शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
4
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
5
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
7
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
8
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
9
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
10
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
11
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
12
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
13
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
14
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
15
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
16
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
17
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
18
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
19
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
20
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर

फक्त खासदारांसाठी ‘फास्ट ट्रॅक’ शक्य नाही

By admin | Updated: August 2, 2014 03:14 IST

देशातील न्यायालयांमध्ये सर्वच प्रकारच्या प्रलंबित फौजदारी प्रकरणांचा डोंगर साचलेला असताना संसद सदस्यांचा वेगळा वर्ग करून त्यांच्यावरील फौजदारी खटले जलदगती पद्धतीने (फास्ट ट्रॅक) चालवणे शक्य नाही

नवी दिल्ली : देशातील न्यायालयांमध्ये सर्वच प्रकारच्या प्रलंबित फौजदारी प्रकरणांचा डोंगर साचलेला असताना संसद सदस्यांचा वेगळा वर्ग करून त्यांच्यावरील फौजदारी खटले जलदगती पद्धतीने (फास्ट ट्रॅक) चालवणे शक्य नाही, असे सांगत सरकारने एकूणच फौजदारी न्यायव्यवस्था गतिमान करण्यासाठी ठोस पावले उचलावीत, असा आग्रह सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी धरला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेतील अभिभाषणाबद्दल राष्ट्रपतींच्या आभारप्रदर्शक ठरावावरील चर्चेला उत्तर देताना राजकारणाचे गुन्हेगारीकरण कमी करण्यासाठी संसद सदस्यांनी त्यांच्यावरील फौजदारी खटले जलद गतीने चालवून घेण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे सुचवले होते. शिक्षा भोगून पूर्ण झाल्यावरही किंवा खटला प्रदीर्घ काळ प्रलंबित असल्याने भारतीय तुरुंगांत खितपत पडलेल्या पाकिस्तानी कैद्यांना त्यांच्या मायदेशी परत पाठवण्यासंबंधीच्या एका जनहित याचिकेवरील सुनावणीच्या वेळी हा विषय निघाला, तेव्हा सरन्यायाधीश न्या. राजेंद्र मल लोढा, न्या. कुरियन जोसेफ व न्या. रोहिंग्टन नरिमन यांच्या खंडपीठाने वरील मत व्यक्त केले. सध्याच्या लोकसभेत फौजदारी खटले प्रलंबित असलेल्या खासदारांची संख्या ५३ आहे. न्यायालय म्हणाले की, एकटे संसद सदस्यच नव्हे तर महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यासारख्या इतरही अनेक समाजवर्गांशी संबंधित खटले जलदगतीने निकाली काढण्याची गरज आहे. खरेतर, कनिष्ठ न्यायालयांमधील मनुष्यबळ व सोयीसुविधा अत्यंत तुटपुंज्या असल्याने मुळात एखादा वर्ग डोळ्यांपुढे ठेवून त्याच्याशी संबंधित खटले ‘फास्ट ट्रॅक’ पद्धतीने चालवण्याने एकूणच फौजदारी न्यायव्यवस्था गतिमान करण्यास फारशी मदत होत असल्याचे दिसत नाही.शिवाय, सरकारने मर्यादित काळासाठी सुरू केलेली ‘जलद गती’ न्यायालयांची यंत्रणा आता अस्तित्वात नाही, याचे अ‍ॅटर्नी जनरल मुकुल रोहटगी यांना स्मरण देत खंडपीठाने म्हटले की, फौजदारी न्यायदानाची सद्य:स्थिती बिलकूल समाधानकारक नाही व ती सुधारण्यासाठी अधिक संख्येने न्यायालये व सोयीसुविधा उपलब्ध करण्याची नितांत गरज आहे. एखादा ठरावीक वर्ग वेगळा काढून तेवढे खटले ‘फास्ट ट्रॅक’ करणे, हे तहान लागल्यावर विहीर खणण्यासारखे आहे व त्याने काहीच साध्य होणार नाही. त्याऐवजी एकूणच फौजदारी न्यायव्यवस्था गतिमान करण्यासाठी सर्वंकष उपाय योजण्याची गरज आहे.अशा प्रकारची एखादी योजना सरकारच्या विचाराधीन आहे का, याची माहिती घ्यावी व नसेल तर तशी योजना सरकारने तयार करावी, असेही न्यायालयाने अ‍ॅटर्नी जनरलना सांगितले. यासाठी केंद्र सरकारने सर्व राज्यांना विश्वासात घ्यावे, असेही खंडपीठाने सुचवले. (लोकमत न्यूज नेटवर्क)