शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

कैलाश सत्यर्थी व मलाला युसुफजाईला शांततेचं नोबेल

By admin | Updated: October 10, 2014 15:18 IST

कैलाश सत्यर्थी या बालहक्कांसाठी झटणा-या कार्यकर्त्याला व महिला शिक्षणासाठी जीव झोकणा-या मलाला युसुफजाईला संयु्क्त शांतता नोबेलने गौरवण्यात आले आहे.

ऑनलाइन लोकमत
स्टॉकहोम (नॉर्वे), दि. १० - कैलाश सत्यर्थी या बालहक्कांसाठी झटणा-या कार्यकर्त्याला नोबेल पुरस्कार जाहीर झाला असून मलाला युसुफजाईलाही नोबेलने गौरवण्यात आले आहे. सत्यर्थी व मलाला यांना शांततेचे नोबेल संयुक्तपणे देताना नोबेल समितीने आवर्जून असे म्हटले आहे की, हिंदू व मुस्लीम तसेच भारतीय व पाकिस्तानी, अज्ञान व कट्टरतावाद यांच्याविरोधात एकत्र झटत असल्याची दखल हा पुरस्कार या दोघांना देताना घेतली आहे.  बचपन बचाओ या आंदोलनाचे प्रणेते असलेल्या सत्यर्थींना व मलालाला २७८ उमेदवारांमधून शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी निवडण्यात आले आहे. सत्यर्थी यांनी बालमजुरीविरोधात गेली काही दशकं केलेल्या कार्याचा हा गौरव आहे. मध्यप्रदेशातील विदीषा येथे १९५४ साली जन्म घेतलेले कैलाश सत्यर्थी हे नोबेल पारितोषिक मिळवणारे आठवे भारतीय ठरले आहेत.
भारतीयाला शांततेच्या नोबेल पुरस्कारानं गौरवलं जाण्याची घटना तब्बल ३५ वर्षांनंतर घडली असल्यामुळे देशभरात आनंद साजरा केला जात आहे. तर जीवाची बाजी लावून मुलींच्या शिक्षणासाठी साक्षात तालिबानशी दोन हात करणा-या मलालाला नोबेलनं गौरवल्यामुळेही आनंद व्यक्त होत आहे. याआधी २००९मध्ये रसायनशास्त्रातल्या संशोधनाबद्दल डॉ. वेंकटरामण रामकृष्णन यांना नोबेल मिळाले होते, तर तब्बल ३५ वर्षांपूर्वी मदर तेरेसांचा शांततेच्या नोबेल पुरस्काराने गौरव करण्यात आला होता.
आर्थिक फायद्यासाठी लहान मुलांना मजुरी करायला लावणा-या नृशंस घटना भारतात घडत आल्या आहेत. या अमानवी प्रकाराविरोधात सत्यर्थींनी महात्मा गांधींच्या अहिंसेच्या मार्गानं प्रखर विरोध केला आणि बालमजुरीसारख्या मुलांचं जीवन उद्धवस्त करणा-या प्रथेविरोधातला लढा तीव्र केला. या पुरस्कारामुळे अत्यंत आनंद झाला असून बालमजुरीसारख्या अनिष्ट पद्धती हद्दपार होतील, त्याविरोधात लढणा-या कार्यकर्त्यांना बळ मिळेल तसेच लहान मुलांचे जीवन सुधारेल अशी अपेक्षा सत्यर्थी यांनी व्यक्त केली आहे.
बालहक्कांच्या प्रश्नावर आंतरराष्ट्रीय परिषदांमध्येही सहभाग घेऊन सत्यर्थी यांनी हा प्रश्न जागतिक पातळीवर चर्चेत ठेवण्याचे तसेच बालहक्कांसाठी जागतिक सहमती तयार करण्याचे व यासंदर्भात जागतिक पातळीवर कायदे तयार करण्याच्या दृष्टीने अथक प्रयत्न केले आहेत. सत्यर्थी यांना मिळालेल्या या पुरस्कारांमुळे भारतासह जगातल्या बालमजुरीला व लहान मुलांना मिळणा-या अमानवी वागणुकीला आळा बसण्याच्या दृष्टीने काही ठोस उपाययोजना होईल अशी आशा आहे.
तर, मलाला युसुफजाईला मिळालेल्या या नोबेल पुरस्कारामुळे महिला शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर येईल आणि तालिबानसारख्या दहशतवादी वृत्तींविरोधात लढणा-यांना बळ मिळेल अशी अपेक्षा आहे.
 
यापूर्वी नोबेल पुरस्काराने गौरवलेले भारतीय
 
रवींद्रनाथ टागोर (साहित्य) - १९१३
सर सी. व्ही. रमण (रमण ईफेक्ट, भौतिकशास्त्र) - १९३०
डॉ. हरगोविंद खुराणा (वैद्यकशास्त्र) - १९६८
मदर तेरेसा (शांततेसाठी) - १९७९
डॉ. सुब्रमण्यम चंद्रशेखर (भौतिकशास्त्र) - १९८३
डॉ. अमर्त्य सेन (अर्थशास्त्र) - १९९८
डॉ. वेंकटरमण रामकृष्णन (रसायनशास्त्र) - २००९