शहरं
Join us  
Trending Stories
1
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
2
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
3
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
4
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
5
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
6
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
7
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
8
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
10
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
11
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
12
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ
13
यूपीपाठोपाठ दिल्लीत एन्काउंटरमध्ये वाढ, जूनच्या पहिल्या पाच दिवसांत पाच एन्काउंटर
14
नेपाळच्या ७ हजार लोकांना अमेरिका सोडावी लागणार, अमेरिकेने विशेष देशाचा दर्जा काढून घेतला
15
अंध वकिलाकडून सुप्रीम कोर्टात प्रथमच युक्तिवाद, भारतीय न्यायव्यवस्थेत ऐतिहासिक क्षण
16
जळक्या नोटा : न्या. वर्मांपुढे आता राजीनाम्याचाच पर्याय
17
मणिपूर पेटले, निदर्शकांनी अंगावर घेतले पेट्रोल ओतून
18
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
19
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
20
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  

...अन्यथा आम्हीच कारवाई करू

By admin | Updated: September 23, 2016 01:37 IST

जो देश भारतात दहशतवादी पाठवतो, त्याच्याविरोधात जर काही ठोस कारवाई झाली नाही, तर पाकिस्तानविरोधात भारताला ‘काही कृती’ करणे भाग पडेल, असा निरोप मोदी यांनी जागतिक नेत्यांना दिल्याचे समजते.

हरीश गुप्ता, नवी दिल्लीजो देश भारतात दहशतवादी  पाठवतो, त्याच्याविरोधात जर काही ठोस कारवाई झाली नाही,  तर पाकिस्तानविरोधात भारताला ‘काही कृती’ करणे भाग पडेल, असा निरोप मोदी यांनी जागतिक नेत्यांना दिल्याचे समजते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी नवी दिल्लीतील वॉर रूमला भेट देऊन दोन तास तेथे चर्चा केली.

भारताने संयुक्त राष्ट्रे आणि सार्क परिषदेसह विविध आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर पाकिस्तानविरुद्ध थेट आणि अत्यंत कठोरपणे टीकास्त्र सोडले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर ही आघाडी उघडलेली असतानाच, भारत लष्करी कारवाईबाबत गांभीर्याने विचार करीत आहे. असे असतानाच मुत्सद्देगिरीच्या पातळीवर भारत पाकविरुद्ध थेट आणि आक्रमकपणे मैदानात उतरला आहे. पंतप्रधान मोदींनाही हेच अपेक्षित आहे.

इंटेलिजन्स ब्युरोचे संचालक दिनेश्वर शर्मा यांनी दहशतवादाला पाठिंबा देणारांवर निर्बंध घालणे आवश्यक झाले आहे, असे सार्क राष्ट्रांना उद्देशून म्हटले आहे. पंतप्रधानांच्या विचारांचा परिपाक म्हणून की काय, दिनेश्वर शर्मा यांनी परिषदेत सांगितले की, १८ भारतीय सैनिकांचे बळी घेणाऱ्या उरीतील हल्ल्याबाबत भारतीयांच्या संतप्त भावना आहेत. आपला संताप व्यक्त करण्यासाठी नागरिक महिला रस्त्यावर उतरत आहेत. उरीतील हल्ला आणि त्यानंतरच्या घडामोडींबाबत पाकिस्तानला जागतिक व्यासपीठावर एकाकी पाडण्यासाठी, भारताचे अनेक मंत्री शेजारी आणि मित्र देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. भारताच्या परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज २६ सप्टेंबर रोजी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत भारताची बाजू मांडत आहेत. नियंत्रणरेषेजवळ लपलेल्या अतिरेक्यांना टिपण्यासाठी भारतीय लष्कराच्या सज्जतेबाबत पंतप्रधानांनी लष्कराचे वरिष्ठ कमांडर आणि इतर ज्येष्ठ अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली.