शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
3
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
4
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
5
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
6
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
7
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
8
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
11
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
12
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
13
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
14
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
19
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
20
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या

काश्मीर हिंसाचारातील मृतांची संख्या ३४ वर

By admin | Updated: July 14, 2016 03:09 IST

जम्मू आणि काश्मीरमध्ये गेले सहा दिवस हिंसाचार आणि रक्तपात सुरू असतानाच, या वावटळीतून बाहेर काढण्यासाठी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी बुधवारी लोकांनी सहकार्य करावे

श्रीनगर/नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरमध्ये गेले सहा दिवस हिंसाचार आणि रक्तपात सुरू असतानाच, या वावटळीतून बाहेर काढण्यासाठी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी बुधवारी लोकांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले. आतापर्यंतच्या हिंसाचारात मरण पावलेल्यांची संख्या ३४ झाली आहे, तसेच पोलिसांनी गोळीबाराऐवजी बंदुकीतून छऱ्यांचा मारा केल्यामुळे ९२ जणांच्या डोळ्यांना गंभीर इजा झाली आहे. त्यांना अंधत्व येण्याची भीती व्यक्त होत आहे.या पार्श्वभूमीवर १९३१ मधील हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्याच्या कार्यक्रमात मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या की, ‘हिंसाचाराची झळ पोहोचलेल्या कुटुंबांच्या दु:खावर फुंकर घालण्यास सरकारचे प्राधान्य आहे.’ मात्र, पम्पोर आणि कुपवाडा गावांसह काश्मीर खोऱ्याच्या काही भागांत संचारबंदी कायम आहे. खोऱ्यात मोबाइल इंटरनेट आणि रेल्वे सेवा बंदच आहे. मोबाइल फोन कूपवाडा भागात बंद करण्यात आली आहे.शस्त्रे हिसकावलीपोलिसांकडील हिसकावण्यात आलेल्या ७० बंदुकांचा वापर फुटीरवादी शस्त्रे आणि दारूगोळा वाढविण्यासाठी करतील, अशी भीती आहे. दोन दिवसांपूर्वी कुलगाममधील दमहल हांजी पोरा पोलीस ठाण्यावर जमावाने हल्ला करून, सेमी आॅटोमॅटिक व आॅटोमॅटिक अशा ७० बंदुका हिसकावून नेल्या होत्या. सरकारला अपयश : अब्दुल्लाबुऱ्हान वनीच्या मृत्युमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचे नेमके आकलन करून घेण्यात मेहबुबा सरकारला अपयश आल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केला. २००८ आणि २०१० मध्ये खोऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर निदर्शने झाली होती. त्यांचा धडा पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी-भाजपा युती विसरली, असे अब्दुल्ला म्हणाले. मेहबुबा मुफ्ती या राज्यात परिस्थिती सामान्य असल्याचे निलाजरेपणे सांगत आहेत, असाही आरोप त्यांनी केला. ते येथे वार्ताहरांशी बोलत होते. (वृत्तसंस्था)