शहरं
Join us  
Trending Stories
1
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
2
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
3
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
4
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
5
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
6
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
7
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?
8
Mumbai: धक्कादायक! अडीच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या; आईसह तिच्या प्रियकराला अटक
9
अनिल अंबानी पुन्हा ॲक्शन मोडमध्ये! मुकेश अंबानींना देणार टक्कर? भूतानसोबत २००० कोटींचा करार
10
प्यार तूने क्या किया! डिजिटल अफेअर्स म्हणजे काय, भारतात का लोकप्रिय होतोय रिलेशनशिप ट्रेंड?
11
IPL मध्ये आतापर्यंत खेळले १२०० क्रिकेटर्स, पण 'ही' कामगिरी करणारा साई सुदर्शन 'एकमेव'!!
12
जिथे होते लष्कर-ए-तोयबाचे तळ, तिथेच १४ दिवस प्रशिक्षण घेत होती ज्योती मल्होत्रा! नवा खुलासा
13
ब्रम्होस: पाकिस्तानचे ११ एअरबेस उगाच नाही भेदले...; भारताला माजी राष्ट्रपतींनी दिलेली 'भेट'
14
मॅनेजरच्या वागणुकीनं नैराश्य, कामाच्या दबावामुळे २५ वर्षीय इंजिनिअरनं उचललं टोकाचं पाऊल
15
Jyoti Malhotra :'या' एका गोष्टीमुळे ज्योती मल्होत्रावर तपास यंत्रणेला संशय आला; चौकशीत होणार खुलासा
16
Jalgaon Shiv Sena Office: शिवसेनेच्या कार्यालयात भूत? कार्यकर्त्यांमध्ये घबराट, गुलाबराव पाटलांनी काढली समजूत
17
"माझा नवरा पाकिस्तानचा हेर नाही, तो तर..."; आयएसआय एजंटना मदत करणाऱ्या शाहजादची पत्नी काय म्हणाली?
18
पाकिस्तानात भिकाऱ्यांकडे बंगला, स्विमिंग पूल अन् SUV कार...; कसा चालतो हा व्यापार?
19
Shahana Fatima : नागपूरच्या लेकीची शिकागोत नेत्रदीपक कामगिरी; शहाना फातिमाने केली कमाल, मिळवलं मोठं यश
20
ज्योती मल्होत्रा प्रकरणानं चर्चा, एका गुप्तहेराला किती पैसे देतं पाकिस्तान?; डिटेल रिपोर्ट

भटक्या कुत्र्यांना ठार मारण्यास मनाई

By admin | Updated: November 19, 2015 05:10 IST

शहरांतील रस्त्यांवर हजारोंच्या संख्येने फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांचा रहिवाशांना उपद्रव होतो, एवढ्याच कारणावरून धडधाकट भटक्या कुत्र्यांना ठार मारण्यास महापालिका

