शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
3
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
4
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
5
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
6
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
7
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
8
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
9
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
10
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
11
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
12
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
13
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
14
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
15
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
16
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
17
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
18
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
19
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
20
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका

उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांकडे सुनावणीसाठी फक्त ५ ते ६ मिनिटांचा वेळ

By admin | Updated: April 7, 2016 12:34 IST

खटल्यांची वाढती संख्या, न्यायाधीशांची कमतरता आणि निकालाला लागणारा वर्षानुवर्षांचा विलंब या आव्हानांचा भारतीय न्यायव्यवस्था आज सामना करत आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. ७ - खटल्यांची वाढती संख्या, न्यायाधीशांची कमतरता आणि निकालाला लागणारा वर्षानुवर्षांचा विलंब या आव्हानांचा भारतीय न्यायव्यवस्था आज सामना करत आहे. न्यायाव्यवस्थेच्या या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच न्यायाधीशांवरील कामकाजाच्या दबावाचा अभ्यास करण्यात आला. त्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

 
उच्च न्यायालयातील न्यायाधीशाला एका खटल्याच्या सुनावणीसाठी सरासरी पाच मिनिटांपेक्षा कमी वेळ देता येतो. काही न्यायाधीशांना वेळ मिळतो तेव्हा १५ ते १६ मिनिट एका खटल्याच्या सुनावणीसाठी देता येतात. एखाद्या खटल्याबद्दल निर्णय घेण्यासाठी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पाच ते सहा मिनिटांचा वेळ मिळतो.  बंगळुरु स्थित दक्षा या स्वंयसेवी संस्थेच्या अभ्यासातून ही बाब समोर आली आहे. 
 
कोलकाता उच्च न्यायालयाचे उदहारण घेतले तर, तिथे न्यायाधीशासमोर एका दिवसात १६३ प्रकरणे सुनावणीसाठी असली तर त्याला प्रत्येक खटल्याच्या सुनावणीसाठी दोन मिनिटांचा वेळ मिळतो. पाटणा, हैदराबाद, झारखंड, राजस्थान या राज्यातील उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना प्रत्येक खटल्याच्या सुनावणीसाठी दोन ते तीन मिनिटांचा वेळ मिळतो. 
 
अलहाबाद, गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश आणि ओरिसामधील न्यायाधीश चार ते सहा मिनिटे देतात. जानेवारी २०१५ पासून देशातील २१ उच्च न्यायालयातील १९ लाख खटल्यांचा अभ्यास करुन हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. 
 
एक एप्रिल २०१६ पर्यंत उच्च न्यायालयात ५९४ आणि सर्वोच्च न्यायालयात २५ न्यायाधीश आहेत. लोकसंख्येच्या तुलनेत न्यायाधीशांचे प्रमाण कमी आहे. अखिल भारतीय न्यायाधीश संघटनेच्या एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने २१ मार्च २००२ रोजी दहालाख भारतीयांमागे कमीत कमीत ५० न्यायाधीश असले पाहिजेत असे निर्देश दिले होते. २०११ च्या लोकसंख्येच्या आकडेवारीनुसार दहा लाख भारतीयांमागे १६.८ न्यायाधीश आहेत.