शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

न्यायाधीशांच्या ३४ नावांनाच दिली मंजुरी

By admin | Updated: November 12, 2016 02:33 IST

देशातील विविध उच्च न्यायालयांत न्यायाधीशपदासाठी ७७ नावांपैकी केवळ ३४ नावांना मंजुरी दिली असून, ४३ नावे पुनर्विचारासाठी कॉलेजियमकडे पाठवली आहेत

नवी दिल्ली : देशातील विविध उच्च न्यायालयांत न्यायाधीशपदासाठी ७७ नावांपैकी केवळ ३४ नावांना मंजुरी दिली असून, ४३ नावे पुनर्विचारासाठी कॉलेजियमकडे पाठवली आहेत. याचाच अर्थ कॉलेजियमने सुचविलेल्या ४३ नावांना केंद्र सरकारने परवानगी दिलेली नाहीे. एकूण ३४ नावांना मंजुरी दिल्याची माहिती केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिली आहे. मुख्य न्यायाधीश टी.एस. ठाकूर, न्या. शिवकीर्ती सिंह आणि न्या. एल. नागेश्वर राव यांच्या पीठासमोर ही माहिती देण्यात आली. सरकारच्या वतीने न्यायालयात असेही सांगण्यात आले की, न्यायाधीश नियुक्तीच्या शिफारशींबाबत एकही फाईल प्रलंबित नाही. केंद्र सरकारकडून उपस्थित अ‍ॅटॉर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी पीठाला सांगितले की, ३४ नावांना मंजुरी देण्यात आली आहे. उर्वरित ४३ शिफारशी पुनर्विचारासाठी कॉलेजियमकडे पाठविण्यात आल्या आहेत, तर केंद्राने यावर्षीच ३ आॅगस्ट रोजी कॉलेजियमकडे विचारासाठी मेमोरेंडम आॅफ प्रोसिजरचा नवा मसुदा (एमओपी) पाठविला होता; पण आतापर्यंत सरकारला कोणतेही उत्तर मिळालेले नाही. यावर न्यायालयाने स्पष्ट केले की, १५ नोव्हेंबर रोजी कॉलेजियमची बैठक बोलविण्यात येईल. कॉलेजियममध्ये मुख्य न्यायाधीशांशिवाय सर्वोच्च न्यायालयाचे चार वरिष्ठ न्यायाधीश असतात. १९७१ च्या युद्धात सहभागी लेफ्टनंट कर्नल अनिल कबोतरा यांच्याकडून दाखल जनहित याचिकेवर सुनावणीची तारीख १९ नोव्हेंबर ठेवण्यात आली आहे. कॉलेजियमच्या शिफारशीनंतर उच्च न्यायालयातील नियुक्त्यांना होत असलेल्या विलंबाबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले होते, तर न्यायालयाने असेही बजावले होते की, प्रसंंगी पंतप्रधान कार्यालय, कायदा मंत्रालयाच्या सचिवांना आम्ही बोलवू शकतो. (लोकमत न्यूज नेटकर्व)