शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
2
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
3
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
4
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
5
"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं
6
एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...
7
तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?
8
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
9
दिल्लीसह देशभरातील वीज ग्राहकांना बसणार ‘शॉक’, वीजदरात वाढ करण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी
10
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
11
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतरही टीम इंडियाने सेलिब्रेशन का नाही केलं? कारण...
12
FD मध्ये पैसे गुंतवताय? 'या' ६ बँका देत आहेत सर्वाधिक व्याज, लगेच तपासा यादी!
13
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
14
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
15
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
16
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
17
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
18
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
19
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
20
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब

सुषमा स्वराज यांच्यामुळे पाकिस्तानी वधू पोहोचली भारतात

By admin | Updated: November 7, 2016 10:40 IST

भारत - पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे लग्न होणार की नाही या चिंतेत पडलेल्या जोडप्याला केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्यामुळे दिलासा मिळाला आहे

ऑनलाइन लोकमत
जोधपूर, दि. 7 - भारत - पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे लग्न होणार की नाही या चिंतेत पडलेल्या जोडप्याला केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्यामुळे दिलासा मिळाला आहे. राजस्थानच्या नरेश तिवानीचं पाकिस्तानमधील प्रिया बच्चानीशी लग्न ठरलं होतं. पण भारत - पाकिस्तानमधील तणावामुळे त्यांना व्हिसा मिळत नव्हता. पण शेवटी एक महिन्यानंतर सुषमा स्वराज यांनी दोघांनाही लग्नाची भेट देत वधू प्रिया बच्चानी आणि तिच्या कुटुंबाचा भारतात येण्याचा मार्ग मोकळा केला आहे.
 
सर्व ठरल्याप्रमाणे 7 नोव्हेंबरला नरेश तिवानी आणि प्रिया बच्चानी विवाहबंधनात अडकणार होते. पण पाकिस्तानधील भारतीय दुतावासाकडून आपल्याला आणि कुटुंबियांना व्हिसा मिळत नसल्याची तक्रार प्रियाने ट्विटरच्या माध्यमातून सुषमा स्वराज यांच्याकडे केली होती. आपल्यासहित 35 नातेवाईकांना व्हिसा मिळावा असी विनंती तिने केली होती. सुषमा स्वराज यांनी यावर लक्ष देत प्रिया आणि तिच्या कुटुंबियांना व्हिसा मिळवून दिला आहे. 
 
 
'सुषमा स्वराज यांनी दिलेल्या तात्काळ उत्तरासाठी आम्ही त्यांचे आभारी आहे. सर्व 35 नातेवाईकांना व्हिसा मिळाला असून दोन भागांमध्ये ते भारतात येणार आहेत,' अशी माहिती नरेशने दिली आहे. 
नरेश तिवानी आणि कराचीमधील प्रिया बच्चानीचा दोन वर्षापुर्वी साखरपुडा झाला होता. एका मॅट्रिमोनी साईटच्या माध्यमातून दोन्ही कुटुंब एकमेकांच्या संपर्कात आले होते. 2014 मध्ये साखरपुड्यासाठी प्रिया बच्चानी आणि तिचं कुटुंब जोधपूरला आलं होतं. प्रियाच्या वडिलांच्या निवृत्तीपर्यंत लग्न करायचं नाही असं ठरल्याने लग्नाची तारीख लांबली होती.
 
ऑगस्टमध्ये प्रियाचे वडिल निवृत्त झाल्यानंतर लग्नाची ताऱीख ठरली होती. व्हिसा मिळवण्यासाठीच्या सर्व प्रक्रिया पुर्ण केल्या मात्र व्हिसा मिळणार नाही असं कळल्यानंतर सगळे संभ्रामवस्थेत होते.. प्रियाच्या कुटुंबियांनी स्थानिक नेत्यांकडे मदत मागितली होती. मात्र त्याचा काहीच फायदा झाला नाही. शेवटी केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज मदतीला धावल्याने हे लग्न निर्विघ्न पार पडणार आहे.