शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

आता "या" विमानतळांवर लागणार नाही बॅगेला टॅग

By admin | Updated: April 24, 2017 19:16 IST

आणखी सहा विमानतळावरुन बॅगेला टॅग लावून स्टॅम्पिंग करण्याच्या कटकटीतून प्रवाशांची सुटका होणार आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 24 - आणखी सहा विमानतळावरुन बॅगेला टॅग लावून स्टॅम्पिंग करण्याच्या कटकटीतून प्रवाशांची सुटका होणार आहे.
पटना, चेन्नई, गुवाहटी, तिरुअनंतपुरम, जयपूर आणि लखनऊ या विमानतळावरील प्रवाशांच्या बॅगेला टॅग न लावण्याचा निर्णय सीआयएसएफने घेतला आहे. आजपासून आठवडाभर प्रायोगिक तत्त्वावर बॅगांना टॅग न लावण्याचा प्रयोग सीआयएसएफकडून करण्यात येणार आहे.
30 एप्रिलपर्यंत ह्या सहा विमानतळांवर आठवडाभर प्रायोगिक तत्त्वावर बॅगांना टॅग लावण्यात येणार नसून याचा परिणाम पाहून पुढील निर्णय आम्ही घेऊ, असे सीआयएसएफचे महासंचालक ओ. पी. सिंह यांनी सांगितले. तसेच, जर सर्व सुरक्षतेच्यादृष्टीने समाधानकारक वाटल्यास सहाही विमानतळांवर लवकरच बॅगेला टॅग लावून स्टॅम्पिंग करण्यात येणार नाही, असेही ओ. पी. सिंह म्हणाले. 
याआधी 1 एप्रिलपासून देशातील दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, बंगलोर, हैदराबाद आणि अहमदाबाद विमानतळावरील प्रवाशांच्या बॅगेला टॅग न लावण्याचा निर्णय सीआयएसएफने घेतला होता. आता पटना, चेन्नई, गुवाहटी, तिरुअनंतपुरम, जयपूर आणि लखनऊ या विमानतळांवर घेतला आहे. 
दरम्यान, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून १९९२ पासून आपल्या देशात विमानतळांवर बॅगांना स्टॅम्पिंग टॅग लावण्याची पद्धत सुरू झाली. सीआयएसएफचे जवान बॅगेचा टॅग व स्टॅम्प तपासून प्रवाशांना विमानात बसण्यास पाठवतात. ही पद्धत वेळखाऊ तसेच प्रवाशांना डोकेदुखी ठरत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात येत आहे.