शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
2
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
3
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
4
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
5
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
6
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
7
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
8
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
9
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
10
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
11
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
12
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
13
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
14
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
15
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
16
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
17
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
18
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
19
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
20
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार

काश्मीर हिंसाचारातील मृतांची संख्या ३४ वर

By admin | Updated: July 14, 2016 03:09 IST

जम्मू आणि काश्मीरमध्ये गेले सहा दिवस हिंसाचार आणि रक्तपात सुरू असतानाच, या वावटळीतून बाहेर काढण्यासाठी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी बुधवारी लोकांनी सहकार्य करावे

श्रीनगर/नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरमध्ये गेले सहा दिवस हिंसाचार आणि रक्तपात सुरू असतानाच, या वावटळीतून बाहेर काढण्यासाठी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी बुधवारी लोकांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले. आतापर्यंतच्या हिंसाचारात मरण पावलेल्यांची संख्या ३४ झाली आहे, तसेच पोलिसांनी गोळीबाराऐवजी बंदुकीतून छऱ्यांचा मारा केल्यामुळे ९२ जणांच्या डोळ्यांना गंभीर इजा झाली आहे. त्यांना अंधत्व येण्याची भीती व्यक्त होत आहे.या पार्श्वभूमीवर १९३१ मधील हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्याच्या कार्यक्रमात मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या की, ‘हिंसाचाराची झळ पोहोचलेल्या कुटुंबांच्या दु:खावर फुंकर घालण्यास सरकारचे प्राधान्य आहे.’ मात्र, पम्पोर आणि कुपवाडा गावांसह काश्मीर खोऱ्याच्या काही भागांत संचारबंदी कायम आहे. खोऱ्यात मोबाइल इंटरनेट आणि रेल्वे सेवा बंदच आहे. मोबाइल फोन कूपवाडा भागात बंद करण्यात आली आहे.शस्त्रे हिसकावलीपोलिसांकडील हिसकावण्यात आलेल्या ७० बंदुकांचा वापर फुटीरवादी शस्त्रे आणि दारूगोळा वाढविण्यासाठी करतील, अशी भीती आहे. दोन दिवसांपूर्वी कुलगाममधील दमहल हांजी पोरा पोलीस ठाण्यावर जमावाने हल्ला करून, सेमी आॅटोमॅटिक व आॅटोमॅटिक अशा ७० बंदुका हिसकावून नेल्या होत्या. सरकारला अपयश : अब्दुल्लाबुऱ्हान वनीच्या मृत्युमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचे नेमके आकलन करून घेण्यात मेहबुबा सरकारला अपयश आल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केला. २००८ आणि २०१० मध्ये खोऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर निदर्शने झाली होती. त्यांचा धडा पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी-भाजपा युती विसरली, असे अब्दुल्ला म्हणाले. मेहबुबा मुफ्ती या राज्यात परिस्थिती सामान्य असल्याचे निलाजरेपणे सांगत आहेत, असाही आरोप त्यांनी केला. ते येथे वार्ताहरांशी बोलत होते. (वृत्तसंस्था)