शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या एअरबेसवर युक्रेनचा मोठा हल्ला, बॉम्ब वर्षाव करणारी 40 विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा!
2
भारताच्या मित्राने चीन सीमेवर उभी केली F-35 लढाऊ विमाने; जिनपिंग यांचं टेन्शन वाढलं
3
मे महिन्यात विक्रमी GST संकलन; सरकारच्या तिजोरीत आले ₹2.01 लाख कोटी
4
...ती माहिती संरक्षण मंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिली पाहिजे होती, CDS च्या विधानानंतर काँग्रेस आक्रमक  
5
पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
6
अजित पवार सामाजिक न्याय योजनांसाठी निधी देत नाहीत; लक्ष्मण हाकेंचा थेट आरोप
7
कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद
8
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
9
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
10
काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले
11
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका
12
IPL 2025: यंदा आयपीएल कोण जिंकणार? डेव्हिड वॉर्नरची मोठी भविष्यवाणी
13
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या
14
तो कोणाच्या संपर्कात होता, काय चॅटिंग केले ? नीलेश चव्हाणकडे सापडले नेपाळचे सीमकार्ड 
15
"२०२६ मध्ये ममता बॅनर्जी सरकार कायमचं उखडून टाकू..."; अमित शाह यांनी दिलं चॅलेंज
16
विद्यार्थी आंदोलन चिरडण्यासाठी स्वत:च देत होत्या चिथावणी, बांगलादेशच्या कोर्टात शेख हसिनांवर गंभीर आरोप
17
...तर पाकिस्तानसोबतच चीनचीही हवा निघणार! रशियानं भारताला दिली Su-57E ची जबरदस्त ऑफर, काय आहे याची 'खासियत'?
18
Coronavirus: हळूहळू पाय पसरतोय कोरोना! देशात सक्रीय रुग्णसंख्या ३७५८; राज्याची आकडेवारी वाचा
19
CNG-PNG वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! नैसर्गिक वायूच्या दरात मोठी कपात, 'इतके' रुपये वाचणार!

जातीयवाद थांबेल तेव्हाच विकास शक्य - मोदी

By admin | Updated: June 13, 2016 19:22 IST

देशातील जातीयवाद थांबेल तेव्हाच देशाचा खरा विकास होईल असे मत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले ते इलाहाबादमधील सभेत बोलत होते.

ऑनलाइन लोकमत

इलाहाबाद, दि. १३ : देशातील जातीयवाद थांबेल तेव्हाच देशाचा खरा विकास होईल, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. ते इलाहाबादमधील सभेत बोलत होते. विकाससाची नवी परिभाषा घेउन सत्तेत आलेल्या भाजपा सरकारने केलेल्या २ वर्षाच्या कामकाजाचा आढावाच मोदी यांनी जाहीर सभेत दिला. भाजपाची राष्ट्रीय कार्यकारिणीची २ दिवसीय बैठक संपल्यानंतर आज इलाहाबादमध्ये रॅलीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांची जाहीर सभा झाली. यावेळी बोलताना त्यांनी उत्तरप्रदेशच्या जनतेच आभार मानले. उत्तर प्रदेशात पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता, भाजपाने आपल्या प्रचारची सुरवातच केली असे म्हणावे लागेल. 
 

(कुठे छत्रपती शिवाजी महाराज नी कुठे गांधी घराणे - पंतप्रधान मोदींचा नाव न घेता वार)

पुढे बोलताना ते म्हणाले, देशाच्या प्रत्येक कानाकोप-यात भाजपला समर्थन मिळत असून, केंद्र सरकारमध्ये उत्तर प्रदेशचा दबदबा आहे. पंतप्रधान आणि गृहमंत्री उत्तर प्रदेशमधलेचं असल्यानं उत्तर प्रदेशचा विकास निश्चत आहे, उत्तर प्रदेशमध्येही आसामसारखा बदल घडला पाहिजे, असंही ते म्हणाले. या सभेला लालकृष्ण आडवाडी, अमित शहा, राजनाथ सिंह, नितीन गडकरीसह अनेक भाजपाच्या दिग्गज नेत्यांची उपस्थिती होती. 

(प्रवाहासोबत वाहत जाण्यासाठी नव्हे; दिशा देण्यासाठी राजकारणात - अमित शहा)

मोदी यांच्या भाषणाती महत्वाचे मुद्दे - 
 
युरीया साठी शेतकऱ्यांना रात्रभर वाट पाहवी लागत होती, कधीकधी त्यांच्यावर लाठी हल्लाही होत होता. स्वातंत्र्यानंतर आमच्या सरकारच्या काळात सर्वात जास्त युरीया निर्मिती करण्यात आली आहे.
 
उत्तर प्रदेशात बीएसी आणि एसपी एकमेकांविरुद्ध भ्रष्टाचाराचा आरोप करतात परंतु सत्तेत आल्यानंतर कारवाई करीत नाही.
 
उत्तर प्रदेश भ्रष्टाचाराचे आगार बनले असे सांगून नरेंद्र मोदी यांची मुलायम-मायावती यांच्यावर टीका.
 
स्वातंत्र्यानंतर आमच्या सरकारच्या काळात विज निर्मिती करण्याच काम झालं आहे.
 
स्वातंत्र्यानंतर आम्ही शेतकऱ्यांसाठी विमा योजना आमलात आणली.
 
उत्तर प्रदेशमधील १५२९ गावात स्वतंत्र्यानंतरही विज नव्हती, १३५३ गावामध्ये आम्ही २ वर्षात विज उपल्ब्ध करुन दिली आहे. 
सर्वात जास्त पंतप्रधान उत्तरप्रदेशने दिले 
 
ज्या राज्यात आम्हाला सत्ता मिळाली त्या राज्यांचा आम्ही विकास केला आहे, महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश आणि गोव्याचा विकास पहा.
आम्ही प्रत्येक क्षेत्रात चागंल काम केलं आहे. 
 
आम्हाला ५ वर्ष सत्ता द्या, यामध्ये आम्ही आपलं कोणतही नुकसान केलं तर आम्हाला लाथ मारुन बाहेर काढा.
 
भारत माता की जय बोलत नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाचा शेवट केला.