शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
2
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान जागतिक दहशतवादाचे केंद्र; सर्व धर्मीयांनी केला पाकचा निषेध- परराष्ट्र सचिव
4
Mumbai Metro: उद्यापासून आर ते वरळी मेट्रो धावणार, मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
5
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
6
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
7
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
8
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
9
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
10
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
11
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
12
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
13
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
14
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."
15
Pakistan Video: "इतके नालायक आहेत, ड्रोन हल्ला, पण सांगताहेत की वीज कोसळली", पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल
16
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
17
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
18
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
19
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
20
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?

उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांकडे सुनावणीसाठी फक्त ५ ते ६ मिनिटांचा वेळ

By admin | Updated: April 7, 2016 12:34 IST

खटल्यांची वाढती संख्या, न्यायाधीशांची कमतरता आणि निकालाला लागणारा वर्षानुवर्षांचा विलंब या आव्हानांचा भारतीय न्यायव्यवस्था आज सामना करत आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. ७ - खटल्यांची वाढती संख्या, न्यायाधीशांची कमतरता आणि निकालाला लागणारा वर्षानुवर्षांचा विलंब या आव्हानांचा भारतीय न्यायव्यवस्था आज सामना करत आहे. न्यायाव्यवस्थेच्या या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच न्यायाधीशांवरील कामकाजाच्या दबावाचा अभ्यास करण्यात आला. त्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

 
उच्च न्यायालयातील न्यायाधीशाला एका खटल्याच्या सुनावणीसाठी सरासरी पाच मिनिटांपेक्षा कमी वेळ देता येतो. काही न्यायाधीशांना वेळ मिळतो तेव्हा १५ ते १६ मिनिट एका खटल्याच्या सुनावणीसाठी देता येतात. एखाद्या खटल्याबद्दल निर्णय घेण्यासाठी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पाच ते सहा मिनिटांचा वेळ मिळतो.  बंगळुरु स्थित दक्षा या स्वंयसेवी संस्थेच्या अभ्यासातून ही बाब समोर आली आहे. 
 
कोलकाता उच्च न्यायालयाचे उदहारण घेतले तर, तिथे न्यायाधीशासमोर एका दिवसात १६३ प्रकरणे सुनावणीसाठी असली तर त्याला प्रत्येक खटल्याच्या सुनावणीसाठी दोन मिनिटांचा वेळ मिळतो. पाटणा, हैदराबाद, झारखंड, राजस्थान या राज्यातील उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना प्रत्येक खटल्याच्या सुनावणीसाठी दोन ते तीन मिनिटांचा वेळ मिळतो. 
 
अलहाबाद, गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश आणि ओरिसामधील न्यायाधीश चार ते सहा मिनिटे देतात. जानेवारी २०१५ पासून देशातील २१ उच्च न्यायालयातील १९ लाख खटल्यांचा अभ्यास करुन हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. 
 
एक एप्रिल २०१६ पर्यंत उच्च न्यायालयात ५९४ आणि सर्वोच्च न्यायालयात २५ न्यायाधीश आहेत. लोकसंख्येच्या तुलनेत न्यायाधीशांचे प्रमाण कमी आहे. अखिल भारतीय न्यायाधीश संघटनेच्या एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने २१ मार्च २००२ रोजी दहालाख भारतीयांमागे कमीत कमीत ५० न्यायाधीश असले पाहिजेत असे निर्देश दिले होते. २०११ च्या लोकसंख्येच्या आकडेवारीनुसार दहा लाख भारतीयांमागे १६.८ न्यायाधीश आहेत.