शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
4
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
5
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
6
धैर्याला सॅल्यूट! देशातील पहिली ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट; आता मागते भीक पण स्वप्न आहेत मोठी
7
Reels बनवण्यासाठी अस्वलाला पाजलं कोल्ड ड्रिंक, VIDEO व्हायरल झाल्यावर जे घडलं ते पाहून...
8
१० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे
9
Sade Sati Upay: एकच रास, तरी साडेसातीचा काळ प्रत्येकाचा वेगळा; ३ महिन्यापूर्वी लागते चाहूल!
10
GST कपातीनंतर 4 लाखांपेक्षाही स्वस्तात मिळतेय ही मारुती SUV; देते 34 km पर्यंत मायलेज; बघा, व्हेरिअँट निहाय सूट...
11
अर्शद वारसी नव्हे, तर 'जॉली एलएलबी'साठी या मराठमोळ्या अभिनेत्याला होती पहिली पसंती, आता होतोय त्याला पश्चाताप
12
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
13
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
14
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
15
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
16
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
17
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
18
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
19
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
20
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?

केवळ पोकळ आश्वासनांनी बदल होत नाही - हुल

By admin | Updated: June 18, 2015 01:40 IST

केंद्रातील मोदी सरकार आणि दिल्लीतील केजरीवाल सरकार केवळ पोकळ आश्वासने देत सुटले आहेत. पण केवळ पोकळ आश्वासने देऊन बदल साध्य होऊ शकत नाही, अशी टीका काँगे्रस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी केली.

नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकार आणि दिल्लीतील केजरीवाल सरकार केवळ पोकळ आश्वासने देत सुटले आहेत. पण केवळ पोकळ आश्वासने देऊन बदल साध्य होऊ शकत नाही, अशी टीका काँगे्रस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी केली. विकासाच्या नावावर गरिबांना त्यांच्या अधिकारांपासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास पाठींबा दर्शविण्यासाठी राहुल गांधी गत सहा दिवसांत दुसऱ्यांदा जंतरमंतरवर पोहोचले. यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी मोदी आणि केजरीवाल सरकारला जोरदार लक्ष्य केले. हा लढा दिल्ली वा देशाच्या स्वच्छतेसाठी नाही तर तुमच्या सन्मानासाठी आहे. माझी ताकद तुम्हाला देऊन मी तुमच्यासाठी तुमच्यातला एक होऊन लढू इच्छितो. तुमच्याचसाठी नाही तर तुमच्यासकट शेतकरी, कामगार आणि देशातील सर्व दुर्बल आणि उपेक्षित लोकांसाठी मी लढू इच्छितो,असे ते म्हणाले. मोदी आणि केजरीवाल सरकारला केवळ आश्वासनांनी बदल घडेल असे वाटते. पण नुसत्या पोकळ आश्वासनांनी बदल घडत नसतो, असेही ते म्हणाले.भू संपादन विधेयकाच्या मुद्यावर मोदी सरकारला लक्ष्य करताना, केंद्रातील सरकारने विकासाच्या नावावर गरिबांना त्यांच्या अधिकारांपासून वंचित ठेवण्याचे धोरण अवलंबले असल्याचा आरोप त्यांनी केला. गरिबांना काय लाभ होणार, या प्रश्नाचे या सरकारकडे कुठलेही उत्तर नसते. आम्हाला असा विकास नको आहे, असे ते म्हणाले.