शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
4
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
5
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
6
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
7
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
8
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
9
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
10
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
11
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
12
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
13
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
14
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
15
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
16
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
17
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
18
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
19
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
20
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?

कैलाश सत्यर्थी व मलाला युसुफजाईला शांततेचं नोबेल

By admin | Updated: October 10, 2014 15:18 IST

कैलाश सत्यर्थी या बालहक्कांसाठी झटणा-या कार्यकर्त्याला व महिला शिक्षणासाठी जीव झोकणा-या मलाला युसुफजाईला संयु्क्त शांतता नोबेलने गौरवण्यात आले आहे.

ऑनलाइन लोकमत
स्टॉकहोम (नॉर्वे), दि. १० - कैलाश सत्यर्थी या बालहक्कांसाठी झटणा-या कार्यकर्त्याला नोबेल पुरस्कार जाहीर झाला असून मलाला युसुफजाईलाही नोबेलने गौरवण्यात आले आहे. सत्यर्थी व मलाला यांना शांततेचे नोबेल संयुक्तपणे देताना नोबेल समितीने आवर्जून असे म्हटले आहे की, हिंदू व मुस्लीम तसेच भारतीय व पाकिस्तानी, अज्ञान व कट्टरतावाद यांच्याविरोधात एकत्र झटत असल्याची दखल हा पुरस्कार या दोघांना देताना घेतली आहे.  बचपन बचाओ या आंदोलनाचे प्रणेते असलेल्या सत्यर्थींना व मलालाला २७८ उमेदवारांमधून शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी निवडण्यात आले आहे. सत्यर्थी यांनी बालमजुरीविरोधात गेली काही दशकं केलेल्या कार्याचा हा गौरव आहे. मध्यप्रदेशातील विदीषा येथे १९५४ साली जन्म घेतलेले कैलाश सत्यर्थी हे नोबेल पारितोषिक मिळवणारे आठवे भारतीय ठरले आहेत.
भारतीयाला शांततेच्या नोबेल पुरस्कारानं गौरवलं जाण्याची घटना तब्बल ३५ वर्षांनंतर घडली असल्यामुळे देशभरात आनंद साजरा केला जात आहे. तर जीवाची बाजी लावून मुलींच्या शिक्षणासाठी साक्षात तालिबानशी दोन हात करणा-या मलालाला नोबेलनं गौरवल्यामुळेही आनंद व्यक्त होत आहे. याआधी २००९मध्ये रसायनशास्त्रातल्या संशोधनाबद्दल डॉ. वेंकटरामण रामकृष्णन यांना नोबेल मिळाले होते, तर तब्बल ३५ वर्षांपूर्वी मदर तेरेसांचा शांततेच्या नोबेल पुरस्काराने गौरव करण्यात आला होता.
आर्थिक फायद्यासाठी लहान मुलांना मजुरी करायला लावणा-या नृशंस घटना भारतात घडत आल्या आहेत. या अमानवी प्रकाराविरोधात सत्यर्थींनी महात्मा गांधींच्या अहिंसेच्या मार्गानं प्रखर विरोध केला आणि बालमजुरीसारख्या मुलांचं जीवन उद्धवस्त करणा-या प्रथेविरोधातला लढा तीव्र केला. या पुरस्कारामुळे अत्यंत आनंद झाला असून बालमजुरीसारख्या अनिष्ट पद्धती हद्दपार होतील, त्याविरोधात लढणा-या कार्यकर्त्यांना बळ मिळेल तसेच लहान मुलांचे जीवन सुधारेल अशी अपेक्षा सत्यर्थी यांनी व्यक्त केली आहे.
बालहक्कांच्या प्रश्नावर आंतरराष्ट्रीय परिषदांमध्येही सहभाग घेऊन सत्यर्थी यांनी हा प्रश्न जागतिक पातळीवर चर्चेत ठेवण्याचे तसेच बालहक्कांसाठी जागतिक सहमती तयार करण्याचे व यासंदर्भात जागतिक पातळीवर कायदे तयार करण्याच्या दृष्टीने अथक प्रयत्न केले आहेत. सत्यर्थी यांना मिळालेल्या या पुरस्कारांमुळे भारतासह जगातल्या बालमजुरीला व लहान मुलांना मिळणा-या अमानवी वागणुकीला आळा बसण्याच्या दृष्टीने काही ठोस उपाययोजना होईल अशी आशा आहे.
तर, मलाला युसुफजाईला मिळालेल्या या नोबेल पुरस्कारामुळे महिला शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर येईल आणि तालिबानसारख्या दहशतवादी वृत्तींविरोधात लढणा-यांना बळ मिळेल अशी अपेक्षा आहे.
 
यापूर्वी नोबेल पुरस्काराने गौरवलेले भारतीय
 
रवींद्रनाथ टागोर (साहित्य) - १९१३
सर सी. व्ही. रमण (रमण ईफेक्ट, भौतिकशास्त्र) - १९३०
डॉ. हरगोविंद खुराणा (वैद्यकशास्त्र) - १९६८
मदर तेरेसा (शांततेसाठी) - १९७९
डॉ. सुब्रमण्यम चंद्रशेखर (भौतिकशास्त्र) - १९८३
डॉ. अमर्त्य सेन (अर्थशास्त्र) - १९९८
डॉ. वेंकटरमण रामकृष्णन (रसायनशास्त्र) - २००९