शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
2
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
3
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
4
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
5
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
6
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
7
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
8
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
9
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
10
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
11
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
12
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
13
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
15
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
16
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
17
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
18
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

पाकिस्तानी दहशतवाद्याची घुसखोरी 45 टक्क्यांनी झाली कमी- राजनाथ सिंह

By admin | Updated: June 3, 2017 14:27 IST

भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकनंतर पाकिस्तानमधून येणाऱ्या दहशतवाद्यांची घुसखोरी 45 टक्क्यांनी कमी झाल्याची माहिती राजनाथ सिंह यांनी दिली आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 3- केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी काश्मिर खोऱ्यातील सुरक्षेविषयी महत्त्वाची माहिती दिली आहे. काश्मिर खोऱ्यातील सुरक्षेच्या परिस्थितीत सुधारणा झाली आहे. भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकनंतर पाकिस्तानमधून येणाऱ्या दहशतवाद्यांची घुसखोरी 45 टक्क्यांनी कमी झाल्याची माहिती राजनाथ सिंह यांनी दिली आहे. मोदी सरकारला तीन वर्ष पुर्ण झाल्या निमित्त आयोजीत एका कार्यक्रमात राजनाथ सिंह यांनी कामाचा लेखाजोखा मांडला. 
 
भारतीय सैन्याने गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये सर्जिकल स्ट्राइक केलं होतं. या सर्जिकल स्टाईकमध्ये एलओसीवरच्या दहशतवाद्यांच्या चौक्या उद्ध्वस्त करण्यात आल्या होत्या. तसंच बऱ्याच दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं होतं. 
"जम्मू आणि काश्मिरमधील सुरक्षा परिस्थिती सुधारली आहे. तसंच 2014 ते 2017 या तीन वर्षात तब्बल 368 दहशतवाद्यांना मारण्यात लष्कराला यश आल्याचं राजनाथ सिंह यांनी सांगितलं आहे. 
 
जम्मू-काश्मिरमध्ये पाक पुरस्कृत दहशतवादाला मूळापासून संपवणार असल्याचंही या कार्यक्रमात राजनाथ सिंह म्हणाले आहेत. सरकारने दहशतवादाविरोधात चांगलं अभियान सुरू केलं आहे आणि देशात मुस्लिमांची संख्या जास्त असूनही आयसीस सारख्या संघटनांना भारतात मजबूत होऊ दिलं नाही, असा दावा राजनाथ सिंह यांनी केला आहे.