शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

कैलाश सत्यर्थी व मलाला युसुफजाईला शांततेचं नोबेल

By admin | Updated: October 10, 2014 15:18 IST

कैलाश सत्यर्थी या बालहक्कांसाठी झटणा-या कार्यकर्त्याला व महिला शिक्षणासाठी जीव झोकणा-या मलाला युसुफजाईला संयु्क्त शांतता नोबेलने गौरवण्यात आले आहे.

ऑनलाइन लोकमत
स्टॉकहोम (नॉर्वे), दि. १० - कैलाश सत्यर्थी या बालहक्कांसाठी झटणा-या कार्यकर्त्याला नोबेल पुरस्कार जाहीर झाला असून मलाला युसुफजाईलाही नोबेलने गौरवण्यात आले आहे. सत्यर्थी व मलाला यांना शांततेचे नोबेल संयुक्तपणे देताना नोबेल समितीने आवर्जून असे म्हटले आहे की, हिंदू व मुस्लीम तसेच भारतीय व पाकिस्तानी, अज्ञान व कट्टरतावाद यांच्याविरोधात एकत्र झटत असल्याची दखल हा पुरस्कार या दोघांना देताना घेतली आहे.  बचपन बचाओ या आंदोलनाचे प्रणेते असलेल्या सत्यर्थींना व मलालाला २७८ उमेदवारांमधून शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी निवडण्यात आले आहे. सत्यर्थी यांनी बालमजुरीविरोधात गेली काही दशकं केलेल्या कार्याचा हा गौरव आहे. मध्यप्रदेशातील विदीषा येथे १९५४ साली जन्म घेतलेले कैलाश सत्यर्थी हे नोबेल पारितोषिक मिळवणारे आठवे भारतीय ठरले आहेत.
भारतीयाला शांततेच्या नोबेल पुरस्कारानं गौरवलं जाण्याची घटना तब्बल ३५ वर्षांनंतर घडली असल्यामुळे देशभरात आनंद साजरा केला जात आहे. तर जीवाची बाजी लावून मुलींच्या शिक्षणासाठी साक्षात तालिबानशी दोन हात करणा-या मलालाला नोबेलनं गौरवल्यामुळेही आनंद व्यक्त होत आहे. याआधी २००९मध्ये रसायनशास्त्रातल्या संशोधनाबद्दल डॉ. वेंकटरामण रामकृष्णन यांना नोबेल मिळाले होते, तर तब्बल ३५ वर्षांपूर्वी मदर तेरेसांचा शांततेच्या नोबेल पुरस्काराने गौरव करण्यात आला होता.
आर्थिक फायद्यासाठी लहान मुलांना मजुरी करायला लावणा-या नृशंस घटना भारतात घडत आल्या आहेत. या अमानवी प्रकाराविरोधात सत्यर्थींनी महात्मा गांधींच्या अहिंसेच्या मार्गानं प्रखर विरोध केला आणि बालमजुरीसारख्या मुलांचं जीवन उद्धवस्त करणा-या प्रथेविरोधातला लढा तीव्र केला. या पुरस्कारामुळे अत्यंत आनंद झाला असून बालमजुरीसारख्या अनिष्ट पद्धती हद्दपार होतील, त्याविरोधात लढणा-या कार्यकर्त्यांना बळ मिळेल तसेच लहान मुलांचे जीवन सुधारेल अशी अपेक्षा सत्यर्थी यांनी व्यक्त केली आहे.
बालहक्कांच्या प्रश्नावर आंतरराष्ट्रीय परिषदांमध्येही सहभाग घेऊन सत्यर्थी यांनी हा प्रश्न जागतिक पातळीवर चर्चेत ठेवण्याचे तसेच बालहक्कांसाठी जागतिक सहमती तयार करण्याचे व यासंदर्भात जागतिक पातळीवर कायदे तयार करण्याच्या दृष्टीने अथक प्रयत्न केले आहेत. सत्यर्थी यांना मिळालेल्या या पुरस्कारांमुळे भारतासह जगातल्या बालमजुरीला व लहान मुलांना मिळणा-या अमानवी वागणुकीला आळा बसण्याच्या दृष्टीने काही ठोस उपाययोजना होईल अशी आशा आहे.
तर, मलाला युसुफजाईला मिळालेल्या या नोबेल पुरस्कारामुळे महिला शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर येईल आणि तालिबानसारख्या दहशतवादी वृत्तींविरोधात लढणा-यांना बळ मिळेल अशी अपेक्षा आहे.
 
यापूर्वी नोबेल पुरस्काराने गौरवलेले भारतीय
 
रवींद्रनाथ टागोर (साहित्य) - १९१३
सर सी. व्ही. रमण (रमण ईफेक्ट, भौतिकशास्त्र) - १९३०
डॉ. हरगोविंद खुराणा (वैद्यकशास्त्र) - १९६८
मदर तेरेसा (शांततेसाठी) - १९७९
डॉ. सुब्रमण्यम चंद्रशेखर (भौतिकशास्त्र) - १९८३
डॉ. अमर्त्य सेन (अर्थशास्त्र) - १९९८
डॉ. वेंकटरमण रामकृष्णन (रसायनशास्त्र) - २००९