शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

न्यायाधीशांच्या ३४ नावांनाच दिली मंजुरी

By admin | Updated: November 12, 2016 02:33 IST

देशातील विविध उच्च न्यायालयांत न्यायाधीशपदासाठी ७७ नावांपैकी केवळ ३४ नावांना मंजुरी दिली असून, ४३ नावे पुनर्विचारासाठी कॉलेजियमकडे पाठवली आहेत

नवी दिल्ली : देशातील विविध उच्च न्यायालयांत न्यायाधीशपदासाठी ७७ नावांपैकी केवळ ३४ नावांना मंजुरी दिली असून, ४३ नावे पुनर्विचारासाठी कॉलेजियमकडे पाठवली आहेत. याचाच अर्थ कॉलेजियमने सुचविलेल्या ४३ नावांना केंद्र सरकारने परवानगी दिलेली नाहीे. एकूण ३४ नावांना मंजुरी दिल्याची माहिती केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिली आहे. मुख्य न्यायाधीश टी.एस. ठाकूर, न्या. शिवकीर्ती सिंह आणि न्या. एल. नागेश्वर राव यांच्या पीठासमोर ही माहिती देण्यात आली. सरकारच्या वतीने न्यायालयात असेही सांगण्यात आले की, न्यायाधीश नियुक्तीच्या शिफारशींबाबत एकही फाईल प्रलंबित नाही. केंद्र सरकारकडून उपस्थित अ‍ॅटॉर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी पीठाला सांगितले की, ३४ नावांना मंजुरी देण्यात आली आहे. उर्वरित ४३ शिफारशी पुनर्विचारासाठी कॉलेजियमकडे पाठविण्यात आल्या आहेत, तर केंद्राने यावर्षीच ३ आॅगस्ट रोजी कॉलेजियमकडे विचारासाठी मेमोरेंडम आॅफ प्रोसिजरचा नवा मसुदा (एमओपी) पाठविला होता; पण आतापर्यंत सरकारला कोणतेही उत्तर मिळालेले नाही. यावर न्यायालयाने स्पष्ट केले की, १५ नोव्हेंबर रोजी कॉलेजियमची बैठक बोलविण्यात येईल. कॉलेजियममध्ये मुख्य न्यायाधीशांशिवाय सर्वोच्च न्यायालयाचे चार वरिष्ठ न्यायाधीश असतात. १९७१ च्या युद्धात सहभागी लेफ्टनंट कर्नल अनिल कबोतरा यांच्याकडून दाखल जनहित याचिकेवर सुनावणीची तारीख १९ नोव्हेंबर ठेवण्यात आली आहे. कॉलेजियमच्या शिफारशीनंतर उच्च न्यायालयातील नियुक्त्यांना होत असलेल्या विलंबाबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले होते, तर न्यायालयाने असेही बजावले होते की, प्रसंंगी पंतप्रधान कार्यालय, कायदा मंत्रालयाच्या सचिवांना आम्ही बोलवू शकतो. (लोकमत न्यूज नेटकर्व)