शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

...अन्यथा आम्हीच कारवाई करू

By admin | Updated: September 23, 2016 01:37 IST

जो देश भारतात दहशतवादी पाठवतो, त्याच्याविरोधात जर काही ठोस कारवाई झाली नाही, तर पाकिस्तानविरोधात भारताला ‘काही कृती’ करणे भाग पडेल, असा निरोप मोदी यांनी जागतिक नेत्यांना दिल्याचे समजते.

हरीश गुप्ता, नवी दिल्लीजो देश भारतात दहशतवादी  पाठवतो, त्याच्याविरोधात जर काही ठोस कारवाई झाली नाही,  तर पाकिस्तानविरोधात भारताला ‘काही कृती’ करणे भाग पडेल, असा निरोप मोदी यांनी जागतिक नेत्यांना दिल्याचे समजते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी नवी दिल्लीतील वॉर रूमला भेट देऊन दोन तास तेथे चर्चा केली.

भारताने संयुक्त राष्ट्रे आणि सार्क परिषदेसह विविध आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर पाकिस्तानविरुद्ध थेट आणि अत्यंत कठोरपणे टीकास्त्र सोडले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर ही आघाडी उघडलेली असतानाच, भारत लष्करी कारवाईबाबत गांभीर्याने विचार करीत आहे. असे असतानाच मुत्सद्देगिरीच्या पातळीवर भारत पाकविरुद्ध थेट आणि आक्रमकपणे मैदानात उतरला आहे. पंतप्रधान मोदींनाही हेच अपेक्षित आहे.

इंटेलिजन्स ब्युरोचे संचालक दिनेश्वर शर्मा यांनी दहशतवादाला पाठिंबा देणारांवर निर्बंध घालणे आवश्यक झाले आहे, असे सार्क राष्ट्रांना उद्देशून म्हटले आहे. पंतप्रधानांच्या विचारांचा परिपाक म्हणून की काय, दिनेश्वर शर्मा यांनी परिषदेत सांगितले की, १८ भारतीय सैनिकांचे बळी घेणाऱ्या उरीतील हल्ल्याबाबत भारतीयांच्या संतप्त भावना आहेत. आपला संताप व्यक्त करण्यासाठी नागरिक महिला रस्त्यावर उतरत आहेत. उरीतील हल्ला आणि त्यानंतरच्या घडामोडींबाबत पाकिस्तानला जागतिक व्यासपीठावर एकाकी पाडण्यासाठी, भारताचे अनेक मंत्री शेजारी आणि मित्र देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. भारताच्या परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज २६ सप्टेंबर रोजी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत भारताची बाजू मांडत आहेत. नियंत्रणरेषेजवळ लपलेल्या अतिरेक्यांना टिपण्यासाठी भारतीय लष्कराच्या सज्जतेबाबत पंतप्रधानांनी लष्कराचे वरिष्ठ कमांडर आणि इतर ज्येष्ठ अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली.