शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
4
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
5
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
6
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
7
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
8
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
10
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
11
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
12
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
13
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
14
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
15
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
16
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
17
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण
18
₹450 कोटींचा बंगला अन् ₹639 कोटींचा डुप्लेक्स..; धनकुबेरांना आकर्षित करतेय वरळी 'सी फेस'
19
फक्त १० वर्षांत १ कोटीचा फंड कसा तयार करायचा? SIP मध्ये दरमहा किती गुंतवणूक करावी लागेल?
20
कंडोम बनवणाऱ्या कंपनीची कमाल...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; गेल्या महिन्यातच बाजारात उतरली, दिला बंपर परतावा

...अन्यथा आम्हीच कारवाई करू

By admin | Updated: September 23, 2016 01:37 IST

जो देश भारतात दहशतवादी पाठवतो, त्याच्याविरोधात जर काही ठोस कारवाई झाली नाही, तर पाकिस्तानविरोधात भारताला ‘काही कृती’ करणे भाग पडेल, असा निरोप मोदी यांनी जागतिक नेत्यांना दिल्याचे समजते.

हरीश गुप्ता, नवी दिल्लीजो देश भारतात दहशतवादी  पाठवतो, त्याच्याविरोधात जर काही ठोस कारवाई झाली नाही,  तर पाकिस्तानविरोधात भारताला ‘काही कृती’ करणे भाग पडेल, असा निरोप मोदी यांनी जागतिक नेत्यांना दिल्याचे समजते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी नवी दिल्लीतील वॉर रूमला भेट देऊन दोन तास तेथे चर्चा केली.

भारताने संयुक्त राष्ट्रे आणि सार्क परिषदेसह विविध आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर पाकिस्तानविरुद्ध थेट आणि अत्यंत कठोरपणे टीकास्त्र सोडले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर ही आघाडी उघडलेली असतानाच, भारत लष्करी कारवाईबाबत गांभीर्याने विचार करीत आहे. असे असतानाच मुत्सद्देगिरीच्या पातळीवर भारत पाकविरुद्ध थेट आणि आक्रमकपणे मैदानात उतरला आहे. पंतप्रधान मोदींनाही हेच अपेक्षित आहे.

इंटेलिजन्स ब्युरोचे संचालक दिनेश्वर शर्मा यांनी दहशतवादाला पाठिंबा देणारांवर निर्बंध घालणे आवश्यक झाले आहे, असे सार्क राष्ट्रांना उद्देशून म्हटले आहे. पंतप्रधानांच्या विचारांचा परिपाक म्हणून की काय, दिनेश्वर शर्मा यांनी परिषदेत सांगितले की, १८ भारतीय सैनिकांचे बळी घेणाऱ्या उरीतील हल्ल्याबाबत भारतीयांच्या संतप्त भावना आहेत. आपला संताप व्यक्त करण्यासाठी नागरिक महिला रस्त्यावर उतरत आहेत. उरीतील हल्ला आणि त्यानंतरच्या घडामोडींबाबत पाकिस्तानला जागतिक व्यासपीठावर एकाकी पाडण्यासाठी, भारताचे अनेक मंत्री शेजारी आणि मित्र देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. भारताच्या परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज २६ सप्टेंबर रोजी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत भारताची बाजू मांडत आहेत. नियंत्रणरेषेजवळ लपलेल्या अतिरेक्यांना टिपण्यासाठी भारतीय लष्कराच्या सज्जतेबाबत पंतप्रधानांनी लष्कराचे वरिष्ठ कमांडर आणि इतर ज्येष्ठ अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली.