शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणूक २०२५: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
2
'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
3
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
4
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
5
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
6
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
7
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
8
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
9
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
10
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
11
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
12
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
13
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
14
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
15
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
16
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
17
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
18
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
19
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
20
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा

पाकचा गोळीबार; एक जवान शहीद

By admin | Updated: October 17, 2016 05:19 IST

राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेवरील ठाण्यांवर पाकिस्तानने छोट्या शस्त्रांतून गोळीबार करून युद्धविरामचे उल्लंघन केले.

जम्मू : राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेवरील ठाण्यांवर पाकिस्तानने छोट्या शस्त्रांतून गोळीबार करून युद्धविरामचे उल्लंघन केले. जवळपास एक आठवड्यानंतर पाकिस्तानने हे उल्लंघन केले. पाकिस्तानच्या गोळीबाराला भारताकडूनही तसेच उत्तर दिले गेले. या चकमकीत एक भारतीय जवान शहीद झाला. राजौरी जिल्ह्यातील नवशेरा विभागात नियंत्रण रेषेवर कोणतेही कारण नसताना पाकिस्तानी सैन्याने गोळीबार केला, असे संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने येथे सांगितले. या गोळीबारात कोणीही जखमी झालेले नाही. भारताने २९ सप्टेंबर रोजी पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या लक्ष्यभेदी लष्करी कारवाईनंतर पाकिस्तानकडून २५ वेळा युद्धविरामचे उल्लंघन झाल्याची माहिती लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.पाकिस्तानकडून हेरगिरीच्या उद्देशाने पाठविली गेल्याचे सांगितली जात असलेली १५० पेक्षा जास्त कबुतरे जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी जप्त केली. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले गेले आहेत. जम्मूतील विक्रम चौकात पाच आॅक्टोबर रोजी तीन लोकांना पकडण्यात आले होते. त्यांच्याकडील केळ््याच्या खोक्यात १५० कबुतरे आढळली. त्या तिघांवर जनावरांना क्रूर वागणूक प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून कबुतरे सेव्ह (सेव्ह अ‍ॅनिमल्स, व्हॅल्यू एन्व्हायरमेंट) या स्वयंसेवी संस्थेकडे सोपविण्यात आली. सेव्हच्या अध्यक्षांना या कबुतरांबाबत संशय आल्यामुळे त्यांनी जम्मुच्या उपायुक्तांना तसे पत्र लिहिले. त्यानंतर हेरगिरीसाठी या कबुतरांचा वापर केला जात आहे का या अंगाने चौकशी करण्याचा आदेश उपायुक्तांनी दिला. (वृत्तसंस्था)काश्मीर खोऱ्यातील अशांतता शंभर दिवसांचीहिजबुल मुजाहिदीनचा कमांडर बुऱ्हान वानी हा सुरक्षा दलांसोबत चकमकीत ठार झाल्यानंतर काश्मीर खोऱ्यात सुरू झालेली अस्वस्थता व अशांतता रविवारी १०० दिवसांची झाली. अनेक दिवस संचारबंदीला तोंड दिलेल्या परिस्थितीत सुधारणा झाल्यामुळे आता खोरे संचारबंदीमुक्त आहे. दक्षिण काश्मीरमध्ये ८ जुलै रोजी वानी चकमकीत ठार झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून अस्वस्थेला सुरवात झाली. तेव्हापासून सुरक्षा दलांशी चकमकी, हिंसाचार, हल्ले यात दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह ८४ लोक ठार तर काही हजार जखमी झाले. तेव्हापासून खोऱ्यात सतत बंद, हरताळ, हिंसाचारामुळे दैनंदिन व्यवहार जवळपास बंदच आहेत. हरताळ, बंद, मोर्चे, निदर्शने आदी मार्गांनी फुटीरवाद्यांनी आंदोलन सुरू ठेवले असून हे आंदोलन त्यांनी जेव्हा बंद केले तेव्हाच संचारबंदी शिथील झालेली आहे. >सर्जिकल स्ट्राइक्सची माहिती उद्या संसद समितीला देणारपाकव्याप्त काश्मीरमध्ये गेल्या महिन्यात लष्कराने केलेल्या लक्ष्यभेदी लष्करी कारवाईची (सर्जिकल स्ट्राईक्स) माहिती परराष्ट्र सचिव आणि लष्करी कारवायांचे महासंचालक यांच्यासह वरिष्ठ अधिकारी १८ आॅक्टोबर रोजी खासदारांच्या समितीला देतील.या समितीत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचाही समावेश आहे. परराष्ट्र व्यवहारांवरील संसदेची ही स्थायी समिती खासदार शशी थरूर यांच्या अध्यक्षतेखाली असून तिची बैठक मंगळवारी होत आहे.