शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पान ४ दोशी पोलिस अधिकार्‍यांना निलंबित करा

By admin | Updated: May 9, 2015 01:44 IST

द सिटीझन ऑफ आबंावली ॲण्ड कुंकळळी संघटनेचे मागणी : केगदीक˜ा अपघात प्रकरण

द सिटीझन ऑफ आबंावली ॲण्ड कुंकळळी संघटनेचे मागणी : केगदीक˜ा अपघात प्रकरण
मडगाव : केगदीक˜ा येथील अपघाताला पोलिसांचा हलगर्जीपणा कारणीभूत आहे. जोपर्यंत दोषी पोलीस अधिकार्‍यांना निलंबीत करुन या प्रकरणाची न्यायालयीन चौकशीची लेखी हमी मुख्यमंत्री देत नाहीत तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा इशारा द सिटीझन ऑफ आबंावली ॲण्ड कुंकळळी संघटनेने दिला आहे.
मडगावात शुक्रवारी या संघटनेने पत्रकार परिषद घेउन अपघाताला कारणीभूत असलेले वाहन आमदार बेंजामिन सिल्वा यांच्या नातेवाईकांचे असल्याने पोलिस या प्रकरणात गंभीर नसल्याचा आरोप करण्यात आला. गेल्या सोमवारी एका मासळीवाहू ट्रकच्या चाकाखाली सापडून ॲलिस्टन फर्नांडीस हा दुचाकीचालक ठार झाला होता.
दरम्यान, आरोपांचे आमदार सिल्वा यांनी खंडन केले आहे. घटनेच्या दिवसांपासून या वाहनाच्या मालकाला भेटलोही नाही. विरोधक आपल्याविरुध्द राजकीय षडयंत्र रचत आहेत. कायद्यापुढे सर्व गोष्टी उघड होतील असे त्यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेत डॉ. जर्सन फर्नांडीस, आंबावली पंचायतीचे माजी सरपंच महेंद्र बाळे, ताराचंद्र देसाई व मयताचे नातेवाईक उपस्थित होते. उपअधिक्षक मोहन नाईक, कुंकळळीचे पोलीस निरीक्षक राम आसरे,सहायय्क पोलीस उपनिरीक्षक रमाकांत वेळीप व पोलीस शिपाई निलेश देसाई यांना निलंबीत करावे अश्ी मागणी या संघटनेतर्फे मुख्यमंत्र्यांना करण्यात आली आहे. नि:पक्षपातीपणे या प्रकरणाची न्यायालयानी चौकशी करुन या सर्व अधिकार्‍यांवर गुन्हा नोंदवावा.
अपघातस्थळी वाहननियमाचे फलक व गतीरोधक बसवावे व ज्या १५ स्थानिक व ३00 अनोळखींवर बोगस गुन्हे दाखल केले आहे ते मागे घ्यावेत, अशी मागणी केली आहे.
अपघातस्थळी नाकाबंदीसाठी बेरेकेडस उभारले होते असे पोलिसांनी सांगितले. मात्र, तेथे पोलीस का नव्हते याचे उत्तर मिळत नाही, तसेच अपघात झाल्यानंतर तेथून बॅरेकेडस हटविले याकडेही या संघटनेने लक्ष वेधले आहे.
पंचनामा करताना पोलिसांकडे साधी टेपही नव्हती. जीपमध्ये पेट्रोल नसल्याने पोलीसांना दुचाकीवरुन यावे लागले असे पोलीस निरीक्षक सांगतात. हे लज्जास्पद असल्याचे डॉ. फर्नांडीस म्हणाले. अपघातस्थळावरील सांडलेले रक्त धुण्यासाठी अग्निशामक दलाची गाडी आणण्यात आली होती हे पटणारे नाही. निलेश देसाई हा सीआयडी पोलीस अपघातस्थळी येउन विमा मिळेल तो घ्या असे सांगत होता, त्यामुळे या अपघाताच्या तपासाबाबत पोलीस किती गंभिर आहेत हे उमजते असे त्यांनी सांगितले.
ज्या लोकांना पोलिसांनी साक्षिदार म्हणून ठेवले त्यांच्याविरुध्दचे गुन्हे नोंद केलेले आहे, हाही एक विरोधाभास आहे. (प्रतिनिधी)