मुंबई : शहरांतील रस्त्यांवर हजारोंच्या संख्येने फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांचा रहिवाशांना उपद्रव होतो, एवढ्याच कारणावरून धडधाकट भटक्या कुत्र्यांना ठार मारण्यास महापालिका आणि नगरपालिकांना मनाई करणारा अंतरिम आदेश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिला. न्यायालयापुढे उपस्थित झालेल्या वादाचा अंतिम निकाल होईपर्यंत सर्व नगरपालिका व महापालिकांनी केंद्र सरकारने १९६० मध्ये केलेला ह्यप्रिव्हेन्शन आॅफ क्युएल्टी टु अ‍ॅनिमल्सह्ण हा कायदा आणि त्याअन्वये २००१ मध्ये केलेल्या ह्यअ‍ॅनिमल बर्थ कंट्रोल रुल्सह्णचे तंतोतंत पालन करावे, असा आदेश न्या. दीपक मिश्रा आणि न्या. शिव कीर्ती सिंग यांच्या खंडपीठाने दिला. म्हणजेच महापालिकांना फक्त पिसाळलेल्या, मरणासन्न आजारी असलेल्या अथवा गंभीररीत्या जखमी झालेल्या भटक्या कुत्र्यांनाच ठार मारता येईल. या तीन वर्गांत न बसणाऱ्या व एरवी धडधाकट असलेल्या भटक्या कुत्र्यांना केवळ त्यांचा उपद्रव होतो या कारणावरून ठार मारता येणार नाही. केंद्र सरकारने केलेल्या कायद्यानुसार केंद्रीय पातळीवर प्राणी कल्याण मंडळाची स्थापना केली गेली आहे. देशातील वन्य प्राण्यांखेरीज कुत्र्यांसह इतर प्रजातींपैकी ह्यनकोसेह्ण प्राणी, वेदनारहित पद्धतीने स्थानिक स्वराज्य संस्थांकरवी ह्यनष्टह्ण करण्याची जबाबदारी या मंडळावर आहे. भटक्या कुत्र्यांच्या बाबतीत बोलायचे तर केंद्र सरकारच्या या कायद्यानुसार फक्त पिसाळलेल्या, मरणासन्न आजारी असलेल्या वा ज्याने मरण ओढवू शकेल अशारीतीने गंभीर जखमी झालेल्या भटक्या कुत्र्यांनाच विषारी इंजेक्शन देऊन ठार मारण्याची तरतूद आहे. मात्र महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था कायद्यांमध्ये याखेरीज ज्यांच्यापासून नागरिकांना उपद्रव होतो (उदा़ रात्री भुंकून झोपेचे खोबरे करणे, पादचारी आणि वाहनांचा पाठलाग करणे, अंगावर धावून येणे अथवा चावा घेणे) अशा कुत्र्यांनाही ठार मारण्याचे अधिकार पालिका व महापालिका प्रशासनांना दिलेले (पान ९ वर) आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांच्या पूर्णपीठाने डिसेंबर २००८ मध्ये ‘पिपल फॉर एलिमिनेशन आॅफ स्ट्रे ट्रबल’ने दाखल केलेल्या याचिकेवर असा निकाल दिला होता की, केंद्रीय कायदा आणि राज्यातील कायदा यांच्यात कोणताही विरोधाभास नाही. केंद्रीय कायद्यानुसार पिसाळलेल्या व मरणासन्न आजारी व जखमी कुत्र्यांना मारण्याखेरीज स्थानिक कायद्यांनुसार, या वर्गांत न बसणाºया पण नागरिकांना उपद्रव देणाºया भटक्या कुत्र्यांनाही पालिका ठार करू शकते. प्राणी कल्याण मंडळाने याविरुद्ध केलेले अपील सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेच. दरम्यान केरळ व कर्नाटक उच्च न्यायालयांनीही या प्रकरणी उलट-सुलट निकाल दिले. याशिवाय विविध प्राणीमित्र संघटना व भटक्या कुत्र्यांना ठार मारायलाच हवे असे म्हणणाºया व्यक्ती व संघटना यांनीही सहभागी होण्यासाठी अर्ज केले होते. या सर्वांवर बुधवारी अंतिम सुनावणी होणे अपेक्षित होते. परंतु वेळेअभावी अंतिम सुनावणी घेता आली नाही. त्यामुळे खंडपीठाने वरीलप्रमाणे अंतरिम आदेश देऊन अंतिम सुनावणी ९ मार्च रोजी ठेवली. तोपर्यंत देशातील कोणत्याही उच्च न्यायालयांनी भटके कुत्रे आणि १९६० चा केंद्राचा कायदा याविषयाशी संबंधित प्ररकरणांत कोणताही आदेश देऊ नये, असे निर्देशही दिले गेले. खंडपीठाने असे नमूद केले की, कुत्र्यांविषयी भूतदया दाखवायला हवी व त्यांना अंदाधुंद पद्धतीने मारले जाऊ नये हे नि:संशय. पण त्याच बरोबर हेही तेवढेच खरे की, मानवी जीवही वाचवायला हवेत आणि प्रशासनाच्या ढिलाईमुळे भटके कुत्रे चावल्याने कोणालाही यातना सोसाव्या लागू नयेत. यासाठी भूतदया आणि भटक्या कुत्र्यांपासून संभवणारा धोका यांच्यात संतुलन साधणे गरजेचे आहे. परंतु हे कसे साध्य करता येईल हे केवळ अंतिम सुनावणीनंतरच ठरविता येईल. त्यामुळे तोपर्यंत महापालिका व प्राणी कल्याण मंडळ यांनी केंद्रीय कायद्यानुसार आपापली कर्तव्ये कसोशीने पाळणे पुरेसे व न्यायाचे होईल. (विशेष प्रतिनिधी)

महापालिकेची ठाम भूमिका....

बृहन्मुंबई महापालिकेतर्फे ज्येष्ठ वकील शेखर नाफडे यांनी धडधाकट भटक्या कुत्र्यांनाही त्यांच्यापासून उपद्रव होतो म्हणून ठार मारण्याचे जोरदार समर्थन केले. महापालिका कायद्यानुसार अशा कुत्र्यांचा बंदोबस्त करणे हे महापालिकेचे कर्तव्य आहे. एवढेच नव्हे तर महापालिका कायद्यातील यासंबंधीच्या तरतुदी केंद्राने केलेल्या कायद्याच्या विपरीत असल्याने त्या गैरलागू होतात, असे आव्हान कोणी देणार असेल तर त्याचाही आपण चोखपणे प्र्रतिवाद करू शकतो कारण राज्याच्या या कायद्याला राष्ट्रपतींची संमती मिळालेली आहे, असेही अ‍ॅड. नाफडे यांनी आग्रहाने सांगितले.पण खंडपीठाने हे मुद्दे अंतिम सुनावणीच्या वेळी विचारात घ्यायचे ठरविले. न्यायालयाने अ‍ॅमायकस क्युरी म्हणून नेमलेले ज्येष्ठ वकील दुष्यंत दवे यांनी भटक्या कुत्र्यांविषयी महात्मा गांधींनी केलेल्या लिखाणाचे संकलन सादर केले. पण तेही अंतिम सुनावणीपर्यंत बाजूला ठेवले गेले.