शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

कैलाश सत्यर्थी व मलाला युसुफजाईला शांततेचं नोबेल

By admin | Updated: October 10, 2014 15:18 IST

कैलाश सत्यर्थी या बालहक्कांसाठी झटणा-या कार्यकर्त्याला व महिला शिक्षणासाठी जीव झोकणा-या मलाला युसुफजाईला संयु्क्त शांतता नोबेलने गौरवण्यात आले आहे.

ऑनलाइन लोकमत
स्टॉकहोम (नॉर्वे), दि. १० - कैलाश सत्यर्थी या बालहक्कांसाठी झटणा-या कार्यकर्त्याला नोबेल पुरस्कार जाहीर झाला असून मलाला युसुफजाईलाही नोबेलने गौरवण्यात आले आहे. सत्यर्थी व मलाला यांना शांततेचे नोबेल संयुक्तपणे देताना नोबेल समितीने आवर्जून असे म्हटले आहे की, हिंदू व मुस्लीम तसेच भारतीय व पाकिस्तानी, अज्ञान व कट्टरतावाद यांच्याविरोधात एकत्र झटत असल्याची दखल हा पुरस्कार या दोघांना देताना घेतली आहे.  बचपन बचाओ या आंदोलनाचे प्रणेते असलेल्या सत्यर्थींना व मलालाला २७८ उमेदवारांमधून शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी निवडण्यात आले आहे. सत्यर्थी यांनी बालमजुरीविरोधात गेली काही दशकं केलेल्या कार्याचा हा गौरव आहे. मध्यप्रदेशातील विदीषा येथे १९५४ साली जन्म घेतलेले कैलाश सत्यर्थी हे नोबेल पारितोषिक मिळवणारे आठवे भारतीय ठरले आहेत.
भारतीयाला शांततेच्या नोबेल पुरस्कारानं गौरवलं जाण्याची घटना तब्बल ३५ वर्षांनंतर घडली असल्यामुळे देशभरात आनंद साजरा केला जात आहे. तर जीवाची बाजी लावून मुलींच्या शिक्षणासाठी साक्षात तालिबानशी दोन हात करणा-या मलालाला नोबेलनं गौरवल्यामुळेही आनंद व्यक्त होत आहे. याआधी २००९मध्ये रसायनशास्त्रातल्या संशोधनाबद्दल डॉ. वेंकटरामण रामकृष्णन यांना नोबेल मिळाले होते, तर तब्बल ३५ वर्षांपूर्वी मदर तेरेसांचा शांततेच्या नोबेल पुरस्काराने गौरव करण्यात आला होता.
आर्थिक फायद्यासाठी लहान मुलांना मजुरी करायला लावणा-या नृशंस घटना भारतात घडत आल्या आहेत. या अमानवी प्रकाराविरोधात सत्यर्थींनी महात्मा गांधींच्या अहिंसेच्या मार्गानं प्रखर विरोध केला आणि बालमजुरीसारख्या मुलांचं जीवन उद्धवस्त करणा-या प्रथेविरोधातला लढा तीव्र केला. या पुरस्कारामुळे अत्यंत आनंद झाला असून बालमजुरीसारख्या अनिष्ट पद्धती हद्दपार होतील, त्याविरोधात लढणा-या कार्यकर्त्यांना बळ मिळेल तसेच लहान मुलांचे जीवन सुधारेल अशी अपेक्षा सत्यर्थी यांनी व्यक्त केली आहे.
बालहक्कांच्या प्रश्नावर आंतरराष्ट्रीय परिषदांमध्येही सहभाग घेऊन सत्यर्थी यांनी हा प्रश्न जागतिक पातळीवर चर्चेत ठेवण्याचे तसेच बालहक्कांसाठी जागतिक सहमती तयार करण्याचे व यासंदर्भात जागतिक पातळीवर कायदे तयार करण्याच्या दृष्टीने अथक प्रयत्न केले आहेत. सत्यर्थी यांना मिळालेल्या या पुरस्कारांमुळे भारतासह जगातल्या बालमजुरीला व लहान मुलांना मिळणा-या अमानवी वागणुकीला आळा बसण्याच्या दृष्टीने काही ठोस उपाययोजना होईल अशी आशा आहे.
तर, मलाला युसुफजाईला मिळालेल्या या नोबेल पुरस्कारामुळे महिला शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर येईल आणि तालिबानसारख्या दहशतवादी वृत्तींविरोधात लढणा-यांना बळ मिळेल अशी अपेक्षा आहे.
 
यापूर्वी नोबेल पुरस्काराने गौरवलेले भारतीय
 
रवींद्रनाथ टागोर (साहित्य) - १९१३
सर सी. व्ही. रमण (रमण ईफेक्ट, भौतिकशास्त्र) - १९३०
डॉ. हरगोविंद खुराणा (वैद्यकशास्त्र) - १९६८
मदर तेरेसा (शांततेसाठी) - १९७९
डॉ. सुब्रमण्यम चंद्रशेखर (भौतिकशास्त्र) - १९८३
डॉ. अमर्त्य सेन (अर्थशास्त्र) - १९९८
डॉ. वेंकटरमण रामकृष्णन (रसायनशास्त्र) - २००९