शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: दिल्ली विमानतळाकडून प्रवाशांना मार्गदर्शक सूचना जारी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

भटक्या कुत्र्यांना आवरा, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

By admin | Updated: October 20, 2016 14:33 IST

कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवरून सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या समितीने केरळ सरकारला फटकारले आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 20 -  कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवरून सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या समितीने केरळ सरकारला फटकारले आहे. तसेच भटक्या कुत्र्यांची संख्या कमी करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या काही काळापासून केरळमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या लक्षणीय प्रमाणात वाढली आहे.

कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे त्रस्त असलेल्या केरळमधील राजकारण्यांकडून कुत्र्यांच्या खुल्या कत्तलीचे आयोजन करण्यात येत आहे. तसेच त्यासाठी तुरुंगात जाण्याचीही तयारी दर्शवण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर केरळ उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश एस. शिरी. जगन यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. या समितीने  आपला अहवाल नुकताच सादर केला आहे. 
 
'राज्यातील भटक्या कुत्र्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. हा कल असाच कायम राहिल्यास परिस्थिती लवकरच नियंत्रणाबाहेर जाईल. त्यामुळे भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. अन्यथा नागरिक कायदा हातात घेऊन स्वत:च्या पद्धतीने कुत्र्यांचा बंदोबस्त करतील. अशा घटनांची राज्यात सुरुवातही झाली आहे,' असे या समितीने आपल्या अहवालात म्हटले आहे. 
 
मटणामध्ये  विष कालवून लोकांकडून कुत्र्यांना ठार मारण्यात येते, हे उघड गुपित आहे असेही समितीने या आपल्या अहवालात म्हटले आहे.  केरळचे आरोग्य सचिव आणि आरोग्य सेवेचे निर्देशक हे या समितीमधील अन्य सदस्य आहेत.