शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
3
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
4
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
5
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
6
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
7
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
8
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
9
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
10
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
11
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
12
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
13
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
14
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
15
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
16
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
17
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
18
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
19
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
20
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा

पाकिस्तानचे २० सैनिक ठार

By admin | Updated: October 30, 2016 06:31 IST

भारतीय लष्कराने शनिवारी जोरदार हल्ला चढवून पाकिस्तानी लष्कराच्या नियंत्रण रेषेलगतच्या चार चौक्या उद्ध्वस्त केल्या. पाककडून सातत्याने होत असलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनाला

श्रीनगर : भारतीय लष्कराने शनिवारी जोरदार हल्ला चढवून पाकिस्तानी लष्कराच्या नियंत्रण रेषेलगतच्या चार चौक्या उद्ध्वस्त केल्या. पाककडून सातत्याने होत असलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनाला प्रत्युत्तर म्हणून हा हल्ला करण्यात आला. भारताच्या या आक्रमक कारवाईत पाकचे किमान २० सैनिक ठार झाल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे. मात्र याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.भारतीय लष्कराच्या हल्ल्यात पाकच्या चार चौक्या उद्ध्वस्त झाल्या असून, मोठी जीवितहानी घडवून आणण्यात आली आहे, असे लष्कराच्या नार्दर्न कमांडने ट्विटरवर म्हटले आहे. पाकच्या गोळीबारात भारतीय जवान नितीन सुभाष कोळी आणि मनदीपसिंह शहीद झाल्याच्या दुसऱ्या दिवशी भारताने आक्रमक कारवाई करून हिशेब चुकता केला. पाकने मनदीप याच्या मृतदेहाची विटंबना केली होती. यानंतर बीएसएफचे महानिरीक्षक अरुण कुमार यांनी पाकला चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असे म्हटले होते. गृहमंत्री राजनाथसिंह यांनीही सरकार आणि सुरक्षा दले भारतीयांची मान खाली जाऊ देणार नाहीत, असे सांगून जोरदार कारवाईचे संकेत दिले होते. भारताने केलेल्या हल्ल्यात ठार झालेल्या पाक सैनिकांची संख्या दोन आकडी असू शकते, असे सूत्रांनी सांगितले. भारताच्या २९ सप्टेंबरच्या लक्ष्यभेदी हल्ल्यानंतर (सर्जिकल स्ट्राईक) उभय देशांच्या सीमेवर तणाव निर्माण झाला आहे. सर्जिकल

स्ट्राईकनंतर पाकने ५० हून अधिक वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. यात जवानांसह ६ ते ७ भारतीय मृत्युमुखी पडले आहेत. तथापि, भारताने प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात पाकचे २० हून अधिक लोक ठार झाले आहेत. भारतीय सैन्यदलाने गुरुवारी १५ पाकिस्तान रेंजर्सचा खात्मा केला होता. पाकने शनिवारी जम्मू-काश्मीरच्या केरन भागात केलेल्या गोळीबारात एक जवान आणि एक महिला, असे दोन जण जखमी झाले. त्यानंतर भारतीय सैनिकांच्या बंदुका पाकवर तुटून पडल्या. (वृत्तसंस्था)