शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तान मृत्यूचा सापळा आहे, तिथे जाणे सोपे पण परतणे अशक्य - उज्मा

By admin | Updated: May 25, 2017 17:43 IST

पाकिस्तान मृत्यूचा सापळा आहे. तिथे जाणे सोपे आहे पण तिथून परतणे जवळपास अशक्यच आहे.

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 25 - पाकिस्तान मृत्यूचा सापळा आहे. तिथे जाणे सोपे आहे पण तिथून परतणे जवळपास अशक्यच आहे. पाकिस्तानात महिलाच काय, पुरुषही सुरक्षित नाहीत असा शब्दात पाकिस्तानातून परतलेल्या उज्मा अहमदने आपला अनुभव कथन केला. बंदुकीच्या धाकावर लग्नास भाग पाडण्यात आलेली उज्मा आज मायदेशी परतली. बुधवारी इस्लामाबाद उच्च न्यायालयाने उज्माला मायदेशी परतण्याची परवानगी दिली होती, तसेच पोलिसांना तिला वाघा सीमेपर्यंत सोडण्याचे आदेश दिले होते.
 
भारतात परतल्यानंतर उज्माने आज परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची नवी दिल्लीत भेट घेतली. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना उज्माने तिचा अनुभव कथन केला. विवाह करुन पाकिस्तानात गेलेल्या महिलांना मी पाहिले आहे. त्यांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. प्रत्येक घरात एका पुरुषाला दोन-तीन, चार बायका असतात. आणखी काही दिवस मी तिथे राहिले असते तर, माझा मृत्यू झाला असता. फिलिपाईन्स, मलेशिया या देशातून महिलांना प्रेमामध्ये फसवून पाकिस्तानात आणले जाते. अशा अनेक महिला आज पाकिस्तानमध्ये अडकल्या आहेत असे उज्माने सांगितले. 
 
उज्माने तिची सुटका केल्याबद्दल भारतीय दूतावासाला धन्यवाद दिले. भारतीय दूतावास आणि परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे मी आभार मानते. त्यांनी मला आशा आणि जगण्याला कारण दिले. मला मिळालेल आयुष्य अमुल्य आहे याची मला त्यांनी जाणीव करुन दिली. त्यामुळे मी परिस्थितीशी लढाई करु शकले असे उज्माने सांगितले.  भारतीय दूतावासात जाऊन माझी परिस्थिती सांगितल्यानंतर त्यांनी लगेच माझ्यावर विश्वास ठेवला ही मोठी गोष्ट आहे. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी मला हिम्मत दिली. त्यांच्यामुळे आज मी सुरक्षित, सुखरुप असून तुमच्याशी बोलू शकतेय असे उज्मा अहमदने सांगितले. 
 
पाकिस्तानी नागरिक ताहिर अलीने बळजबरीने उज्माशी लग्न केले होते. मायदेशी परतू दिले जात नसल्यामुळे उज्माने भारतीय उच्चायुक्तालयात आश्रय घेतला होता. केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी उज्माचे स्वागत केले. आतापर्यंत ज्या त्रासाला सामोरं जाव लागलं त्यासाठी माफीही मागितली. लग्नास भाग पाडल्याने उज्माने पतीविरोधात इस्लामाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सुनावणीच्यावेळी उज्माने ताहीरला भेटण्याची आपल्याला अजिबात इच्छा नसल्याचे न्यायालयाला सांगितले. न्यायाधीशांनी उज्माला भारतात परतण्याची परवानगी दिल्यानंतर तिला आपल्या चेह-यावरचा आनंद लपवता आला नाही. 
 
उज्माच्या जीवाला धोका असल्याने ती इस्लामाबादमधील भारतीय दूतावासामध्ये राहत होती. जो पर्यंत भारतात परतण्याची परवानगी मिळणार नाही तो पर्यंत तिने दूतावास सोडण्यास नकार दिला होता.  पाकिस्तानातील पतीनं भारतीय उच्चायुक्तालयावरच भारतीय पत्नीला ताब्यात घेतल्याचा आरोप केला होता. आम्ही दोघेही व्हिसा घेण्यासाठी भारतीय दूतावासात गेलो होतो. त्यावेळी पत्नी अचानक बेपत्ता झाली, असं ताहीरने सांगितले होते.
 
आणखी वाचा 
 
उज्मा आणि ताहिर अली यांची ओळख मलेशियामध्ये झाली होती. त्याच वेळी दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळून आले. त्यानंतर उज्मा 1 मे रोजी वाघा-अटारी सीमेवरून पाकिस्तानात दाखल झाली आणि त्यांनी 3 मे रोजी निकाह केला. मात्र पाकिस्तानी वृत्तपत्र न्यूज इंटरनॅशनलच्या रिपोर्टनुसार, दोघे जण उच्चायुक्तालयात गेले होते. त्यावेळी त्यांनी स्वतःचा व्हिसा फॉर्म आणि फोन अधिका-यांकडे सुपूर्द केला. 
 
अधिका-यांनी बोलावल्यानंतर उज्मा बिल्डिंगच्या आत गेली, तिचा पती त्यावेळी बाहेरच होता. ब-याच वेळ झाला तरी उज्मा न आल्यानं अखेर पतीनं बिल्डिंगमध्ये प्रवेश केला. मात्र भारतीय उच्चायुक्तालयानं उज्मा इथे नसल्याचं सांगितलं. तसेच अधिका-यांनी त्यांचे तीन मोबाईल फोनही परत केले नाहीत.
 
पाकिस्तानचे मानले आभार 
उज्मा प्रकरणात भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानचेही आभार मानले आहेत. पाकिस्ताननेही मदत केल्यामुळे उज्माची भारतवापसी शक्य झाल्याचे सुषमा स्वराज सांगितले.