शहरं
Join us  
Trending Stories
1
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
2
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
3
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
4
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
5
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
6
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
7
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
8
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
9
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
10
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
11
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
12
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
13
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
14
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
15
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
16
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
17
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
18
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
19
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
20
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

शास्त्रीय संगीतासाठी एक जीवन अपूर्णच (भाग १)

By admin | Updated: February 13, 2015 00:38 IST

- प्रसिद्ध संतूरवादक पं. सतीश व्यास : प्रत्येक पिढीत संगीताची अभिरुची बदलते

- प्रसिद्ध संतूरवादक पं. सतीश व्यास : प्रत्येक पिढीत संगीताची अभिरुची बदलते
नागपूर : शास्त्रीय संगीत एखाद्या महासागरासारखे आहे. जितके खोल शिरावे तितके ते खोल आहे. त्याचा तळ सापडत नाही. सापडला असे वाटत असतानाच तो अधिक खोल असल्याचे जाणवते. एक जीवन शास्त्रीय संगीत आत्मसात करण्यासाठी फारच कमी आहे. वय वाढते तसे आपण मिळविलेले ज्ञान फारच तोटके असल्याचे जाणवते. ही जाणीव झाल्यावर मात्र अद्याप शास्त्रीय संगीताच्या सागरातून आपण एक थेंबही उचलू शकलो नाही, याची अस्वस्थता येते. संगीत असेच आहे, असे मत सुप्रसिद्ध संतूरवादक पं. सतीश व्यास यांनी व्यक्त केले.
पं. सतीश व्यास यांचे वडील सुप्रसिद्ध गायक पं. सी.आर. व्यास यांच्या ९० व्या जयंतीनिमित्त आयोजित संगीत महोत्सवात सादरीकरण करण्यासाठी ते नागपुरात आले असताना त्यांच्याशी संवाद साधला. याप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, अद्यापही मी स्वत:ला विद्यार्थीच समजतो; कारण अजूनही मला बरेच काही शिकायचे राहिले आहे. प्रत्येक पिढीत संगीताची अभिरुची काळाप्रमाणे बदलते; पण मूळ अभिजात शास्त्रीय संगीत मात्र कधीच बदलत नाही. संगीतात काळाप्रमाणे काही परिवर्तन शक्य आहे; पण त्याचे शास्त्र बदलत नाही. त्यामुळेच काळाप्रमाणे आणि रसिकांच्या अभिरुची लक्षात घेऊन गायक, कलावंतांना सादरीकरण करावे लागते. साधारण २० वर्षांपूर्वी गायक एखादा राग अनेक तास सादर करायचा. एखाद्या रागाच्या सादरीकरणावर अख्खी रात्र संपून जायची. पण सध्याच्या काळात हा संयम आणि वेळ कुणाकडेच नाही. त्यामुळेच रसिकांच्या वेळ आणि अभिरुचीप्रमाणे सादरीकरण होते. पण शास्त्रीय गायन, वादन सादर करणारे कलावंत कमी वेळात रागाची ठेवण शास्त्रनियमांच्या चाकोरीत सादर करतात. त्यामुळे मूळ संगीताला धक्का बसत नाही. वेळेअभावी एखादा राग साधारण पाऊण तास वाजवावा लागतो.