शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानने भारताचे आभार मानले पाहिजेत - अदनान सामी

By admin | Updated: October 4, 2016 14:19 IST

अदनान सामीने टीका करणा-यांना चोख उत्तर देत पाकिस्तानने भारताचे आभार मानले पाहिजेत असा सल्ला दिला आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 4 - भारताने केलेल्या सर्जिंकल स्ट्राईकनंतर एकीकडे पाकिस्तानी कलाकारांनी माफी मागण्यास नकार दिला असताना अदनान सामीने मात्र उघडपणे ट्विटरच्या माध्यमातून भारताच्या कारवाईबद्दल जवान आणि पंतप्रधानांचं अभिनंदन केलं होतं. मात्र एकेकाळी पाकिस्तानचा नागरिक असणा-या अदनान सामीने केलेलं हे कौतुक पाकिस्तानी नागरिकांना रुचलं नाही. त्यांनी अदनान सामीला देशद्रोही संबोधत टार्गेट करण्यास सुरुवात केली. अदनान सामीने टीका करणा-यांना चोख उत्तर दिलं आहे. पाकिस्तानने भारताचे आभार मानले पाहिजेत असा सल्ला अदनान सामीने दिला आहे.
 
 
'माझे ट्विट दोन्ही देशांना आणि संपुर्ण जगाला धोका असणा-या शत्रुविरोधात होते. दहशतवाद्यांचा खात्मा केल्याबद्दल पाकिस्तानने भारताचे आभार मानले पाहिजेत. गेली अनेक वर्ष पाकिस्तानच आपण दहशतवादाचे पीडित असल्याचं सांगत आहे. जेव्हा तुमचा शेजरचा देश दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी मदत करतो त्याची साधी दखलही तुम्ही घेत नाही', असं अदनान सामी बोलला आहे.
 
 
आपल्या ट्विटवर स्पष्टीकरण देत आपण पाकिस्तानचं नावही घेतलं नव्हतं असं अदनान सामीने सांगितलं आहे. त्यांचा त्यांनीच अंदाज लावला आणि  त्यामुळे पाकिस्तान आणि दहशतवादाला एकाच नजरेनं पाहिलं जात आहे असं लिहिल्याचं अदनान सामीने सांगितलं. पुन्हा पाकिस्तानला परत जावं लागल्यास मला अजिबत भीती वाटणार नाही. जर मी कोणाला घाबरत आहे तर ते फक्त देवाला. जर माझ्या नशीबात असेल तर मी पुन्हा पाकिस्तानात जाईन, आणि जाताना घाबरणार नाही असं अदनान सामी बोलला आहे,