शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

शास्त्रीय संगीतासाठी एक जीवन अपूर्णच (भाग १)

By admin | Updated: February 13, 2015 00:38 IST

- प्रसिद्ध संतूरवादक पं. सतीश व्यास : प्रत्येक पिढीत संगीताची अभिरुची बदलते

- प्रसिद्ध संतूरवादक पं. सतीश व्यास : प्रत्येक पिढीत संगीताची अभिरुची बदलते
नागपूर : शास्त्रीय संगीत एखाद्या महासागरासारखे आहे. जितके खोल शिरावे तितके ते खोल आहे. त्याचा तळ सापडत नाही. सापडला असे वाटत असतानाच तो अधिक खोल असल्याचे जाणवते. एक जीवन शास्त्रीय संगीत आत्मसात करण्यासाठी फारच कमी आहे. वय वाढते तसे आपण मिळविलेले ज्ञान फारच तोटके असल्याचे जाणवते. ही जाणीव झाल्यावर मात्र अद्याप शास्त्रीय संगीताच्या सागरातून आपण एक थेंबही उचलू शकलो नाही, याची अस्वस्थता येते. संगीत असेच आहे, असे मत सुप्रसिद्ध संतूरवादक पं. सतीश व्यास यांनी व्यक्त केले.
पं. सतीश व्यास यांचे वडील सुप्रसिद्ध गायक पं. सी.आर. व्यास यांच्या ९० व्या जयंतीनिमित्त आयोजित संगीत महोत्सवात सादरीकरण करण्यासाठी ते नागपुरात आले असताना त्यांच्याशी संवाद साधला. याप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, अद्यापही मी स्वत:ला विद्यार्थीच समजतो; कारण अजूनही मला बरेच काही शिकायचे राहिले आहे. प्रत्येक पिढीत संगीताची अभिरुची काळाप्रमाणे बदलते; पण मूळ अभिजात शास्त्रीय संगीत मात्र कधीच बदलत नाही. संगीतात काळाप्रमाणे काही परिवर्तन शक्य आहे; पण त्याचे शास्त्र बदलत नाही. त्यामुळेच काळाप्रमाणे आणि रसिकांच्या अभिरुची लक्षात घेऊन गायक, कलावंतांना सादरीकरण करावे लागते. साधारण २० वर्षांपूर्वी गायक एखादा राग अनेक तास सादर करायचा. एखाद्या रागाच्या सादरीकरणावर अख्खी रात्र संपून जायची. पण सध्याच्या काळात हा संयम आणि वेळ कुणाकडेच नाही. त्यामुळेच रसिकांच्या वेळ आणि अभिरुचीप्रमाणे सादरीकरण होते. पण शास्त्रीय गायन, वादन सादर करणारे कलावंत कमी वेळात रागाची ठेवण शास्त्रनियमांच्या चाकोरीत सादर करतात. त्यामुळे मूळ संगीताला धक्का बसत नाही. वेळेअभावी एखादा राग साधारण पाऊण तास वाजवावा लागतो.