शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
2
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं"
3
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन करणार नाही - उद्धव ठाकरे
4
जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
5
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
6
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
7
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
8
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
9
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
10
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
11
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
12
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
13
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
14
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
15
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
16
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
17
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
18
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
19
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
20
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे

आता सौरऊर्जेवर चालणार खादीचा चरखा

By admin | Updated: October 29, 2015 00:37 IST

सौरऊर्जेवर खादीचा चरखा चालविणारे पहिले राज्य बनण्याचा मान बहुदा गुजरात पटकावणार आहे. हा प्रयोग महाराष्ट्रातही व्हायला हवा,

दीपक भट, अहमदाबादसौरऊर्जेवर खादीचा चरखा चालविणारे पहिले राज्य बनण्याचा मान बहुदा गुजरात पटकावणार आहे. हा प्रयोग महाराष्ट्रातही व्हायला हवा, अशी सूचना लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन आणि खासदार विजय दर्डा यांनी केली आहे.सौरऊर्जेचा वापर चरखा चालविण्यासाठी केला जाणार असल्याची माहिती गुजरातमध्ये प्रवास करताना मिळाली. हा खरोखरच अनुकरणीय पुढाकार आहे. त्यामुळे केवळ खादीचे उत्पादनच वाढणार नाही तर विणकरांना कामाचा उचित मोबदलाही मिळेल, त्याचवेळी गांधीजींचे ग्रामीण विकासाचे स्वप्नही साकार होईल, असे ते म्हणाले.खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने (केव्हीआयसी) तसेच खादीला प्रोत्साहन देणाऱ्या अन्य संस्थांनीही अधिक टकळी (स्पिंडल्स) असणारा चरखा विकसित केला आहे, ज्याला सौर ऊर्जेवर चालविले जाऊ शकते. सौरऊर्जेवर खादी चरखा यशस्वीरीत्या चालवणारे गुजरात हे बहुदा पहिले राज्य बनणार आहे. त्याबाबत खादी प्रयोग समिती अहमदाबाद, उद्योग भारती ट्रस्ट गोंडल, सूरत इंजिनियरिंग विकास असोसिएशन तसेच इंडो-जर्मन टूल रुमकडून चाचण्या घेतल्या जात आहेत. केव्हीआयसीच्या सूत्रानुसार या चाचण्यांच्या निष्पत्तीसंबंधी अहवाल पुढील महिन्यात सरकारला सादर केला जाणार आहे.खा. दर्डा म्हणाले की, केव्हीआयसी तसेच अमरावतीस्थित अशासकीय संघटना गांधीग्राम ऊर्जा विकास संस्थेने वर्धेच्या महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकीकरण संस्थेसोबत मिळून खादी चरख्याच्या कताई चाकाचे (स्पीनिंग व्हिल) डिझाईन तयार केले आहे. सद्यस्थितीत सूतकताई कामगारांमध्ये बहुतांश महिला कामगारांचा समावेश आहे. सरकार त्यांना योग्य मोबदला देऊ इच्छिते. सौर खादी चरखा आणण्याचा मुख्य हेतू महिला सूतकताई कामगारांना वाढीव मोबदला देणे हा आहे.खादी संस्थांकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, संबंधित संस्थांनी दहा लाख सूतकताई कामगारांना रोजगार मिळवून दिला आहे. मात्र यातून होणारी त्यांची कमाई अतिशय तुटपुंजी आहे. एक सूतकताई कामगार चरख्यावर हातांनी आठ तास सूत कातल्यानंतर केवळ अडीचशे रुपये कमावतो. सौरऊर्जेवर आधारित खादी चरख्याद्वारे चारपट अधिक सूतकताई होऊ शकते. पारंपरिक चरख्यात खादीचे ३-८ स्पिंडल्स होतात. यातून आठ तासांत सूताचे २५ पीळ तयार होतात. याउलट सौर ऊर्जेवर चालणाऱ्या चरख्यावर ३६ स्पिंडल्स असतात. याद्वारे आठच तासांत १०० पीळ तयार केले जाऊ शकतात. उद्योग भारती ट्रस्ट १०-२४ स्पिंडल्स असलेल्या अशा १५ चरख्यांचा प्रायोगिक तत्त्वावर वापर सुरू करीत आहे. या चरख्यांची किंमत ३५ ते ४० हजार रुपयांपर्यंत आहे. गोंडलमध्ये या चरख्यांचे मूल्यमापन होणार आहे. या मूल्यमापनानंतर सौर चरख्याच्या डिझाईनमध्ये आवश्यक ते बदलही केले जाऊ शकतात.