शहरं
Join us  
Trending Stories
1
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
4
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्विट केलं डिलीट
5
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
6
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
7
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
8
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
9
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
10
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
11
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
12
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
13
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
14
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
15
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
16
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
17
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
18
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
19
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?

सुषमा स्वराज यांच्यामुळे पाकिस्तानी वधू पोहोचली भारतात

By admin | Updated: November 7, 2016 10:40 IST

भारत - पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे लग्न होणार की नाही या चिंतेत पडलेल्या जोडप्याला केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्यामुळे दिलासा मिळाला आहे

ऑनलाइन लोकमत
जोधपूर, दि. 7 - भारत - पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे लग्न होणार की नाही या चिंतेत पडलेल्या जोडप्याला केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्यामुळे दिलासा मिळाला आहे. राजस्थानच्या नरेश तिवानीचं पाकिस्तानमधील प्रिया बच्चानीशी लग्न ठरलं होतं. पण भारत - पाकिस्तानमधील तणावामुळे त्यांना व्हिसा मिळत नव्हता. पण शेवटी एक महिन्यानंतर सुषमा स्वराज यांनी दोघांनाही लग्नाची भेट देत वधू प्रिया बच्चानी आणि तिच्या कुटुंबाचा भारतात येण्याचा मार्ग मोकळा केला आहे.
 
सर्व ठरल्याप्रमाणे 7 नोव्हेंबरला नरेश तिवानी आणि प्रिया बच्चानी विवाहबंधनात अडकणार होते. पण पाकिस्तानधील भारतीय दुतावासाकडून आपल्याला आणि कुटुंबियांना व्हिसा मिळत नसल्याची तक्रार प्रियाने ट्विटरच्या माध्यमातून सुषमा स्वराज यांच्याकडे केली होती. आपल्यासहित 35 नातेवाईकांना व्हिसा मिळावा असी विनंती तिने केली होती. सुषमा स्वराज यांनी यावर लक्ष देत प्रिया आणि तिच्या कुटुंबियांना व्हिसा मिळवून दिला आहे. 
 
 
'सुषमा स्वराज यांनी दिलेल्या तात्काळ उत्तरासाठी आम्ही त्यांचे आभारी आहे. सर्व 35 नातेवाईकांना व्हिसा मिळाला असून दोन भागांमध्ये ते भारतात येणार आहेत,' अशी माहिती नरेशने दिली आहे. 
नरेश तिवानी आणि कराचीमधील प्रिया बच्चानीचा दोन वर्षापुर्वी साखरपुडा झाला होता. एका मॅट्रिमोनी साईटच्या माध्यमातून दोन्ही कुटुंब एकमेकांच्या संपर्कात आले होते. 2014 मध्ये साखरपुड्यासाठी प्रिया बच्चानी आणि तिचं कुटुंब जोधपूरला आलं होतं. प्रियाच्या वडिलांच्या निवृत्तीपर्यंत लग्न करायचं नाही असं ठरल्याने लग्नाची तारीख लांबली होती.
 
ऑगस्टमध्ये प्रियाचे वडिल निवृत्त झाल्यानंतर लग्नाची ताऱीख ठरली होती. व्हिसा मिळवण्यासाठीच्या सर्व प्रक्रिया पुर्ण केल्या मात्र व्हिसा मिळणार नाही असं कळल्यानंतर सगळे संभ्रामवस्थेत होते.. प्रियाच्या कुटुंबियांनी स्थानिक नेत्यांकडे मदत मागितली होती. मात्र त्याचा काहीच फायदा झाला नाही. शेवटी केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज मदतीला धावल्याने हे लग्न निर्विघ्न पार पडणार आहे.