शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
2
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
3
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
4
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
5
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
6
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
7
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
8
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
9
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
10
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
11
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
12
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
13
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
14
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
15
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
16
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
17
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
18
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
19
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
20
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी

शास्त्रीय संगीतासाठी एक जीवन अपूर्णच (भाग १)

By admin | Updated: February 13, 2015 00:38 IST

- प्रसिद्ध संतूरवादक पं. सतीश व्यास : प्रत्येक पिढीत संगीताची अभिरुची बदलते

- प्रसिद्ध संतूरवादक पं. सतीश व्यास : प्रत्येक पिढीत संगीताची अभिरुची बदलते
नागपूर : शास्त्रीय संगीत एखाद्या महासागरासारखे आहे. जितके खोल शिरावे तितके ते खोल आहे. त्याचा तळ सापडत नाही. सापडला असे वाटत असतानाच तो अधिक खोल असल्याचे जाणवते. एक जीवन शास्त्रीय संगीत आत्मसात करण्यासाठी फारच कमी आहे. वय वाढते तसे आपण मिळविलेले ज्ञान फारच तोटके असल्याचे जाणवते. ही जाणीव झाल्यावर मात्र अद्याप शास्त्रीय संगीताच्या सागरातून आपण एक थेंबही उचलू शकलो नाही, याची अस्वस्थता येते. संगीत असेच आहे, असे मत सुप्रसिद्ध संतूरवादक पं. सतीश व्यास यांनी व्यक्त केले.
पं. सतीश व्यास यांचे वडील सुप्रसिद्ध गायक पं. सी.आर. व्यास यांच्या ९० व्या जयंतीनिमित्त आयोजित संगीत महोत्सवात सादरीकरण करण्यासाठी ते नागपुरात आले असताना त्यांच्याशी संवाद साधला. याप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, अद्यापही मी स्वत:ला विद्यार्थीच समजतो; कारण अजूनही मला बरेच काही शिकायचे राहिले आहे. प्रत्येक पिढीत संगीताची अभिरुची काळाप्रमाणे बदलते; पण मूळ अभिजात शास्त्रीय संगीत मात्र कधीच बदलत नाही. संगीतात काळाप्रमाणे काही परिवर्तन शक्य आहे; पण त्याचे शास्त्र बदलत नाही. त्यामुळेच काळाप्रमाणे आणि रसिकांच्या अभिरुची लक्षात घेऊन गायक, कलावंतांना सादरीकरण करावे लागते. साधारण २० वर्षांपूर्वी गायक एखादा राग अनेक तास सादर करायचा. एखाद्या रागाच्या सादरीकरणावर अख्खी रात्र संपून जायची. पण सध्याच्या काळात हा संयम आणि वेळ कुणाकडेच नाही. त्यामुळेच रसिकांच्या वेळ आणि अभिरुचीप्रमाणे सादरीकरण होते. पण शास्त्रीय गायन, वादन सादर करणारे कलावंत कमी वेळात रागाची ठेवण शास्त्रनियमांच्या चाकोरीत सादर करतात. त्यामुळे मूळ संगीताला धक्का बसत नाही. वेळेअभावी एखादा राग साधारण पाऊण तास वाजवावा लागतो.