शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

आता RSS व जमात ए इस्लामीचे सदस्य अधिकृतपणे करू शकणार सरकारी नोकरी

By admin | Updated: June 10, 2016 16:07 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व जमात ए इस्लामीशी संबंधित असलेल्यांना सरकारी नोकरी न देण्याचा 1966 चा कायदा मागे घेण्याचा विचार करण्यात येत असल्याचे वृत्त आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 10 - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व जमात ए इस्लामीशी संबंधित असलेल्यांना सरकारी नोकरी न देण्याचा 1966 चा कायदा मागे घेण्याचा विचार करण्यात येत असल्याचे वृत्त आहे. 1966 मध्ये असा कायदा करण्यात आला होता की, ज्याद्वारे सरकारी नोकरीत रुजू होण्यापूर्वी उमेदवाराला तो RSS  किंवा जमात यांच्यापैकी कुठल्याही संघटनेशी संलग्न नाही असे लिहून द्यावे लागत असे.
हा कायदा विचित्र असून तो मागे घेण्यात यावा असा प्रस्ताव कार्मिक विभाग गृहखात्यापुढे मांडणार असल्याचे वृत्त आहे. कालबाह्य कायदे बाद करावेत या केंद्र सरकारच्या दृष्टीकोनाशी सुसंगत हा निर्णय असल्याचे सांगण्यात येत आहे.
सध्याच्या सरकारने असा कुठलाही आदेश काढला नसल्याचे व त्यात म्हटल्याप्रमाणे उमेदवारांनी वागावे अशी आमची अपेक्षाही नसल्याचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी म्हटल्याचे टाइम्स ऑफ इंडियाने नमूद केले आहे.
सत्तेत आल्यानंतर इंदिरा गांधींनी सदर आदेश दिला होता, जो 1980 व 1975 मध्ये कायम करण्यात आला. या आदेशानुसार RSS किंवा जमात ए इस्लामीचे सदस्य असलेले केंद्र सरकारच्या नोकरीसाठी अपात्र आहेत. 
इतके दिवस संबंधित आदेश पाळलाही जात नव्हता, परंतु नुकतंच गोव्यामध्ये नोकरभरतीच्या वेळी सरकारी खात्याने या आदेशाकडे बोट दाखवले तेव्हा हे प्रकरण ऐरणीवर आले, आणि हा कायदा रद्द करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. विशेष म्हणजे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह व पंतप्रधान नरेंद्र मोदींसह या सरकारमधले अनेक मंत्री थेटपणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडलेले आहेत.