शहरं
Join us  
Trending Stories
1
Conversion Law: राजस्थानात धर्मांतरण कायदा लागू, राज्यपाल हरीभाऊ बागडे यांची मंजुरी, उल्लंघन केल्यास किती शिक्षा होणार? जाणून घ्या
2
"अजित आगरकरसाठी शेवट खूप विचित्र असेल", रोहित शर्मा वादावर इंग्लंडच्या माजी खेळाडूचं विधान
3
“शेतकऱ्यांना भरीव मदतीची दानत नाही, तीन आठवड्यांचे अधिवेशन घ्यावे”; शरद पवार गटाची मागणी
4
भारत-तालिबान मैत्रीनं पाकिस्तानचं टेन्शन वाढणार; अफगाणिस्तान भारतासाठी इतकं महत्त्वाचं का?
5
Cough Syrup : "पप्पा, मला मोबाईल द्या ना...", वेदांशचे शेवटचे शब्द; १२ लाख खर्च करूनही वाचला नाही जीव
6
मृत सासूला चितेवर ठेवताना शरीरावर दिसल्या जखमा; संशय येताच तपास झाला अन् समोर आलं विदारक सत्य!
7
"WhatsApp वर नोट आणि वरिष्ठांची नाव..."; IAS पत्नीने केले १५ कॉल, लेकीलाही पाठवलं पण...
8
Ratan Tata Death Anniversary: असे होते रतन टाटा... ज्या व्यवसायात हात घातला सोनं केलं, १० पॉईंट्समध्ये पाहा त्यांचा प्रवास
9
शून्य बँक शिल्लक असतानाही होईल UPI पेमेंट? 'भीम ॲप'चं 'हे' खास फीचर जाणून घ्या!
10
भ्रष्टाचारामध्ये महाराष्ट्र आघाडीवर; ७८५ शासकीय कर्मचारी, खासगी व्यक्तींना अटक; देशभरात २,८७५ ठिकाणी कारवाई
11
मुंबई: ठाकरे गटाच्या पेडणेकर, दुधवडकरांसह आठ जणांची उमेदवारी धोक्यात; प्रभाग आरक्षणाचा फटका
12
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: गणपतीसह लक्ष्मी देवीचेही करा पूजन, मंत्राचे जप ठरतील उपयुक्त!
13
Cough Syrup Case : विषारी 'कोल्ड्रिफ' कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक! औषध प्यायल्याने २० मुलांचा मृत्यू
14
अंत्यसंस्काराच्या दिवशी कापला केक; चितेवर ठेवण्यापूर्वी वडिलांनी साजरा केला मुलीचा वाढदिवस
15
चातुर्मासाची शेवटची संकष्ट चतुर्थी: गणेश कल्याण करेल, शुभ घडेल; पाहा, व्रत विधी-चंद्रोदय वेळ
16
५ राजयोगात संकष्ट चतुर्थी: १० राशींची इच्छा पूर्ण, मान-सन्मान; यश-कीर्ती-लाभ, शुभ-वरदान काळ!
17
VIRAL : गर्लफ्रेंडच्या हातात हात घालून हॉटेल बाहेर आला; पत्नीने बघताच भर रस्त्यात धुतला! व्हिडीओ व्हायरल
18
मलायकाला झालंय तरी काय? अरबाज खानने लेकीला आणलं घरी, अभिनेत्रीने स्टोरी शेअर करत...
19
India Vs China: भारत जागतिक अर्थव्यवस्थेचा प्रमुख विकास इंजिन, चीनची वाढ संथ; पाहा काय म्हणाल्या IMF प्रमुख
20
वर्षाला २० लाखाचं पॅकेज, ५ महिन्यापूर्वी केले लव्ह मॅरेज; २८ वर्षीय युवकानं स्वत:ला का संपवलं?

भटक्या कुत्र्यांना आवरा, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

By admin | Updated: October 20, 2016 14:33 IST

कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवरून सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या समितीने केरळ सरकारला फटकारले आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 20 -  कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवरून सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या समितीने केरळ सरकारला फटकारले आहे. तसेच भटक्या कुत्र्यांची संख्या कमी करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या काही काळापासून केरळमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या लक्षणीय प्रमाणात वाढली आहे.

कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे त्रस्त असलेल्या केरळमधील राजकारण्यांकडून कुत्र्यांच्या खुल्या कत्तलीचे आयोजन करण्यात येत आहे. तसेच त्यासाठी तुरुंगात जाण्याचीही तयारी दर्शवण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर केरळ उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश एस. शिरी. जगन यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. या समितीने  आपला अहवाल नुकताच सादर केला आहे. 
 
'राज्यातील भटक्या कुत्र्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. हा कल असाच कायम राहिल्यास परिस्थिती लवकरच नियंत्रणाबाहेर जाईल. त्यामुळे भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. अन्यथा नागरिक कायदा हातात घेऊन स्वत:च्या पद्धतीने कुत्र्यांचा बंदोबस्त करतील. अशा घटनांची राज्यात सुरुवातही झाली आहे,' असे या समितीने आपल्या अहवालात म्हटले आहे. 
 
मटणामध्ये  विष कालवून लोकांकडून कुत्र्यांना ठार मारण्यात येते, हे उघड गुपित आहे असेही समितीने या आपल्या अहवालात म्हटले आहे.  केरळचे आरोग्य सचिव आणि आरोग्य सेवेचे निर्देशक हे या समितीमधील अन्य सदस्य आहेत.