शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

सुषमा स्वराज यांच्यामुळे पाकिस्तानी वधू पोहोचली भारतात

By admin | Updated: November 7, 2016 10:40 IST

भारत - पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे लग्न होणार की नाही या चिंतेत पडलेल्या जोडप्याला केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्यामुळे दिलासा मिळाला आहे

ऑनलाइन लोकमत
जोधपूर, दि. 7 - भारत - पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे लग्न होणार की नाही या चिंतेत पडलेल्या जोडप्याला केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्यामुळे दिलासा मिळाला आहे. राजस्थानच्या नरेश तिवानीचं पाकिस्तानमधील प्रिया बच्चानीशी लग्न ठरलं होतं. पण भारत - पाकिस्तानमधील तणावामुळे त्यांना व्हिसा मिळत नव्हता. पण शेवटी एक महिन्यानंतर सुषमा स्वराज यांनी दोघांनाही लग्नाची भेट देत वधू प्रिया बच्चानी आणि तिच्या कुटुंबाचा भारतात येण्याचा मार्ग मोकळा केला आहे.
 
सर्व ठरल्याप्रमाणे 7 नोव्हेंबरला नरेश तिवानी आणि प्रिया बच्चानी विवाहबंधनात अडकणार होते. पण पाकिस्तानधील भारतीय दुतावासाकडून आपल्याला आणि कुटुंबियांना व्हिसा मिळत नसल्याची तक्रार प्रियाने ट्विटरच्या माध्यमातून सुषमा स्वराज यांच्याकडे केली होती. आपल्यासहित 35 नातेवाईकांना व्हिसा मिळावा असी विनंती तिने केली होती. सुषमा स्वराज यांनी यावर लक्ष देत प्रिया आणि तिच्या कुटुंबियांना व्हिसा मिळवून दिला आहे. 
 
 
'सुषमा स्वराज यांनी दिलेल्या तात्काळ उत्तरासाठी आम्ही त्यांचे आभारी आहे. सर्व 35 नातेवाईकांना व्हिसा मिळाला असून दोन भागांमध्ये ते भारतात येणार आहेत,' अशी माहिती नरेशने दिली आहे. 
नरेश तिवानी आणि कराचीमधील प्रिया बच्चानीचा दोन वर्षापुर्वी साखरपुडा झाला होता. एका मॅट्रिमोनी साईटच्या माध्यमातून दोन्ही कुटुंब एकमेकांच्या संपर्कात आले होते. 2014 मध्ये साखरपुड्यासाठी प्रिया बच्चानी आणि तिचं कुटुंब जोधपूरला आलं होतं. प्रियाच्या वडिलांच्या निवृत्तीपर्यंत लग्न करायचं नाही असं ठरल्याने लग्नाची तारीख लांबली होती.
 
ऑगस्टमध्ये प्रियाचे वडिल निवृत्त झाल्यानंतर लग्नाची ताऱीख ठरली होती. व्हिसा मिळवण्यासाठीच्या सर्व प्रक्रिया पुर्ण केल्या मात्र व्हिसा मिळणार नाही असं कळल्यानंतर सगळे संभ्रामवस्थेत होते.. प्रियाच्या कुटुंबियांनी स्थानिक नेत्यांकडे मदत मागितली होती. मात्र त्याचा काहीच फायदा झाला नाही. शेवटी केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज मदतीला धावल्याने हे लग्न निर्विघ्न पार पडणार आहे.