शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
3
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
4
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
5
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
6
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
7
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
8
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
9
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
10
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
11
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
12
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
13
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
14
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
15
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
16
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
17
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
18
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
19
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
20
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना

नवोदयमध्ये ओबीसींना मिळतील राखीव जागा!

By admin | Updated: January 18, 2017 05:11 IST

मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या जवाहर नवोदय विद्यालयांत ओबीसी विद्यार्थ्यांसाठी राखीव जागा नसणे

नवी दिल्ली : मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या जवाहर नवोदय विद्यालयांत ओबीसी विद्यार्थ्यांसाठी राखीव जागा नसणे हे नियमांविरुद्ध आहे व ही त्रुटी नजीकच्या काळात दूर केली जाईल, असे या खात्याचे राज्यमंत्री उपेंद्र कुशवाह यांनी मंगळवारी सांगितले. इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी जवळपास ६०० जवाहर नवोदय विद्यालयांत राखीव जागांची तरतूद लागू न करणे हे योग्य नाही, असे मला जाणवले. ही त्रुटी दूर केली जाईल, असे कुशवाह यांनी येथे राष्ट्रीय सांस्कृतिक एकात्मता कार्यक्रमात बोलताना सांगितले. मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर या वेळी उपस्थित होते. कुशवाह यांचा राष्ट्रीय लोक समता पक्ष असून, तो राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (एनडीए) घटक आहे. उत्तर प्रदेशसह पाच राज्यांत विधानसभा निवडणुका येत्या फेब्रुवारी आणि मार्चमध्ये होणार असून, कुशवाह यांच्यावरील विधानाचे महत्त्व त्या पार्श्वभूमीवर आहे. जावडेकर म्हणाले की, नवोदय विद्यालयांतील प्रवेश या वर्षी स्पर्धा परीक्षांद्वारे झाले. २२ लाख मुलांनी त्यासाठी अर्ज केला होता. त्यातून ४० हजार मुलांची निवड झाली. अनुसूचित जातींसाठी या विद्यालयांत कमी राखीव जागा असल्या, तरी या वर्गांतील विद्यार्थ्यांची संख्या २५ टक्के आहे. अनुसूचित जमातींसाठी सात टक्के राखीव जागा असून, १९ टक्के विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. जात, पंथ निकषांवर आलेले नसून, या विद्यार्थ्यांनी निव्वळ गुणवत्तेवर प्रवेश मिळवले आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)>निसर्गाने भेदभाव केलेला नाही...जवाहर नवोदय विद्यालयांतील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि सर्वसाधारण गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांमधील गुणांत फार काही मोठा फरक नाही, असे जावडेकर म्हणाले. निसर्गाने जातीचा आधार घेऊन बुद्धी देताना भेदभाव केलेला नाही हे आम्ही समजून घ्यायला हवे.प्रत्येक जण बुद्धीमान असून, कोण संधी घेतो आणि कोण कठोर परिश्रम करतो हा प्रश्न आहे. सगळ््यांना संधी उपलब्ध झाली पाहिजे यावर जावडेकर यांनी भर दिला. २०१७ यावर्षात मोदी सरकारने ६२ नव्या जवाहर नवोदय विद्यालयांची घोषणा केल्याची माहिती जावडेकर यांनी दिली.