्य केले. मात्र, त्यांनी शब्द पाळले नाहीत. इंदिराजींचे व्यक्तिमत्त्व एवढे मोठे होते, की त्यांनी शत्रूवरही विश्वास दाखविला. १९७१च्या युद्धातील यश हे केवळ इंदिराजींचे नेतृत्व आणि त्यांची दूरदृष्टी यामुळेच मिळाले.

(शब्दांकन : निनाद देशमुख)

टॅग्स :Indira Gandhi Birth Centenary Yearइंदिरा गांधी जन्मशताब्दी वर्ष