शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आता सौरऊर्जेवर चालणार खादीचा चरखा

By admin | Updated: October 29, 2015 00:37 IST

सौरऊर्जेवर खादीचा चरखा चालविणारे पहिले राज्य बनण्याचा मान बहुदा गुजरात पटकावणार आहे. हा प्रयोग महाराष्ट्रातही व्हायला हवा,

दीपक भट, अहमदाबादसौरऊर्जेवर खादीचा चरखा चालविणारे पहिले राज्य बनण्याचा मान बहुदा गुजरात पटकावणार आहे. हा प्रयोग महाराष्ट्रातही व्हायला हवा, अशी सूचना लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन आणि खासदार विजय दर्डा यांनी केली आहे.सौरऊर्जेचा वापर चरखा चालविण्यासाठी केला जाणार असल्याची माहिती गुजरातमध्ये प्रवास करताना मिळाली. हा खरोखरच अनुकरणीय पुढाकार आहे. त्यामुळे केवळ खादीचे उत्पादनच वाढणार नाही तर विणकरांना कामाचा उचित मोबदलाही मिळेल, त्याचवेळी गांधीजींचे ग्रामीण विकासाचे स्वप्नही साकार होईल, असे ते म्हणाले.खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने (केव्हीआयसी) तसेच खादीला प्रोत्साहन देणाऱ्या अन्य संस्थांनीही अधिक टकळी (स्पिंडल्स) असणारा चरखा विकसित केला आहे, ज्याला सौर ऊर्जेवर चालविले जाऊ शकते. सौरऊर्जेवर खादी चरखा यशस्वीरीत्या चालवणारे गुजरात हे बहुदा पहिले राज्य बनणार आहे. त्याबाबत खादी प्रयोग समिती अहमदाबाद, उद्योग भारती ट्रस्ट गोंडल, सूरत इंजिनियरिंग विकास असोसिएशन तसेच इंडो-जर्मन टूल रुमकडून चाचण्या घेतल्या जात आहेत. केव्हीआयसीच्या सूत्रानुसार या चाचण्यांच्या निष्पत्तीसंबंधी अहवाल पुढील महिन्यात सरकारला सादर केला जाणार आहे.खा. दर्डा म्हणाले की, केव्हीआयसी तसेच अमरावतीस्थित अशासकीय संघटना गांधीग्राम ऊर्जा विकास संस्थेने वर्धेच्या महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकीकरण संस्थेसोबत मिळून खादी चरख्याच्या कताई चाकाचे (स्पीनिंग व्हिल) डिझाईन तयार केले आहे. सद्यस्थितीत सूतकताई कामगारांमध्ये बहुतांश महिला कामगारांचा समावेश आहे. सरकार त्यांना योग्य मोबदला देऊ इच्छिते. सौर खादी चरखा आणण्याचा मुख्य हेतू महिला सूतकताई कामगारांना वाढीव मोबदला देणे हा आहे.खादी संस्थांकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, संबंधित संस्थांनी दहा लाख सूतकताई कामगारांना रोजगार मिळवून दिला आहे. मात्र यातून होणारी त्यांची कमाई अतिशय तुटपुंजी आहे. एक सूतकताई कामगार चरख्यावर हातांनी आठ तास सूत कातल्यानंतर केवळ अडीचशे रुपये कमावतो. सौरऊर्जेवर आधारित खादी चरख्याद्वारे चारपट अधिक सूतकताई होऊ शकते. पारंपरिक चरख्यात खादीचे ३-८ स्पिंडल्स होतात. यातून आठ तासांत सूताचे २५ पीळ तयार होतात. याउलट सौर ऊर्जेवर चालणाऱ्या चरख्यावर ३६ स्पिंडल्स असतात. याद्वारे आठच तासांत १०० पीळ तयार केले जाऊ शकतात. उद्योग भारती ट्रस्ट १०-२४ स्पिंडल्स असलेल्या अशा १५ चरख्यांचा प्रायोगिक तत्त्वावर वापर सुरू करीत आहे. या चरख्यांची किंमत ३५ ते ४० हजार रुपयांपर्यंत आहे. गोंडलमध्ये या चरख्यांचे मूल्यमापन होणार आहे. या मूल्यमापनानंतर सौर चरख्याच्या डिझाईनमध्ये आवश्यक ते बदलही केले जाऊ शकतात.